संपूर्ण जिल्ह्याची तसेच महाडची ओळख असलेले १९९० मध्ये सुरू करण्यात आलेले रायगड मिलिटरी स्कूल अखेर बंद पडले आहे.
महाड – संपूर्ण जिल्ह्याची तसेच महाडची ओळख असलेले १९९० मध्ये सुरू करण्यात आलेले रायगड मिलिटरी स्कूल अखेर बंद पडले आहे. संस्थेच्या पदाधिकारी, विश्वस्तांमधील वाद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा यामुळे रायगड मिलिटरी स्कूलचा कारभार काही वर्षापासून वादात सापडला होता. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी वर्षाताई कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेचे सरचिटणीस दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.
विश्वस्तांनी विद्यालयाच्या कामात कायम उदासीनता दाखवली होती. त्यामुळे काही वर्षापासून स्कूल बंद पडले होते. मागील झालेल्या बैठकीत स्कूल पुन्हा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र, आठवडाभरातच विद्यालय बंद करण्याची वेळ संस्थेवर ओढावली आहे. दिवंगत नानासाहेब पुरोहित यांनी मोठय़ा प्रयत्नाने हे मिलिटरी स्कूल उभे केले होते. मात्र, त्यानंतर विश्वस्त मंडळाला या शाळेचे वैभव टिकवता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना सनिकी प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने नानासाहेब पुरोहित यांनी मोठय़ा प्रयत्नाने महाडमील आचळोली गावात मिलिटरी स्कूलची उभारणी केली. सनिकी परंपरा असणा-या महाड तालुक्यातील आचळोली येथे सन १९९० मध्ये हे विद्यालय सुरू झाले. संस्थेत हिवाळी तसेच उन्हाळी अशी दोन शिबिरे घेतली जात होती. मात्र संस्थेच्या पदाधिकारी विश्वस्तांमधील वाद, ढिसाळ नियोजन, आर्थिक गैरव्यवहार, कर्जाचा वाढता बोजा यामुळे गेली काही वर्षापासून रायगड मिलिटरी स्कूल वादात सापडले होते.
संस्थेच्या विश्वस्तांनीही स्कूलकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे संस्था बंद करण्याची वेळ आली होती. त्यानंतर विद्यालय सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु ते सर्वच अयशस्वी ठरले. रायगड मिलिटरी स्कूलच्या कारभारावर विश्वस्तांचे नियंत्रण राहीले नाही. विद्यालयाच्या प्रत्येक कारभारात गरव्यवहार होत असल्याचेही आरोप झाले होते. कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीत ७० लाख रुपयांचा गरव्यवहार झाल्याचाही आरोप झाला होता. विद्यालयाच्या देणगीतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, विश्वस्तांनी कुणावरच कारवाई केली नाही. या दरम्यान विद्यार्थ्यांची पटसंख्याही ८५० हून घसरून १५० पर्यंतच खाली आली.
या विद्यालयाचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रभाकर कुंटे यांच्या निधनानंतर स्थिती आणखीनच खालावली. विश्वस्तांमध्ये वाद वाढल्याने संस्थांची बँक खाती धर्मदाय आयुक्तांनी सील केली. परिणामी अर्थिक व्यवहार थांबले कर्मचा-यांचे पगारही मिळाले नाहीत. या स्थितीवर मात करण्यासाठी ३० ते ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन २१ जून रोजी विद्यालय पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थी आणि कर्मचारी संख्या अधिक याचा ताळमेळ बसला नाही. विद्यालयाची, वसतिगृहाची दुरास्था, शिक्षकांचा अभाव, यामुळे प्रवेश घेतलेल्यांपैकी १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला त्यानंतर विद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर नमस्कार
धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई याची भरती प्रक्रिया जुलै २०१३ मध्ये झाली आतापर्यंत मुलाकात घ्येण्यात आली नाही व नियुक्त्या हि देण्यात आले नाही आम्ही फोन केला तर काम सुरु आहे, असेच सांगन्यात येते, कृपया मदत करावे, हीच विंनंती