ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळून पहिले पदक मिळवून देणा-या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी भारताची शान वाढवली. खाशाबांच्या निधनानंतर इतकी वर्षे साधा पद्म पुरस्कारही न मिळणे व त्यांना हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांना संघर्ष करावा लागतो ही दुर्भाग्याची गोष्ट आहे, अशी कुस्तीप्रेमींची भावना आहे. महान अॅथलिट मिल्खा सिंग यांच्यावरील ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटामुळे देशातील धावपटूंना प्रेरणा मिळाली होती. खाशाबा यांच्या जीवनावरही चित्रपट येत असला तरी, त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालाच पाहिजे, अशी मागणी सरकारकडे केली पाहिजे का, खाशाबांना पद्म पुरस्काराऐवजी ‘भारतरत्न’ दिल्यास त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या उपेक्षेचे परिमार्जन होईल असे वाटते का, खाशाबांना भारतरत्न दिल्यास देशातील अन्य कुस्तीपटूंना त्यांचा आदर्श ठेवून देशाचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उंचावता येईल असे वाटते का?
खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’च द्या!
ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळून पहिले पदक मिळवून देणा-या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी भारताची शान वाढवली. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी सरकार दरबारी मोठय़ा प्रमाणावर मागणी होत असताना त्याची सरकारने दखल घेतली नाही. खाशाबांच्या निधनानंतर इतकी वर्षे पद्म पुरस्कार न मिळणे व त्यांना हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना संघर्ष करावा लागणे ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. त्यांच्या जीवनावरही चित्रपट येत असला तरी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला पाहिजे का, असा प्रश्न ‘प्रहार’ने वाचकांसमोर मांडला. यावर सर्व वाचकांनी एकमुखाने त्यांना ‘भारतरत्न’ मिळालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांना पद्म पुरस्काराऐवजी ‘भारतरत्न’ द्यावा. क्रिकेटपटूंना ‘भारतरत्न’ देण्याऐवजी खाशाबा जाधव यांना सरकारने भारतरत्न दिला असता तर त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन झाले असते. खाशाबा जाधव यांना भारतरत्न मिळावा यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, अशी अपेक्षाही वाचकांनी व्यक्त केली.
भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करा
सध्या भारतातील आबालवृद्धांना क्रिकेट या इंग्रजी खेळाचे जबरदस्त आकर्षण आहे. त्यामुळे खो खो, हुतुतूसारख्या देशी खेळांची पीछेहाट झाली आहे. भारत पारतंत्र्यात असताना अनेक जण अंग कमावण्यासाठी व्यायामशाळांत जात असत. त्या व्यायामशाळांजवळच्या मैदानात माती असायची. तिच्यात अनेक व्यायामपटू अंग कमावून कुस्तीत नैपुण्य मिळवत. कोल्हापूरच्या संस्थानिकांनी या खेळास बरेच प्रोत्साहन दिले. याच्यातूनच घडलेल्या खाशाबांनी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचा सामना जिंकून क्रीडा क्षेत्रात भारताचा ठसा उमटवला. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्यास सध्या दुर्लक्षित झालेल्या कुस्ती या क्रीडाप्रकाराचे अनेक भारतीय तरुण-तरुणींना आकर्षण वाटेल. परिणामी क्रिकेटचे फाजील आकर्षण कमी होऊन आपोआप त्याच्यातील गैरव्यवहारांना आळा बसेल. भारतीय संस्कृती-संवर्धन करणा-या खाशाबांसारख्या मराठी वीराला भारतरत्न मिळण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वपक्षीय मराठी खासदारांनी केंद्राकडे या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
खाशाबांची कामगिरी असामान्य
स्वतंत्र भारताचे वैयक्तिक ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव ज्या काळात भारतामध्ये अतिशय तुटपुंज्या क्रीडा सुविधा होत्या खेळांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन नव्हते. त्या काळात एका भारतीय खेळाडूने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती, मात्र १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कास्यपदक पटकावत त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव, शान उंचावली आहे. जर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला भारत सरकार खासदारकी व भारतरत्न पुरस्कार देऊ शकते तर खाशाबा जाधव-ध्यानचंद या हॉकीपटूला भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने का देऊ नये? खरे तर अशा क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याइतकी भारत सरकारला काळजी नाही, असे दिसते. – प्रवीण पाटील, भोईवाडा.
कुस्तीतील ‘हि-या’वर अन्याय
कुस्तीगीर खाशाबा जाधव या कुस्ती विश्वातल्या प्रतिकूल काळातल्या हि-याला, ‘एका तेजस्वी सूर्याला’ उपेक्षित जीवन जगत आयुष्य संपवावं लागलं नसतं. आजही आपण सर्वानी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रही मागणी केली तर त्यांचा आतापर्यंत झालेल्या उपेक्षेचे फक्त परिमार्जनच होणार नाही, तर क्रीडाक्षेत्रातल्या आणि कलाक्षेत्रातल्या असामान्यांना प्रेरणा मिळेल. त्यांचा आदर्श समोर ठेवून ते देशाला व क्रीडा क्षेत्राला जगात सर्वोच्च प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच पूर्ण क्षमतेने प्रयत्न करतील. सध्याचे कुस्तीपटू ऑलिंपिकमध्ये भारताला अग्रस्थान मिळवून देऊ शकतील.- सी. के. बावस्कर, परळ
