पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुस-या टप्प्यातही संथगतीने सुरू असलेली आधार कार्डची प्रक्रिया दिवाळीनंतर वेगवान होणार आहे.
मुंबई – पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुस-या टप्प्यातही संथगतीने सुरू असलेली आधार कार्डची प्रक्रिया दिवाळीनंतर वेगवान होणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन आठवडय़ानंतर या संदर्भातील यंत्रे आणि कर्मचा-यांची संख्या वाढवण्याचा विचार सुरू असून प्रक्रिया व्यापक करण्यासाठी बँकांकडेही याची जबाबदारी सोपावण्यात येणार आहे. आधार कार्डची प्रक्रिया संथ असल्याने मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील अनेक रहिवाशांना आधारकार्डापासून वंचित राहावे लागले आहे. ‘प्रहार’ने दोन दिवसांपूर्वी ‘आधारच निराधार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने त्याची दखल घेतली आहे.
राज्यात सध्या आधार कार्ड संदर्भातील तीन हजार यंत्रे आहेत. त्यापैकी १५०० यंत्रे मुंबईतच आहेत. ही यंत्रे हाताळणारा कर्मचारी वर्ग अननुभवी आहे. त्याशिवाय नियंत्रण ठेवणारा समन्वयकच बेपत्ता असतो, मनाला वाटेल तेव्हा केंद्र चालवली जातात, सहा-सहा महिने आधार कार्डची प्रतीक्षा करावी लागते, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आदी समस्यांमुळे आधार कार्डची प्रक्रियेचा बो-या वाजला आहे. ‘प्रहार’ने याबाबत हल्लाबोल केल्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग आली. सध्या कार्यरत असलेल्या एजन्सीसह बँक ऑफ इंडिया, युनियन बँक यांनाही याची जबाबदारी दिली आहे. या बँका दिवाळीनंतर कामाला सुरुवात करणार आहेत, असे सामान्य प्रशासनाच्या माहिती- तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
[EPSB]
उद्देश चांगला पण..
सर्वसामान्यांना विविध कारणांनी पुराव्याची आवश्यकता भासते. परंतु केंद्र सरकारने ‘आधार’ ओळखपत्राचा आधार देऊन जनतेचा बोजा हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही ओळखपत्रे काढताना जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारने त्या दूर केल्या तर तो जनतेसाठी मोठाच दिलासा ठरेल.
[/EPSB]
govermnet should have open vacancy for this scheme then only this scheme will run fast.