उन्हाळा वाढू लागल्यामुळे तलावांच्या तालुक्यातील तहानलेल्या रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी पाच किमी पायपीट करावी लागत आहे.
शहापूर- उन्हाळा वाढू लागल्यामुळे तलावांच्या तालुक्यातील तहानलेल्या रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी पाच किमी पायपीट करावी लागत आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा, अप्पर वैतरणा, मोडकसागर ही ब्रिटीशकालीन धरणे फक्तमुंबई, ठाणे आणि उपनगरांची तहान भागवण्यासाठीच बांधण्यात आल्याने धरणाजवळच्या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते.
ही धरणे बांधतांना स्थानिक जनतेची गरज लक्षात घेऊन दूरगामी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र त्याला सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. तानसा, वैतरणाचे १०० टक्के पाणी हे केवळ मुंबईकरांसाठीच राखून ठेवले असल्याचे चित्र आहे. त्यानंतर भातसाधरणाला वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारने धरणांचे पाणी शेतीसिंचन व वीजनिर्मीतीसाठी वापरण्यात येईल, असा तिहेरी उद्देश ठेवला होता. सिंचनासाठी भातसाधरणातून उजवा तीरकालवा ६७ किमी आणि डावा ५४ किमी लांबीचा तीर कालवा खोदून उजव्या कालव्याद्वारे १६६.८० हेक्टर क्षेत्र व डाव्या कालव्याद्वारे ६३२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा मानस होता. मात्र या कालव्याचे काम अर्ध्यावरच रखडल्याने शेतीसिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही.
सध्या शहापूर तालुक्यातील केवळ १५ टक्के शेती सिंचनाखाली आहे. सावरशेत, साजिवली ,सरलांबे, कवडास, तूते, खरीवली, काळयाचापाडा,अर्जुनली, आवरे ,कांबारे, चेरपोली, सावरोली, वेहळोली,ष्टद्धr(149)ाातसई, काजळविहीर, गोठेघर, बामणे, दहागांव, वासिंद ,खातिवली, देवळी, आदी गावांचे शेतीक्षेत्र ओलिताखाली येत असून धरणाच्या अगदी उशाशी असलेले चौकीचापाडा, बिरवाडी, शेंडेपाडा, निमणपाडा, नाऊचापाडा, पेंढरघोळ, लाहे, कोठारे ,साकडबांव, सारंगपुरी, मुरबीचापाडा, धसई,शिलोत्तर, फर्डेपाडा आदी परिसरातील सुमारे ४० ते ५० आदिवासी पाडे व गांवे या सिंचनापासून वंचित आहेत. धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करताना धरणाची पातळी १०६.५ मीटर इतकी असेपर्यंत धरणातून विसर्ग करण्यात येणा-या पाण्याद्वारे १५ मेगावॅट इतकी वीज निर्मिती जनित्र कार्यरत असते. मात्र ही वीज कांबारे येथून कळवा येथे नेण्यात येते शहापूरला त्याचा काडीमात्रही फायदा होत नाही.
मध्य वैतरणा धरणाचे काम बृहन्मुंबई पालिकेने केले असून त्यातूनही मुंबईकरांसाठी प्रतिदिन ४५५ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या धरणाच्या निर्मितीसाठी सुमारे १ लाख वनस्पतीची कत्तल करण्यात आली तसेच या ठिकाणी असलेल्या दाट जंगलराजीतले अनेक वन्यजीव विस्थापित झाले. तर काही नष्ट झाले.
जंगलसंपत्ती नष्ट केल्यावर त्यांचे रोपण नगर जिल्हात करण्यात आले. वनविभागाचा हा उरफाटा नियम पाहिल्यावर दुखणे ‘शहापूरात उपाय मात्र नगरात’ असा अनुभव आहे.