जाधव यांना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवा
‘भारतरत्न’सारख्या मोठय़ा पुरस्काराकडे आपण जात, धर्म, भाषा, प्रांत, पक्ष यांच्यापलीकडे जाऊन पाहायला व विचार करायला शिकलं पाहिजे. मात्र खाशाबा जाधव राजकारणाचे शिकार ठरले. ते स्वत:च्या हिमतीवर व स्वखर्चाने, फिनलँडमध्ये जाऊन कुस्तीत पहिले ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे.. त्याकाळी कोणतीही सुविधा, पुरस्कर्ता नसताना तसेच परदेशात जाण्यासाठी पैशाचा ताळमेळ कसातरी पै-पैसा जमवून खाशाबा तेथे पोहोचले. स्वत:चा पैलू दाखवण्याची त्यांची अभिलाषा, हिंमत वाखाणण्याजोगी होती. पूर्वी प्रसारमाध्यमे तुटपुंजी आणि आजच्यासारखी प्रगत नव्हती, त्यामुळे खाशाबा जाधव यांच्या कामगिरीला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही हे या मराठी माणसाचं दुर्दैवच. मात्र जाधव यांच्यावर प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रातूनही म्हणाव्या तितक्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नाही. मात्र आता ‘प्रहार’ने खाशाबांना ‘भारतरत्न’मिळावा यासाठी मारलेला ‘प्रहार’ अचूक ध्येय गाठेल यात वाद नाही. – दिलीप अक्षेकर, माहीम
खाशाबा कुस्तीप्रेमींच्या हृदयात
भारतीय कुस्तीगिरांनी अगदी प्राचीन काळापासून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मराठी माणसाची ओळख ही त्याच्या रांगडेपणावरून होते तशी ती कुस्तीवरूनही होते. मात्र कुस्ती आणि मराठी माणूस यांच्या नशिबी सतत उपेक्षाच येते. १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात बॅटमवेट वजनी गटात कास्यपदक मिळवून देणा-या खाशाबा जाधव यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली नाही. खाशाबांनी ऐतिहासिक कामगिरी करूनही प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारापासून त्यांना वंचित ठेवल्यामुळे खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. लोकसभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खाशाबांना मरणोत्तर पुरस्कार मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करूनही त्यांचा विचार झाला नाही. १९९६च्या ऑलिंपिकनंतर सर्व पदक विजेत्यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु खाशाबा यांचे १९८४ मध्येच निधन झाल्यामुळे त्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नाही. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, असा गृहमंत्रालयाचा नियम पुढे करण्यात आला. कुस्ती हा अस्सल मऱ्हाटमोळ्या मातीतला खेळ खाशाबानंतर एकाही मराठी कुस्तीगिराला ऑलिंपिक पदक मिळवता आले नाही, परंतु ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवणा-या खाशाबा यांच्या पुत्राला अर्जुन पुरस्कारासाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागले. आणि आज पद्म पुरस्कारासाठी तेच करावे लागत आहे. त्यासाठी नियम आडवे येत आहेत, परंतु नियम हे व्यक्तीसाठी असतात की व्यक्ती ही नियमासाठी असते, याचा बौद्धिक विचार करणारी ही नोकरशाही म्हणावी लागत आहे. वास्तविक खाशाबांची कामगिरी ही भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र ठरणारी आहेच. पण त्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांनी स्थान पटकावले आहे. – शिवदास शिरोडकर, लालबाग
‘भारतरत्न’ची ऊठसूट मागणी अयोग्य!
‘भारतरत्न’ हा किताब कुणास द्यावा, हे राष्ट्रपतींच्या हाती आहे. जो-तो उठतोय तो ‘भारतरत्न’ची मागणी करतोय. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. ऑलिंपिकमध्ये कुस्तीक्षेत्रात खाशाबा जाधव, हॉकीक्षेत्रात ध्यानचंद, महान अॅथलिट मिल्खा सिंग यांनी भारताची शान वाढवली हे खरे सत्य आहे. या सर्वाच्या जीवनावर चित्रपट येत असले तरी ‘भारतरत्न’ साठी मागणी करणे हा एक वेगळाच भाग वाटतोय. आजच्या युगात सचिन तेंडुलकर यांच्याबाबत ‘भारतरत्न’वरून किती वाद निर्माण झालेत. क्रीडा क्षेत्रात पूर्वी असे किताब दिले जात नसत. आता ही पद्धत सुरू झाली आहे. राष्ट्रपती यावर विचार करतील अशी आशा ठेवू या. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी
वारसदारांनी देशाचे नाव उंचावले का?
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले ऑलिंपिकपदक कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना ६० वर्षापूर्वी मिळाले त्याचा आम्हा भारतीयांना निश्चितच अभिमान आहे. मात्र त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या वारसदारांनी देशाचे नाव उंचावण्यासाठी काय कामगिरी केली की त्यांनी खाशाबांच्या नावावर पद्म/भारतरत्न पुरस्कार मागावा. हा पुरस्कार म्हणजे वारसाहक्काची जमीन नव्हे. पद्म/ भारतरत्न हे मरणोत्तर पुरस्कार आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेले आहेत. परत असा अपवाद करायचा झाल्यास महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा अनेक स्वातंत्र्यसेनानींची यादी सरकारपुढे राहील. हा पुरस्कार खिरापतीसारखा वाटायचा आहे का? खाशाबांना द्यायचा, मग मेजर ध्यानचंदना का नको? त्यांनी तर भारताला तीनवेळा हॉकीचे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. सध्याच्या कुस्तीगीरांनी ऑलिंपिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून पद्म पुरस्कार मिळवून दाखवावेत. तीच खरी खाशाबांसाठी आदरांजली ठरेल. ते पुरस्कार त्यांनी खाशांबाच्या स्मृतीला अर्पण करावेत. – सुधीर देशपांडे, विलेपार्ले
खाशाबांचे यश निर्विवाद!
