छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे ही हिंदुत्ववाद्यांची दैवते आहेत, असे म्हणण्याची पद्धत आहे. वास्तविक ही गोष्ट सर्वाथाने खरी नाही. बाळासाहेब ठाकरे हे शिवसनिकांसाठी दैवत आहेत आणि शिवाजी महाराज हे तर सर्वाचेच दैवत आहेत. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब हे कोणाकोणासाठी दैवत आहेत, यावर वाद न घालता निश्चितपणे असे म्हणता येते की, ‘फेसबुक’वर त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध करणे अनुचित आहे. ‘फेसबुक’चा वापर करून कोणाचीही आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध होऊच नयेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, चाहत्यांच्या भावनांना धक्का बसतो. मात्र, तो धक्का गंभीर आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी म्हणवणा-यांना कोणालाही आरोपी ठरवून त्याची हत्या करण्याचा अधिकार मिळत नाही. ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह चित्र टाकणे, हे चूक आहे; पण, आपण ज्याला शिक्षा करत आहोत तो खरोखरच गुन्हेगार आहे की नाही, याची शहानिशा केली गेली पाहिजे आणि निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. परंतु पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेने या आक्षेपार्ह छायाचित्रांमध्ये भावना दुखावल्या म्हणून आरोपी कोण, हे ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतला आणि शिक्षा म्हणून पुण्यातील एका तरुणाला मारहाण केली, त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. हिंदू राष्ट्र सेना हा वादाचा आणि चच्रेचा विषय झाला आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख म्हणून धनंजय देसाई याचे नाव घेतले जात आहे. या पूर्वी प्रक्षोभक विधाने करणे आणि प्रक्षोभक पत्रके वाटणे या गुन्हय़ांसाठी त्याच्यावर फिर्याद दाखल झालेली होती. परंतु त्याच्यावर खटला चालला नाही आणि त्यामुळे तो मोकाट सुटला. हिंदू राष्ट्र सेना ही काही फार मोठी संघटना नाही. केवळ मुस्लिमांविषयी समाजात द्वेष निर्माण करणे एवढयाच एका हेतूने पेटलेले काही तरुण हिंदू राष्ट्र सेना म्हणवत असतात. तेव्हा अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. अशा कारवाईमध्ये प्रथमत: संघटनेवर बंदी घातली पाहिजे; परंतु, बंदी घालण्याची प्रक्रिया फार किचकट आहे. ज्या संघटनेवर बंदी घालायची असते तिला तिच्या कारवायांचा साद्यंत अहवाल राज्य सरकारला तयार करावा लागतो. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असतो आणि बंदी घालणे हा केंद्राचा विषय असतो. आता हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारने या संबंधात राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे आणि तो योग्य वाटल्यास केंद्र सरकार हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालणार आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकार योग्य तो अहवाल तयार करत आहे. या आधी अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र संघटनेवर बंदी आली तरी तेच कार्यकत्रे वेगळ्या नावाने कार्यरत राहतात. म्हणजे कारवाया सुरूच राहतात. त्यामुळे अशा प्रकरणांना संपूर्ण आळा घालणे आवश्यक आहे. कोणाच्या भावना कितीही दुखावल्या असल्या तरी अपराधी शोधून काढून त्याला अपराध सिद्ध झाल्यानंतरच कायद्याने शिक्षा झाली पाहिजे आणि समाजातील अशा लोकांचा बंदोबस्त करण्याचा हाच वैध मार्ग असतो, हे अशा संघटनांना समजावून सांगितले पाहिजे. कितीही भावना दुखावल्या तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि नसतो. हे लोकशाहीतले मूलतत्त्व आहे. अन्यथा कोणीही भावना दुखावल्याचे कारण सांगून आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे कोणालाही शिक्षा करत सुटतील. हिंदू राष्ट्र सेनेच्या ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे त्यांना कठोर शिक्षा झाल्या पाहिजेत.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
आता तुम्ही काँग्रेसी झालात तेव्हा डोक्यात मौलाना टोपी घाला आणि फिरा !जय महाराष्ट्र !!!