पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संघटना आयएसआयचा हात आहे, असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे माजी सुरक्षा अधिकारी ब्रुस रिडेल यांनी केला.
वॉशिंग्टन – पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संघटना आयएसआयचा हात आहे, असा खळबळजनक आरोप अमेरिकेचे माजी सुरक्षा अधिकारी ब्रुस रिडेल यांनी केला. ही माहिती मला अत्यंत विश्वासू सूत्रांकडून मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले.
रिडेल यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत काम केले आहे. १९९९च्या कारगील युद्धाच्या काळात बिल क्लिंटन-नवाझ शरीफ यांच्यात बैठकीच्या वेळी रिडेल हे उपस्थित होते.
रिडेल म्हणाले की, पंतप्रधान मोदी व शरीफ यांच्या अचानक भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारू नयेत म्हणून हा हल्ला केला. पठाणकोट व मजार-ए-शरीफवर झालेले हल्ले हे पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’चे कारस्थान आहे. ही संघटना आयएसआयने १५ वर्षापूर्वी तयार केली होती.
आयएसआय ही संघटना लष्कराच्या अधिपत्याखाली काम करते. त्यामुळे आयएसआयचे हेर हे लष्कराअंतर्गत येतात. विशेष म्हणजे ‘जैश-ए-मोहम्मद’ व ‘लष्कर-ए-तोयबा’हे लष्कराचे आवडते असून ‘पाकिस्तानी तालिबान’ या दहशतवादी संघटना नावडत्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
१९९९ मध्ये लष्करी उठाव झाल्यानंतर शरीफ यांना लष्कराने सौदीत पाठवले होते, याची आठवण रिडेल यांनी करून दिली. सौदीमध्ये नवाझ शरीफ हे अज्ञातवासात राहात होते. आता नवाझ शरीफ यांनी मोदींचे २५ डिसेंबरला स्वागत केल्यानंतर लष्कराच्या अधिका-यांचे पित्त खवळले. त्यातुनच पठाणकोटचा हल्ल्या झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
इसे kahete हैं ” सुपर ब्रेन ” ! Bravo Brus Redel ,!