होय, कुस्तीगीर खाशाबा जाधव खरोखरीच ‘भारतरत्न’चे मानकरी आहेत. १९५२ साली त्यांनी कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवून दिले. ही खरोखरीच नवलाची गोष्ट आहे. स्व. खाशाबा यांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवल्यावर ४० वर्षे देशाच्या पाटीवर कुस्तीच्या स्पर्धेत एकही पदक नव्हते. एक वेळ तर मोठा गाजावाजा करीत ४५० खेळाडूंचा चमू पाठवूनही मोकळ्या हाताने परतावे लागले होते. त्यानंतर मात्र कधी रजत तर कधी कास्यपदकाची कमाई हाती लागली. आजही एक-दोन पदकांच्या पुढे आपली मजल गेली नाही. त्यामुळे खाशाबा जाधव यांचे यश निर्विवाद आहे आणि ते ‘भारतरत्न’ पदासाठी योग्य आहे. – शंकर पानसरे, काळाचौकी
‘खाशाबांना ‘भारतरत्न’ द्या
केंद्र सरकारने निश्चित केले होते की कोणत्याही खेळाडूस ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले जाणार नाहीत व कालपर्यंत कोणत्याही खेळाडूस या पुरस्काराने गौरवण्यात आले नाही, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकर यास ‘भारतरत्न’ देऊन गौरवले. तेंडुलकर एक महान खेळाडू आहे व होता यात कुणाचेही दुमत असणार नाही, परंतु त्याआधी कुस्तीगीर खाशाबा जाधव, महान अॅथलिट मिल्खासिंग यांनी केलेली महान कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्या क्षेत्रात महान कामगिरी करून कीर्तिमान झाला आहे. मग एका खेळाडूस न्याय व दुस-या खेळाडूवर अन्याय हे योग्य नाही. खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळून पहिले पदक भारतास मिळवून दिले होते. खरे म्हणजे त्याच वेळेस त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने गौरवणे योग्य ठरले असते. तसे झाले असते तर आज कुस्ती क्षेत्रात वेगळाच परिणाम दिसून आला असता. – लक्ष्मण टिकार, मालाड
खाशाबा उपेक्षित राहिले
खाशाबा जाधव आणि सचिन तेंडुलकर या दोघांनीही जगात भारताची मान उंचावली. कोणीही कोणताच वाद करणे योग्य नाही. पण क्रिकेटकडे जेवढे लक्ष दिले जाते, त्यात जेवढा खर्च करून जाहिरात केली जाते, तेवढी मात्र इतर खेळ व खेळाडूंना दिली जात नाही. ते नेहमीच उपेक्षित राहतात. खाशाबा जाधवांच्या निधनानंतरही साधा पद्म पुरस्कार जाहीर केला नाही. याची भरपाई व्हावी व त्यांना ‘भारतरत्न’ प्रथम द्यावे. त्यात त्यांचा सन्मान होईल व कुस्तीपटूंचा उत्साहही वाढेल.- मयूर ढोलम, जोगेश्वरी
खाशाबांवर अन्याय
सचिन तेंडुलकरच्या निमित्ताने ‘भारतरत्न’ दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजले. जनरेटय़ाच्या प्रभावामुळे केंद्र सरकारलाही ‘भारतरत्न’ प्रदान पद्धतीच्या निकषांत बदल करून त्यात क्रीडा क्षेत्र सामील करावे लागले. अमक्या एकाला ‘भारतरत्न’ बहाल करा, अशा आशयाची मागणी वाढत चालल्याने निव्वळ सामाजिक योगदानाच्या गुणवत्तेवर ‘भारतरत्न’साठी केली जाणारी निवड वादाच्या भोव-यात सापडते की काय, अशी शंका वाटू लागली आहे. ‘भारतरत्न’ची झळाळी झाकोळून जाऊ नये असे वाटत असेल तर तितक्याच अत्युच्च पातळीच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ‘भारतरत्न’ने व्हावा. खाशाबा जाधव हे महाराष्ट्राच्या कुस्ती आखाडय़ातील शान आहेत. ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे ते झुंजार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात त्यांना सन्माननीय पुरस्कार प्रदान केला जाऊ नये ही निश्चितच गंभीर बाब आहे. यापायीच उद्वेगाने त्यांच्या कुटुंबीयांकडून ऑलिंपिक पदक सागरार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गडगंज पैसा कमावणा-या खेळाडूंचा उच्चतम पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो. मग खाशाबांना ‘भारतरत्न’ प्रदान करून त्यांच्या दिव्य कामगिरीचा मरणोत्तर गौरव केल्यास एका सच्च्या भारतीय सुपुत्राच्या आत्म्यास शांती तरी लाभेल! – भगवान पवार, कालवंड-परुळे (सिंधुदुर्ग)
खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ मिळणार का?
खाशाबा जाधव यांच्यासारख्या कुस्तीगिराने प्रतिकूल काळात स्वत:च्या हिमतीवर, स्वबळावर व स्वखर्चावर ऑलिंपिकमध्ये कास्यपदक जिंकले. त्यामुळे आपल्या भारताचे नाव उंचावले, पण आपल्या देशातील काही राज्यकर्त्यांनी म्हणा किंवा काही आपमतलबी लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यासाठी काही नियम दाखवले जातात. पण क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ बहाल करताना कायद्यात बदल करण्यात आला. असे का? अॅथलिट मिल्खा सिंग, ध्यानचंद यांनीही आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली, पण त्यांच्यासाठी कोणी उभे राहिले नाही किंवा त्यांना ‘भारतरत्न’ किताब मिळाला नाही. मात्र मेहनत, जिद्द, आणि स्वखर्चावर ऑलिंपिकमध्ये कास्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ किताब मिळेल का? – प्रथमेश चिपळूणकर, वडाळा
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
खाशाबांना भारतरत्न नाही, ही शोकांतिका
भारत आता स्वातंत्र्याच्या सत्तरीकडे झुकला. पाणी बरेच पुलाखालून गेले. तुर्तास तरी सर्वच क्षेत्रांमध्ये भारत आघाडीवर आहे. विज्ञानाची कास धरून आपण अंतराळातही मजल मारली. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनीदेखील इतिहास घडवला. अर्थ, वाणिज्य, शैक्षणिक, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात भारताने आता आघाडी घेतलेली आहे, मात्र क्रिकेट वगळता इतर कुठल्याही खेळाला इथे महत्त्व दिले जात नाही. क्रिकेटमध्ये सकस असे राजकारण घुसल्यामुळे तेथेही ब-याच घडामोडी घडताना दिसतात. राहता राहिला प्रश्न आदरणीय खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ हा किताब मिळावा का? मुळात सरकारला हा प्रश्न पडावा यासारखी दुसरी कुठलीही शोकांतिका नसावी. कुस्तीसारख्या खेळाला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवणा-या खाशाबा जाधव यांना खरं तर हा बहुमान निदान मरणोत्तर तरी मिळावा ही समस्त भारतवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याने पाठपुरावा करावा. आपल्या देशात कुठलीही नवीन गोष्ट करताना त्यात राजकीय हस्तक्षेप हा आलाच. त्यामुळे खाशाबांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कुणी उदारमताने पुढे येईल हे निश्चित सांगता येणार नाही. तरीही तो मिळावा ही समस्त भारतीयांची इच्छा आहे. – संजय जाधव, सांताक्रूझ
खाशाबा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या
