नगर जिल्ह्यात चार महिन्यात तब्बल ४२ कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर- कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी सरकारची धोरणे यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नगर जिल्ह्यात चार महिन्यात तब्बल ४२ कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. येथील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून निसर्ग साथ देत नाही, कधी उत्पन्न चांगले झालेच तर सरकारची धोरणे आडवी येतात. त्यामुळे येथील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली जगत आहे.
शेतक-यांनी खासगी पतसंस्था, सावकाराचे उंबरठे झिजवत जमीन, जुमला गहाण ठेवून शेतीसाठी पैसे उपलब्ध केले होते. सुदैवाने पाऊस समाधानकारक झाल्याने ज्वारी, तूर, मुग, गहू इत्यादी अन्नधान्याचे उत्पादन चांगले झाले. कांद्याचेही विक्रमी उत्पादन झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातच बोलघेवड्या सरकारने हमीभावाचे गाजर दाखवल्याने शेतकरी मनोमन सुखावला होता. मात्र कांदा बाजारात येताच भाव गडगडले. खर्च फिटेनासा झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.
शेतीचे गणित बिघडल्याने डोक्यावर कर्जाचे ओझे असलेला बळीराजा मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह, आजारपणाच्या संघर्षात खचला आहे.
निसर्ग आणि सरकारच्या चक्रव्यूहात अडकल्याने काही शेतक-यांनी गळफास, विषारी औषध सेवन करून तसेच विहिर, शेततळ्यात उडी घेवून आत्महत्या केली. १ जानेवारी २०१७ ते ३ मे २०१७ या चार महिने आणि तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४२ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हा टंचाई शाखेतून मिळाली आहे.
दरम्यान, सावकार, पतसंस्था व बँकाच्या माध्यमातून कर्ज घेवून काबाडकष्टाने पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव व कर्जमाफीसाठी सरकार अपयशी ठरल्याने शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
खरी गोस्ट आहे, साहेब मी गणेशपुर ता वरूड जिल्हा अमरावती येथील शेतकरी, माझे नाव योगेन्द्र दुहिजोड मो ९५९५९६४६४२ शिक्षण डि. एड झाले. नंतर माझ्याकडे शेती आहे म्हणून मी यूटयूब वर Abp माझा या चॅनेल चे विडिओ बघून मी शेती केली आणि पहिले वर्ष वांगी मला १ लाख ची झाली. संत्रा झाडे पण आहे पण या वर्षी संत्रा पूर्ण गळला आणि आता वांगी लावली ति पण मजूरी मला घरून द्यावी लागत आहे. कर्ज दार लोक रोज घरी येतात कंटाळून गेलो. सफल फिनान्स चे २ लाख, महिंद्रा फिनान्स चे १ लाख, बजाज १ लाख… १ बर्ष झाले आता ही लोक रोज फोन करुन धमकी सारखे बोलतात. खुप मानसिक त्रास त्यात दुकान्दरचे दिड लाख असे एकुण ६ लाख कर्ज आहे. कसे देउ, शकतो पण वेळ लागेल, पण ही लोक रोज तकादा लावतात म्हणून या त्रासामुले आणि मेहनत करुन फल आहे पण बाजारभाव नसल्याने त्रस्त झालो, या सर्व गोस्तीमुले शेतकरी आत्महत्या करत आहे. माझीही हिच अवस्था होत आहे पण शेतकरी मित्रांनो आत्महत्या करूच नका.. ही लोक काही करु शकत नाही.