किडनी, हृदयरोग आणि श्रवणाचा त्रास असलेल्या रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
मुंबई- किडनी, हृदयरोग आणि श्रवणाचा त्रास असलेल्या रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे समोर आले आहे. मुंबईतील टाटा, केइएम, नायर, शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालयात या योजनेअंतर्गत अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जीवनदायी आरोग्य योजना राबवली जात होती. या योजनेत भ्रष्टाचार आणि लाभार्थीना मदतीसाठी कित्येक महिने थांबावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षापूर्वी राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. पहिल्या वर्षी ही योजना आठ जिल्ह्यात राबवली गेली. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. या योजनेचा सर्वात मोठा लाभ किडनीच्या रुग्णांनी घेतला आहे. यामुळेच राज्यात किडनीचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे हृदयविकारावर आवश्यक असलेली कॉरोनरी बलून अॅँजिओप्लास्टीच्या १४,६८२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
या योजनेत ९७२ आजारांचा समावेश आहे. या योजनेत रुग्णांना चांगले उपचार मिळण्यावर भर दिला जाणार जातो. अत्यंत पारदर्शी योजना ही ओळख या योजनेला मिळाली आहे. गेल्या दोन वर्षात टाटा, शीवचे लोकमान्य टिळक रुग्णालय, केईएम आणि नायर रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत झाल्या आहेत. टाटा रुग्णालयात सर्वाधिक १२,३५३, केईएममध्ये ९,९३४, जे. जे. ७,२९७, नायर ५,७५५ आणि शीवचे लोकमान्य टिळक रुग्णालयात ५,५०८ शस्त्रक्रिया झाल्या. या शस्त्रक्रियांमुळे सरकारी रुग्णालयांना कोटय़वधी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर खासगी रुग्णालयाही या योजनेचा फायदा मिळाला. ‘लालबागचा राजा डायलिसिस सेंटर’मध्ये ३,६४६ जणांनी डायलिसिस केल्याची नोंद आहे. या योजनेत रुग्णास महिन्याला ८ वेळा डायलिसिस केले जाते. तर अंधेरीच्या सेव्हन हिल्समध्येही हृदयरोगाच्याच जास्त शस्त्रक्रिया झाल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सचिव मिता राजीव लोचन यांनी ‘प्रहार’ला सांगितले.
ज्यांचे certificate आले ते नशीबवान होते. आमचा फोरम आम्ही भरून दिला पण certificate आलेच नाही, त्यामुळे सध्या आम्हाला गरज आहे, तरी ते certificate कुठे मिळेल किंवा कोणाकडे विचारायचं याची कृपया माहिती द्यावी हि विनंती.