खाशाबा जाधव हे भारतातील पहिले कुस्तीगीर.. ऑलिंपिक पदक जिंकणारे एकमेव भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकले आणि भारताच्या सन्मानात भर घातली. त्यांचा हा भीमपराक्रम कित्येक वर्षे अबाधित राहिला आहे. दुर्दैवाने त्यांचा हा पराक्रम सरकारने कित्येक वर्षे दुर्लक्षून त्यांचा सन्मान योग्य वेळी केला नाही. आपलेच सरकार, आपलेच कायदे आणि आपल्याच माणसाला पुरस्कारावाचून उपेक्षित ठेवले जाते हा दुर्दैवी विनोद म्हणावा का? तेंडुलकरसारख्या व्यावसायिक खेळाडूंसाठी कायद्यात बदल करून ‘भारतरत्न’ बहाल करण्यासाठी सरकारकडे शिफारशी केल्या जातात. वास्तविक क्रिकेट हा ऑलिंपिकमधला खेळ नाही. तरीही तेंडुलकरचे नाव पुढे केले जाते. ही एक सरकारची राजकीय स्वार्थी खेळी समजावे का? ज्या काळात खेळांना व्यावसायिकतेचा स्पर्शही झाला नव्हता अशा काळात खाशाबा जाधव यांनी पोटाला चिमटा लावून जीवापाड मेहनत घेऊन देशाला पहिले कुस्तीगीर ऑलिंपिक पदक मिळवून दिले. त्यांना इतकी वर्षे उपेक्षित का ठेवले जात आहे, कोण आहेत याच्या मागे, ही एक अतिशय उद्विग्न करणारी बाब आहे. सध्याच्या कुस्तीगीरांची ऑलिंपिकमधील सुमार कामगिरी बघता सरकारने खरोखर खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार द्यावा. यामुळे जे नवतरुण कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी तयारी करत आहेत, त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
संतोष जाधव, जोगेश्वरी
खाशाबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे
भारतात क्रिकेटचा जरा जास्तच गवगवा होत असतो, यामुळे सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यावरून जे वादळ उठले याला आक्षेप घेणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये जी कामगिरी केली आहे ती विसरणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच केल्यासारखे होईल. कारण आजच्या काळात सर्वच खेळांमध्ये अनेक सुखसोयी झाल्यामुळे निरनिराळे उच्चांक निर्माण करणे सर्वच खेळामध्ये सहज शक्य होत असते, परंतु जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, जुन्या काळी कमी सोयीसुविधा असतानाही जाधवांनी केलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. जर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देता येत असेल तर खाशाबा जाधवांना भारतरत्न मिळालेच पाहिजे. यात कोणताही वाद असू नये. आता तरी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची सरकारनेच नव्हे तर जनतेनेही पुढाकार घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाच पाहिजे. – चंद्रकात अंभिरे, विरार
यथोचित गौरव व्हावा
गेल्या काही वर्षापासून विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करून जगात देशाचे नाव उज्वल करणा-या व्यक्तींना पद्मपासून भारतरत्नपर्यंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. हे पुरस्कार देताना भारत सरकार अनेकदा विविध समज-गैरसमजामुळे वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी भाजपने सत्तेवर असताना टीकेचे लक्ष्य टाळून पुरस्कारांची खिरापत वाटण्याची प्रथाच बंद केली होती. वास्तविक हे पुरस्कार जाहीर करताना क्रीडाक्षेत्राचा समावेश नव्हता, परंतु आता मात्र क्रीडाक्षेत्रसुद्धा यात समाविष्ट झाले आहे. खाशाबा जाधवांप्रमाणे देशी-विदेशी खेळांमध्ये देशाला नावलौकिक प्राप्त करून दिलेल्या अनेक खेळाडूंना डावलून केवळ तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने गौरवून सरकारने इतर नामवंत खेळाडूंवर अन्याय केला आहे. देशी खेळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना अस्सल भारतीय बाज असलेल्या खेळाला खाशाबांनी ऑलिंपिकमध्ये स्थानच नव्हे तर कास्यपदक- सुवर्णपदक मिळवून जगात भारताचे नाव उज्ज्वल केले, ते अमाप पैसा, प्रसिद्ध मिळविण्यासाठी नव्हे, ते देशासाठी खेळले. आज अल्पविजय मिळविणा-या खेळाडूंवरसुद्धा सरकार मोफत घरे, नोक-या, बढती, अत्युच्च मानसन्मान, भूदान आदी बहाल करून डोक्यावर घेते, पण देशी खेळ आणि खेळाडूंवर अन्याय करते. अनेक खेळाडूंची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते. तरीही ते परिस्थितीवर मात करीत देशाचे नाव उज्ज्वल करीत असतात. वास्तविक महाराष्ट्र शासनानेच खाशाबा जाधव हयात असतानाच त्यावेळी भारत सरकारला शिफारस करावयास हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्या पश्चात योग्य तो मरणोत्तर सन्मान, स्मारक, टपाल तिकीट, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन देऊन त्यांचा आदर्श इतर खेळाडूंसमोर ठेवावा.- कमलाकर गुर्जर, कळवा
खाशाबांवर अन्याय का?
कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव भारतातील पहिले खेळाडू आहेत. त्यांनी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकले आहे. खाशबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून भारताच्या सन्मानात भर घातली. त्यांचा हा पराक्रम कित्येक वर्षे कोणालाही मोडता आलेला नाही, ही समाधानाची बाब आहे, पण दुर्दैवाने त्यांचा हा पराक्रम सरकारने लक्षात घेतलेला दिसत नाही. कारण खाशाबा हयात असताना त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार देणे आवश्यक होते पण साधा पद्म पुरस्कार देण्याचे औदार्य सरकारने दाखवले नाही, ही शरमेची गोष्ट आहे. केंद्र आणि राज्य सरकार क्रीडापटूंना विविध पुरस्कार देते. केंद्र सरकार पद्म आदी सर्वोच्च पुरस्कार देते, पण राज्य सरकारने खाशाबांना चांगला पुरस्कार देऊन त्यांच्या सर्वोच्च कामगिरीची ‘त्याच वेळी’ दखल घेतली असती तर उचित झाले असते. मात्र तसे झाले नाही. खाशाबांवर अन्याय झाला. निदान राज्य सरकारने खाशाबांच्या कामगिरीची स्वत:हून दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करणे योग्य ठरले असते. त्यांच्या मुलाने रणजित जाधव यांच्यासह सातारा, कोल्हापूर परिसरातील कुस्तीपटूंना यावर आवाज उठवल्यावर सरकारला जाग आली आहे. केंद्र सरकारने आता तरी जागे होऊन खाशाबांना भारतरत्न जाहीर करावा. मरणोत्तर भारतरत्न देता येत नाही, असे नियम सांगतो पण ही बाब वेगळी (स्पेशल केस) समजून त्यांना भारतरत्न द्यावा. यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पाठपुरावा केलाच पाहिजे. खाशाबांना भारतरत्न दिल्यास त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन होईल. – मुग्धा मौजे, सीबीडी, बेलापूर
खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’च द्या!
ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळून पहिले पदक मिळवून देणा-या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी भारताची शान वाढवली. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी सरकार दरबारी मोठय़ा प्रमाणावर मागणी होत असताना त्याची सरकारने दखल घेतली नाही. खाशाबांच्या निधनानंतर इतकी वर्षे पद्म पुरस्कार न मिळणे व त्यांना हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना संघर्ष करावा लागणे ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. त्यांच्या जीवनावरही चित्रपट येत असला तरी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला पाहिजे का, असा प्रश्न ‘प्रहार’ने वाचकांसमोर मांडला. यावर सर्व वाचकांनी एकमुखाने त्यांना ‘भारतरत्न’ मिळालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यांना पद्म पुरस्काराऐवजी ‘भारतरत्न’ द्यावा. क्रिकेटपटूंना ‘भारतरत्न’ देण्याऐवजी खाशाबा जाधव यांना सरकारने भारतरत्न दिला असता तर त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन झाले असते. खाशाबा जाधव यांना भारतरत्न मिळावा यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, अशी अपेक्षाही वाचकांनी व्यक्त केली.
भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करा
सध्या भारतातील आबालवृद्धांना क्रिकेट या इंग्रजी खेळाचे जबरदस्त आकर्षण आहे. त्यामुळे खो खो, हुतुतूसारख्या देशी खेळांची पीछेहाट झाली आहे. भारत पारतंत्र्यात असताना अनेक जण अंग कमावण्यासाठी व्यायामशाळांत जात असत. त्या व्यायामशाळांजवळच्या मैदानात माती असायची. तिच्यात अनेक व्यायामपटू अंग कमावून कुस्तीत नैपुण्य मिळवत. कोल्हापूरच्या संस्थानिकांनी या खेळास बरेच प्रोत्साहन दिले. याच्यातूनच घडलेल्या खाशाबांनी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचा सामना जिंकून क्रीडा क्षेत्रात भारताचा ठसा उमटवला. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्यास सध्या दुर्लक्षित झालेल्या कुस्ती या क्रीडाप्रकाराचे अनेक भारतीय तरुण-तरुणींना आकर्षण वाटेल. परिणामी क्रिकेटचे फाजील आकर्षण कमी होऊन आपोआप त्याच्यातील गैरव्यवहारांना आळा बसेल. भारतीय संस्कृती-संवर्धन करणा-या खाशाबांसारख्या मराठी वीराला भारतरत्न मिळण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वपक्षीय मराठी खासदारांनी केंद्राकडे या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
खाशाबांची कामगिरी असामान्य
स्वतंत्र भारताचे वैयक्तिक ऑलिंपिकपदक विजेते खाशाबा जाधव ज्या काळात भारतामध्ये अतिशय तुटपुंज्या क्रीडा सुविधा होत्या खेळांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन नव्हते. त्या काळात एका भारतीय खेळाडूने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणे ही सोपी गोष्ट नव्हती, मात्र १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कास्यपदक पटकावत त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव, शान उंचावली आहे. जर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला भारत सरकार खासदारकी व भारतरत्न पुरस्कार देऊ शकते तर खाशाबा जाधव-ध्यानचंद या हॉकीपटूला भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने का देऊ नये? खरे तर अशा क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याइतकी भारत सरकारला काळजी नाही, असे दिसते. – प्रवीण पाटील, भोईवाडा.
कुस्तीतील ‘हि-या’वर अन्याय
कुस्तीगीर खाशाबा जाधव या कुस्ती विश्वातल्या प्रतिकूल काळातल्या हि-याला, ‘एका तेजस्वी सूर्याला’ उपेक्षित जीवन जगत आयुष्य संपवावं लागलं नसतं. आजही आपण सर्वानी त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रही मागणी केली तर त्यांचा आतापर्यंत झालेल्या उपेक्षेचे फक्त परिमार्जनच होणार नाही, तर क्रीडाक्षेत्रातल्या आणि कलाक्षेत्रातल्या असामान्यांना प्रेरणा मिळेल. त्यांचा आदर्श समोर ठेवून ते देशाला व क्रीडा क्षेत्राला जगात सर्वोच्च प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच पूर्ण क्षमतेने प्रयत्न करतील. सध्याचे कुस्तीपटू ऑलिंपिकमध्ये भारताला अग्रस्थान मिळवून देऊ शकतील.- सी. के. बावस्कर, परळ
जाधव यांना ‘भारतरत्न’ मिळायलाच हवा
‘भारतरत्न’सारख्या मोठय़ा पुरस्काराकडे आपण जात, धर्म, भाषा, प्रांत, पक्ष यांच्यापलीकडे जाऊन पाहायला व विचार करायला शिकलं पाहिजे. मात्र खाशाबा जाधव राजकारणाचे शिकार ठरले. ते स्वत:च्या हिमतीवर व स्वखर्चाने, फिनलँडमध्ये जाऊन कुस्तीत पहिले ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे.. त्याकाळी कोणतीही सुविधा, पुरस्कर्ता नसताना तसेच परदेशात जाण्यासाठी पैशाचा ताळमेळ कसातरी पै-पैसा जमवून खाशाबा तेथे पोहोचले. स्वत:चा पैलू दाखवण्याची त्यांची अभिलाषा, हिंमत वाखाणण्याजोगी होती. पूर्वी प्रसारमाध्यमे तुटपुंजी आणि आजच्यासारखी प्रगत नव्हती, त्यामुळे खाशाबा जाधव यांच्या कामगिरीला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही हे या मराठी माणसाचं दुर्दैवच. मात्र जाधव यांच्यावर प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रातूनही म्हणाव्या तितक्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नाही. मात्र आता ‘प्रहार’ने खाशाबांना ‘भारतरत्न’मिळावा यासाठी मारलेला ‘प्रहार’ अचूक ध्येय गाठेल यात वाद नाही. – दिलीप अक्षेकर, माहीम
खाशाबा कुस्तीप्रेमींच्या हृदयात
भारतीय कुस्तीगिरांनी अगदी प्राचीन काळापासून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मराठी माणसाची ओळख ही त्याच्या रांगडेपणावरून होते तशी ती कुस्तीवरूनही होते. मात्र कुस्ती आणि मराठी माणूस यांच्या नशिबी सतत उपेक्षाच येते. १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात बॅटमवेट वजनी गटात कास्यपदक मिळवून देणा-या खाशाबा जाधव यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली नाही. खाशाबांनी ऐतिहासिक कामगिरी करूनही प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारापासून त्यांना वंचित ठेवल्यामुळे खाशाबांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. लोकसभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खाशाबांना मरणोत्तर पुरस्कार मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करूनही त्यांचा विचार झाला नाही. १९९६च्या ऑलिंपिकनंतर सर्व पदक विजेत्यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले, परंतु खाशाबा यांचे १९८४ मध्येच निधन झाल्यामुळे त्यांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला नाही. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, असा गृहमंत्रालयाचा नियम पुढे करण्यात आला. कुस्ती हा अस्सल मऱ्हाटमोळ्या मातीतला खेळ खाशाबानंतर एकाही मराठी कुस्तीगिराला ऑलिंपिक पदक मिळवता आले नाही, परंतु ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवणा-या खाशाबा यांच्या पुत्राला अर्जुन पुरस्कारासाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागले. आणि आज पद्म पुरस्कारासाठी तेच करावे लागत आहे. त्यासाठी नियम आडवे येत आहेत, परंतु नियम हे व्यक्तीसाठी असतात की व्यक्ती ही नियमासाठी असते, याचा बौद्धिक विचार करणारी ही नोकरशाही म्हणावी लागत आहे. वास्तविक खाशाबांची कामगिरी ही भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र ठरणारी आहेच. पण त्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांनी स्थान पटकावले आहे. – शिवदास शिरोडकर, लालबाग
‘भारतरत्न’ची ऊठसूट मागणी अयोग्य!