तानसा , वैतरणा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा ही चारही धरणे केवळ आणि केवळ मुंबईकरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुन्हा गारगाई धरणाचे काम मनपाने सुरू केले आहे. त्यासाठी शेतक-यांच्या कसदार जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत शेतक-यांना मिळतत आहेत. एकीकडे सराकारचे प्रत्यक्ष दर पाहता शेतक-यांना खासगी मालक किमान त्याच्या १० पट दराने किंमत देत आहेत. या धरणातूनही केवळ मुंबईकरांसाठीच पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे धरणांच्या गावातही प्रचंड पाणीटंचाई आहे.
शहापूरसारख्या तालुक्यातील रहिवाश्यांना हंडाभर पाण्यासाठी ५ मिनिटाची पायपीट करावी लागते. तर जोगेश्वरी, अंधेरीसारख्या विभागातील रहिवाश्यांना महानगरपालिकेने मुबलक पाण्याची सोयकरून दिली आहे, सकाळी ४ वाजता प्रचंड प्रमाणाच्या जलप्रवाहाने तेथील विभागात पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळा ऋतू असल्याकारणाने नागरिकांनी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करायचा सोडून जोगेश्वरी (पूर्व),प्रताप नगर येथील रहिवाशी तर रात्री १२ वाजेपर्यंत ना स्वतः झोपत नाही दुसऱ्यांना झोपू देत, पाणी सकाळी ४च्या सुमारास येत असल्याकारणाने ते पाण्याचे पाईप रात्री झोपतेवेळी पिंपात सोडून झोपीजातात, रात्रीची फार मोठी कामे करत असल्याकारणाने त्यांचे पुरुष मंडळी तर सोडा परंतु स्त्रियासुद्धा सकाळचे ४ ते ६ वाजेपर्यंतचे पाणी गटारातून वाहून घालवतात, तर कोणी गरमा जास्त प्रमाणात होतो म्हणून येत असलेले पाणी घराच्या छपरावरील पत्रे थंड करण्यास वापरतात, कोणी ४ ते ५ भांड्यासाठी नळ सोडून ते भांडी धुवत असतात, तर कोणी कपडे स्वछ धुवून काढण्यासाठी नळाला बालद्या लावून किमान १ ते दीड तास पाणी वाहून घालवतात आणि जेव्हा पाणी जाण्याची वेळ फक्त अर्धा तास उरते तेव्हा शेजारील मंडळीशी भांडणेकरून आपली पोलिसचौकीतील ओळख दाखवत “हमको पानी नही मिलता है साहब”असे खोटीकारणे आपल्या पोलिसचौकीतील बड्या अधिकारीस सांगतात. पाण्याचे बिल किमान ८ ते १० खोल्यास मिळून भरावे लागते म्हणून दादागिरी करणारे रहिवाशी बिनधास्त पाण्याचा उध्वंस करतात.अशा रहिवाश्याबरोबर नेमके काय केले गेले पाहिजे? जेणेकरून आपल्या नैसर्गिक संपत्तीचा नाश होणार नाहि. कित्येक खेडोपाड्यातील लोकांचे पाण्यासाठीचे जे हाल होतात अशा प्रकारचे हाल तेथील रहिवाश्यांना दाखवा म्हणजे पाणी म्हणजे काय? हे प्रत्येक भारतीय नागरिकास माहित पडेल. थोडेथोडे पाणी वाचवले तर अथांग सागर निर्माण होईल आणि तोच सागर आपली नैसर्गिक संपत्ती वाचवू शकेल. आज खेडोपाड्यात पाण्याचा प्रश्न उभा असतानाही मुंबईतील असे विभाग तपासून काढून तेथील रहिवाश्यांबरोबर मिल्ट्री एक्शन घेण्यात आली पाहिजे. नाहीतर एक दिवस असा येईल कि “देव देतो आणि कर्म नेते”. आजहि किमान १० फुट उंचावर असलेल्या विभागात पाणी पोहचू शकत नाहि परंतु संपूर्ण मुंबईत किमान ५० ते ६० मजली इमारतीचे बांधकाम होत आहे, ते हि २४ तास पाण्याच्या सुखसोयीत. अश्याने जे मुंबईतील स्थानिक रहिवाशी आहेत त्यांनी पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकायचे का?