नैना सहानी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी सुशील शर्माची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करुन जन्मठेपेमध्ये बदलली आहे.
नवी दिल्ली – संपूर्ण देशात गाजलेल्या नैना सहानी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी सुशील शर्माची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करुन जन्मठेपेमध्ये बदलली आहे. सुशील शर्माला आजन्म तुरुंगात रहावे लागणार आहे.
दोन जुलै १९९५ रोजी आरोपी सुशील शर्माने पत्नी नैना सहानीची अत्यंत क्रूर पध्दतीने हत्या केली होती. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन सुशीलने पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह तंदूरच्या भट्टीत जाळला होता. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील शर्माला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्याने या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले होते.
नैनाची गोळी झाडून हत्या केल्यानंतर सुशील मित्राच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करुन, हॉटेलमधील तंदूरच्या भट्टीत जाळत होता. तंदूरच्या भट्टीतून मोठया प्रमाणावर धूर येऊ लागल्याने त्यावेळी तिथे गस्तीवर असणा-या पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा हा भयानक गुन्हा उघडकीस आला.
हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा असल्याने २००७ मध्ये उच्च न्यायालयाने सुशील शर्माला फाशीची शिक्षा ठोठावली. नैनाचे मतलूब करीम या तिच्या मित्राबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा सुशीलला संशय होता म्हणून त्याने हत्या केली.
Any crime can do in india and relax, to get the punisment from court it will go 2o, yers to result come, no wonder why crime is incrising, thanks to the lower court, high court, suprim court and finaly Rashtrapithamaha, on going cycel