‘भारतरत्न’ हा किताब कुणास द्यावा, हे राष्ट्रपतींच्या हाती आहे. जो-तो उठतोय तो ‘भारतरत्न’ची मागणी करतोय. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. ऑलिंपिकमध्ये कुस्तीक्षेत्रात खाशाबा जाधव, हॉकीक्षेत्रात ध्यानचंद, महान अॅथलिट मिल्खा सिंग यांनी भारताची शान वाढवली हे खरे सत्य आहे. या सर्वाच्या जीवनावर चित्रपट येत असले तरी ‘भारतरत्न’ साठी मागणी करणे हा एक वेगळाच भाग वाटतोय. आजच्या युगात सचिन तेंडुलकर यांच्याबाबत ‘भारतरत्न’वरून किती वाद निर्माण झालेत. क्रीडा क्षेत्रात पूर्वी असे किताब दिले जात नसत. आता ही पद्धत सुरू झाली आहे. राष्ट्रपती यावर विचार करतील अशी आशा ठेवू या. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी
वारसदारांनी देशाचे नाव उंचावले का?
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले ऑलिंपिकपदक कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना ६० वर्षापूर्वी मिळाले त्याचा आम्हा भारतीयांना निश्चितच अभिमान आहे. मात्र त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या वारसदारांनी देशाचे नाव उंचावण्यासाठी काय कामगिरी केली की त्यांनी खाशाबांच्या नावावर पद्म/भारतरत्न पुरस्कार मागावा. हा पुरस्कार म्हणजे वारसाहक्काची जमीन नव्हे. पद्म/ भारतरत्न हे मरणोत्तर पुरस्कार आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेले आहेत. परत असा अपवाद करायचा झाल्यास महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा अनेक स्वातंत्र्यसेनानींची यादी सरकारपुढे राहील. हा पुरस्कार खिरापतीसारखा वाटायचा आहे का? खाशाबांना द्यायचा, मग मेजर ध्यानचंदना का नको? त्यांनी तर भारताला तीनवेळा हॉकीचे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. सध्याच्या कुस्तीगीरांनी ऑलिंपिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून पद्म पुरस्कार मिळवून दाखवावेत. तीच खरी खाशाबांसाठी आदरांजली ठरेल. ते पुरस्कार त्यांनी खाशांबाच्या स्मृतीला अर्पण करावेत. – सुधीर देशपांडे, विलेपार्ले
खाशाबांचे यश निर्विवाद!
होय, कुस्तीगीर खाशाबा जाधव खरोखरीच ‘भारतरत्न’चे मानकरी आहेत. १९५२ साली त्यांनी कुस्तीमध्ये भारताला पदक मिळवून दिले. ही खरोखरीच नवलाची गोष्ट आहे. स्व. खाशाबा यांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवल्यावर ४० वर्षे देशाच्या पाटीवर कुस्तीच्या स्पर्धेत एकही पदक नव्हते. एक वेळ तर मोठा गाजावाजा करीत ४५० खेळाडूंचा चमू पाठवूनही मोकळ्या हाताने परतावे लागले होते. त्यानंतर मात्र कधी रजत तर कधी कास्यपदकाची कमाई हाती लागली. आजही एक-दोन पदकांच्या पुढे आपली मजल गेली नाही. त्यामुळे खाशाबा जाधव यांचे यश निर्विवाद आहे आणि ते ‘भारतरत्न’ पदासाठी योग्य आहे. – शंकर पानसरे, काळाचौकी
‘खाशाबांना ‘भारतरत्न’ द्या
केंद्र सरकारने निश्चित केले होते की कोणत्याही खेळाडूस ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले जाणार नाहीत व कालपर्यंत कोणत्याही खेळाडूस या पुरस्काराने गौरवण्यात आले नाही, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकर यास ‘भारतरत्न’ देऊन गौरवले. तेंडुलकर एक महान खेळाडू आहे व होता यात कुणाचेही दुमत असणार नाही, परंतु त्याआधी कुस्तीगीर खाशाबा जाधव, महान अॅथलिट मिल्खासिंग यांनी केलेली महान कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्या क्षेत्रात महान कामगिरी करून कीर्तिमान झाला आहे. मग एका खेळाडूस न्याय व दुस-या खेळाडूवर अन्याय हे योग्य नाही. खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळून पहिले पदक भारतास मिळवून दिले होते. खरे म्हणजे त्याच वेळेस त्यांना ‘भारतरत्न’ किताबाने गौरवणे योग्य ठरले असते. तसे झाले असते तर आज कुस्ती क्षेत्रात वेगळाच परिणाम दिसून आला असता. – लक्ष्मण टिकार, मालाड
खाशाबा उपेक्षित राहिले
खाशाबा जाधव आणि सचिन तेंडुलकर या दोघांनीही जगात भारताची मान उंचावली. कोणीही कोणताच वाद करणे योग्य नाही. पण क्रिकेटकडे जेवढे लक्ष दिले जाते, त्यात जेवढा खर्च करून जाहिरात केली जाते, तेवढी मात्र इतर खेळ व खेळाडूंना दिली जात नाही. ते नेहमीच उपेक्षित राहतात. खाशाबा जाधवांच्या निधनानंतरही साधा पद्म पुरस्कार जाहीर केला नाही. याची भरपाई व्हावी व त्यांना ‘भारतरत्न’ प्रथम द्यावे. त्यात त्यांचा सन्मान होईल व कुस्तीपटूंचा उत्साहही वाढेल.- मयूर ढोलम, जोगेश्वरी
खाशाबांवर अन्याय
