सिग्नल तोडल्यास आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलल्यास आता पाच हजार दंड भरावा लागणार आहे.
नवी दिल्ली- बेफाम गाडी हाकणे, सिग्नल तोडणे, मोबाइलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे, मद्य पिऊन गाडी चालवणे आदी गुन्हे भविष्यात घडल्यास वाहन चालक व मालकाचा खिसा पूर्णपणे रिकामा होणार आहे. कारण सिग्नल तोडल्यास आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलल्यास पाच हजार दंड भरावा लागणार आहे. देशातील वाहतूक कायदा अधिक कठोर होणार असून केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा आणि वाहतूक कायदा २०१४ मधील या प्रस्तावित तरतुदी आहेत.
देशात रस्ते अपघात वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायदा करण्याचे ठरवले आहे. वाहनाने वेगमर्यादा ओलांडल्यास ५ ते १२, ५०० रुपये दंड होणार आहे. तसेच मद्यपान करून गाडी चालवल्यास १५ हजार रुपये दंड आणि दोन वर्षाचा तुरुंगवास होईल. मोबाइल फोनवर बोलणा-या आणि टीव्ही पाहणा-या चालकांना ४ ते १५ हजारांपर्यंत दंड होणार असून वाहन चालकाचा परवाना तात्पुरता रद्द होणार आहे. सीटबेल्ट न लावल्यास ५ हजार रुपये दंड तर तीन वेळा सिग्नल तोडल्यास १५ हजार दंड ठोठावला जाईल.
वाहन कंपनीच्या डिझाइनमध्ये दोष आढळल्यास त्या कंपनीला प्रत्येक वाहनामागे ५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. मद्य पिऊन गाडी चालवण्याचा पहिला गुन्हा घडल्यास १५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची कैद होईल किंवा सहा महिने परवाना रद्द होईल. हा गुन्हा पुन्हा घडल्यास परवाना रद्द करण्यात येईल.
शाळेच्या बस चालकाने मद्य पिऊन गाडी चालवल्यास त्याला ५० हजार रुपये दंड आणि तीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येईल. लहान मुलाचा गाडीखाली मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये दंड आणि किमान सात वर्षाची शिक्षा होईल, अशी तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे.
प्रस्तावित वाहन कायद्यातील कठोर तरतुदी
- मोबाइल व टीव्ही पाहताना ४ ते १५ हजार दंड
- सीटबेल्ट न लावल्यास ५ हजार दंड
- वेगमर्यादा ओलांडल्यास ५ ते १५ हजार दंड
ह्या दंडात्मक कारवाई च्या रकमे पेक्षा किती कमी रकमेत ” हात ओले ” केल्यावर चालकाची सुटका होईल ते पण सांगा ,!!!