दिग्दर्शिका फराह खान सध्या ‘हॅप्पी न्यू इअर’ या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे यशस्वीतेचे नवनवे रेकॉर्ड बनवते आहे. पण या यशावर स्वार असतानाच, ती दुसरीकडे तितकीच वादातही सापडली आहे.
अन्य कोणी नाही, तर थेट कोरिओग्राफर सरोज खानच तिच्यावर चिडली आहे. फराहकडून सतत सरोज खानला टार्गेट केलं जातंय.. तिची खिल्ली उडवली जातेय. आणि त्यामुळेच सरोज फराहवर संतापली आहे.
सरोज म्हणते, ‘मला कळत नाही, फराह माझ्या मागे का पडली आहे ती? मी तर दिग्दर्शिकासुद्धा नाही, नाही मी चित्रपटसृष्टीत आहे. मी केवळ कोरिओग्राफर आहे आणि विद्यार्थ्यांना डान्स शिकवते. इतकंच काय, मी कधी फराहकडे कामसुद्धा मागायला गेलेली नाही.’ सरोज खानचं म्हणणं आहे की, फराहने तिची माफी मागावी. सरोजने टीव्ही शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्येही तिच्यावर टिप्पणी केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
कपिलसोबत मला काही देणं-घेणं नाही. तरीही ते मला त्यांच्या शोमध्ये टार्गेट का करतात कोण जाणे? त्यांना खरं तर लाज वाटली पाहिजे. त्याचं असं झालं की, ‘हॅप्पी न्यू इअर’ची टीम कपिलच्या शोमध्ये गेली होती, तेव्हा फराह खान आणि सरोज खान बनलेल्या किकूमध्ये भांडण झाल्याचं दाखवण्यात आले होतं.
सरोज म्हणते, ‘माझ्या वजनावरून मला सतत टार्गेट केलं जातं. पण कोरिओग्राफर गणेश आचार्य तर माझ्याहून जाडा आहे. त्याला का नाही टार्गेट केलं जात? खरं तर आता येऊन मला पाहा, तुम्हाला मी निश्चित फराहपेक्षा जास्त स्लिम आणि फिट दिसेन. सरोज यावरच थांबली नाही तर, ‘फराहची आता सवयच पडली आहे, दुस-यांची मजा घेण्याची. प्रथम ‘ओम शांती ओम’च्या वेळी मनोजकुमार यांना टार्गेट केलं, आता मला केलं जातंय. पण हे चुकीचं आहे, असंही ती म्हणाली.
खान खान खान ! एक दुसरेको लेके परेशान ,! ऐसा क्यू भाई ???????,