सचिन तेंडुलकरच्या निमित्ताने ‘भारतरत्न’ दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजले. जनरेटय़ाच्या प्रभावामुळे केंद्र सरकारलाही ‘भारतरत्न’ प्रदान पद्धतीच्या निकषांत बदल करून त्यात क्रीडा क्षेत्र सामील करावे लागले. अमक्या एकाला ‘भारतरत्न’ बहाल करा, अशा आशयाची मागणी वाढत चालल्याने निव्वळ सामाजिक योगदानाच्या गुणवत्तेवर ‘भारतरत्न’साठी केली जाणारी निवड वादाच्या भोव-यात सापडते की काय, अशी शंका वाटू लागली आहे. ‘भारतरत्न’ची झळाळी झाकोळून जाऊ नये असे वाटत असेल तर तितक्याच अत्युच्च पातळीच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ‘भारतरत्न’ने व्हावा. खाशाबा जाधव हे महाराष्ट्राच्या कुस्ती आखाडय़ातील शान आहेत. ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारे ते झुंजार व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात त्यांना सन्माननीय पुरस्कार प्रदान केला जाऊ नये ही निश्चितच गंभीर बाब आहे. यापायीच उद्वेगाने त्यांच्या कुटुंबीयांकडून ऑलिंपिक पदक सागरार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गडगंज पैसा कमावणा-या खेळाडूंचा उच्चतम पुरस्कारासाठी विचार केला जाऊ शकतो. मग खाशाबांना ‘भारतरत्न’ प्रदान करून त्यांच्या दिव्य कामगिरीचा मरणोत्तर गौरव केल्यास एका सच्च्या भारतीय सुपुत्राच्या आत्म्यास शांती तरी लाभेल! – भगवान पवार, कालवंड-परुळे (सिंधुदुर्ग)
खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ मिळणार का?
खाशाबा जाधव यांच्यासारख्या कुस्तीगिराने प्रतिकूल काळात स्वत:च्या हिमतीवर, स्वबळावर व स्वखर्चावर ऑलिंपिकमध्ये कास्यपदक जिंकले. त्यामुळे आपल्या भारताचे नाव उंचावले, पण आपल्या देशातील काही राज्यकर्त्यांनी म्हणा किंवा काही आपमतलबी लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यासाठी काही नियम दाखवले जातात. पण क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ बहाल करताना कायद्यात बदल करण्यात आला. असे का? अॅथलिट मिल्खा सिंग, ध्यानचंद यांनीही आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली, पण त्यांच्यासाठी कोणी उभे राहिले नाही किंवा त्यांना ‘भारतरत्न’ किताब मिळाला नाही. मात्र मेहनत, जिद्द, आणि स्वखर्चावर ऑलिंपिकमध्ये कास्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ किताब मिळेल का? – प्रथमेश चिपळूणकर, वडाळा
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
खाशाबांना भारतरत्न नाही, ही शोकांतिका
भारत आता स्वातंत्र्याच्या सत्तरीकडे झुकला. पाणी बरेच पुलाखालून गेले. तुर्तास तरी सर्वच क्षेत्रांमध्ये भारत आघाडीवर आहे. विज्ञानाची कास धरून आपण अंतराळातही मजल मारली. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांनीदेखील इतिहास घडवला. अर्थ, वाणिज्य, शैक्षणिक, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात भारताने आता आघाडी घेतलेली आहे, मात्र क्रिकेट वगळता इतर कुठल्याही खेळाला इथे महत्त्व दिले जात नाही. क्रिकेटमध्ये सकस असे राजकारण घुसल्यामुळे तेथेही ब-याच घडामोडी घडताना दिसतात. राहता राहिला प्रश्न आदरणीय खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ हा किताब मिळावा का? मुळात सरकारला हा प्रश्न पडावा यासारखी दुसरी कुठलीही शोकांतिका नसावी. कुस्तीसारख्या खेळाला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवणा-या खाशाबा जाधव यांना खरं तर हा बहुमान निदान मरणोत्तर तरी मिळावा ही समस्त भारतवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याने पाठपुरावा करावा. आपल्या देशात कुठलीही नवीन गोष्ट करताना त्यात राजकीय हस्तक्षेप हा आलाच. त्यामुळे खाशाबांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कुणी उदारमताने पुढे येईल हे निश्चित सांगता येणार नाही. तरीही तो मिळावा ही समस्त भारतीयांची इच्छा आहे. – संजय जाधव, सांताक्रूझ
खाशाबा यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या
खाशाबा जाधव हे भारतातील पहिले कुस्तीगीर.. ऑलिंपिक पदक जिंकणारे एकमेव भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकले आणि भारताच्या सन्मानात भर घातली. त्यांचा हा भीमपराक्रम कित्येक वर्षे अबाधित राहिला आहे. दुर्दैवाने त्यांचा हा पराक्रम सरकारने कित्येक वर्षे दुर्लक्षून त्यांचा सन्मान योग्य वेळी केला नाही. आपलेच सरकार, आपलेच कायदे आणि आपल्याच माणसाला पुरस्कारावाचून उपेक्षित ठेवले जाते हा दुर्दैवी विनोद म्हणावा का? तेंडुलकरसारख्या व्यावसायिक खेळाडूंसाठी कायद्यात बदल करून ‘भारतरत्न’ बहाल करण्यासाठी सरकारकडे शिफारशी केल्या जातात. वास्तविक क्रिकेट हा ऑलिंपिकमधला खेळ नाही. तरीही तेंडुलकरचे नाव पुढे केले जाते. ही एक सरकारची राजकीय स्वार्थी खेळी समजावे का? ज्या काळात खेळांना व्यावसायिकतेचा स्पर्शही झाला नव्हता अशा काळात खाशाबा जाधव यांनी पोटाला चिमटा लावून जीवापाड मेहनत घेऊन देशाला पहिले कुस्तीगीर ऑलिंपिक पदक मिळवून दिले. त्यांना इतकी वर्षे उपेक्षित का ठेवले जात आहे, कोण आहेत याच्या मागे, ही एक अतिशय उद्विग्न करणारी बाब आहे. सध्याच्या कुस्तीगीरांची ऑलिंपिकमधील सुमार कामगिरी बघता सरकारने खरोखर खाशाबा जाधव यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार द्यावा. यामुळे जे नवतरुण कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी तयारी करत आहेत, त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
संतोष जाधव, जोगेश्वरी
खाशाबांना भारतरत्न मिळालाच पाहिजे
