ईव्हीएम मशिन घोटाळ्याविरोधात बोलल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांना भाजपाच्या वतीने नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
नागपूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ केल्याच्या संशयावरून संपूर्ण राज्यात आंदोलन पेटले आहे. मात्र हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी भाजपाकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून ईव्हीएम मशिन घोटाळ्याविरोधात बोलल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांना भाजपाच्या वतीने नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
नोटाबंदीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मतदारांमध्ये तीव्र नाराजी असताना भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. यामागे ईव्हीएम मशिनमध्ये घोळ केल्याचा आरोप सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. सर्वच जिल्ह्यात त्याविरोधात तीव्र आंदोलन पेटले आहे.
पुण्यात तर ईव्हीएम मशिनची अंत्ययात्राही काढण्यात आली. असे असताना भाजपाकडून मात्र केवळ काँग्रेसच्या नेत्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहे. भाजपाच्या विधी सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तिवारी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आदिवासी भागात राहणा-या आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आलेल्या मीनाक्षी बोलेनवार यांच्या वतीने नोटीस पाठवल्या आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, स्टार प्रचारक नारायण राणे, अशोक चव्हाण यांना या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशिनविरोधातील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी भाजपाच्या या उलट्या बोंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पारदर्शिता चालू आहे बाकी काय ?