आलिया का चिडते? असा प्रश्न सगळय़ांनाच पडतो. याचं उत्तर आहे, तिचं जनरल नॉलेज! मध्यंतरी तर आलियावर इतके काही विनोद आले की, ती प्रसारमाध्यमांपासून लांबच गेली.
‘कॉफी विद करन’मधून आलिया भट्टचं जनरल नॉलेज सगळय़ांनाच माहीत पडलं. तेव्हापासून आजपर्यंत आलिया केवळ ‘विनोद’ बनून राहिली आहे. सुरुवातीला तिला याचा काही फरक पडला नाही, आता याचे परिणाम मात्र तिच्यावर होऊ लागले आहेत.
अलीकडेच एका अॅवॉर्ड शोमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतानाही ती नाराज दिसली. ‘तुम्ही मला खूप मिस करत होतात ना? आता मी तुमच्यासमोरच उभी आहे. तुम्ही मला जनरल नॉलेजविषयी प्रश्न विचारू शकता. आणि माझ्यावर हसूही शकता.’ यावर एका रिपोर्टने आलियाची पुन्हा खेचली. त्याने तिला ‘महाराष्ट्रची राजधानी कोणती?’ असं विचारलं आणि आलियाचा पारा पुन्हा एकदा चढला. इतका की, त्याने हतबल होऊन चक्क शिवी हासडली आणि तेथून काढता पाय घेतला.
‘शानदार’च्या चित्रीकरणादरम्यान, शाहीद कपूरनेही तिची अशीच मस्करी केली होती. तेव्हापासून आलिया त्याच्यावरही प्रचंड चिडली आहे.
फक्त बापाच्या नावावर भाव खायचा आणखीन काय????