भारतात क्रिकेटचा जरा जास्तच गवगवा होत असतो, यामुळे सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यावरून जे वादळ उठले याला आक्षेप घेणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये जी कामगिरी केली आहे ती विसरणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच केल्यासारखे होईल. कारण आजच्या काळात सर्वच खेळांमध्ये अनेक सुखसोयी झाल्यामुळे निरनिराळे उच्चांक निर्माण करणे सर्वच खेळामध्ये सहज शक्य होत असते, परंतु जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, जुन्या काळी कमी सोयीसुविधा असतानाही जाधवांनी केलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. जर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देता येत असेल तर खाशाबा जाधवांना भारतरत्न मिळालेच पाहिजे. यात कोणताही वाद असू नये. आता तरी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची सरकारनेच नव्हे तर जनतेनेही पुढाकार घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाच पाहिजे. – चंद्रकात अंभिरे, विरार
यथोचित गौरव व्हावा
गेल्या काही वर्षापासून विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करून जगात देशाचे नाव उज्वल करणा-या व्यक्तींना पद्मपासून भारतरत्नपर्यंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. हे पुरस्कार देताना भारत सरकार अनेकदा विविध समज-गैरसमजामुळे वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी भाजपने सत्तेवर असताना टीकेचे लक्ष्य टाळून पुरस्कारांची खिरापत वाटण्याची प्रथाच बंद केली होती. वास्तविक हे पुरस्कार जाहीर करताना क्रीडाक्षेत्राचा समावेश नव्हता, परंतु आता मात्र क्रीडाक्षेत्रसुद्धा यात समाविष्ट झाले आहे. खाशाबा जाधवांप्रमाणे देशी-विदेशी खेळांमध्ये देशाला नावलौकिक प्राप्त करून दिलेल्या अनेक खेळाडूंना डावलून केवळ तेंडुलकरला ‘भारतरत्न’ने गौरवून सरकारने इतर नामवंत खेळाडूंवर अन्याय केला आहे. देशी खेळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना अस्सल भारतीय बाज असलेल्या खेळाला खाशाबांनी ऑलिंपिकमध्ये स्थानच नव्हे तर कास्यपदक- सुवर्णपदक मिळवून जगात भारताचे नाव उज्ज्वल केले, ते अमाप पैसा, प्रसिद्ध मिळविण्यासाठी नव्हे, ते देशासाठी खेळले. आज अल्पविजय मिळविणा-या खेळाडूंवरसुद्धा सरकार मोफत घरे, नोक-या, बढती, अत्युच्च मानसन्मान, भूदान आदी बहाल करून डोक्यावर घेते, पण देशी खेळ आणि खेळाडूंवर अन्याय करते. अनेक खेळाडूंची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते. तरीही ते परिस्थितीवर मात करीत देशाचे नाव उज्ज्वल करीत असतात. वास्तविक महाराष्ट्र शासनानेच खाशाबा जाधव हयात असतानाच त्यावेळी भारत सरकारला शिफारस करावयास हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्या पश्चात योग्य तो मरणोत्तर सन्मान, स्मारक, टपाल तिकीट, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन देऊन त्यांचा आदर्श इतर खेळाडूंसमोर ठेवावा.- कमलाकर गुर्जर, कळवा
खाशाबांवर अन्याय का?
कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव भारतातील पहिले खेळाडू आहेत. त्यांनी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकले आहे. खाशबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून भारताच्या सन्मानात भर घातली. त्यांचा हा पराक्रम कित्येक वर्षे कोणालाही मोडता आलेला नाही, ही समाधानाची बाब आहे, पण दुर्दैवाने त्यांचा हा पराक्रम सरकारने लक्षात घेतलेला दिसत नाही. कारण खाशाबा हयात असताना त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार देणे आवश्यक होते पण साधा पद्म पुरस्कार देण्याचे औदार्य सरकारने दाखवले नाही, ही शरमेची गोष्ट आहे. केंद्र आणि राज्य सरकार क्रीडापटूंना विविध पुरस्कार देते. केंद्र सरकार पद्म आदी सर्वोच्च पुरस्कार देते, पण राज्य सरकारने खाशाबांना चांगला पुरस्कार देऊन त्यांच्या सर्वोच्च कामगिरीची ‘त्याच वेळी’ दखल घेतली असती तर उचित झाले असते. मात्र तसे झाले नाही. खाशाबांवर अन्याय झाला. निदान राज्य सरकारने खाशाबांच्या कामगिरीची स्वत:हून दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करणे योग्य ठरले असते. त्यांच्या मुलाने रणजित जाधव यांच्यासह सातारा, कोल्हापूर परिसरातील कुस्तीपटूंना यावर आवाज उठवल्यावर सरकारला जाग आली आहे. केंद्र सरकारने आता तरी जागे होऊन खाशाबांना भारतरत्न जाहीर करावा. मरणोत्तर भारतरत्न देता येत नाही, असे नियम सांगतो पण ही बाब वेगळी (स्पेशल केस) समजून त्यांना भारतरत्न द्यावा. यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पाठपुरावा केलाच पाहिजे. खाशाबांना भारतरत्न दिल्यास त्यांच्यावरील अन्यायाचे परिमार्जन होईल. – मुग्धा मौजे, सीबीडी, बेलापूर
खाशाबांना भारतरत्न मिळावा
ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करणा-या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे. तरच त्यांच्यावरील अन्याय दूर होईल. सरकारने आता तरी जागे व्हावे. – प्रमोद तांबे
आता तरी भारतरत्न द्या
ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून भारताचे नाव उज्ज्वल करणा-या खाशाबा जाधव यांना सरकारने उशिराने का होईना पण आता तरी भारतरत्न द्यावेच. हा खरे तर ‘भारतरत्न’चा गौरव ठरेल.- स्वाती कुंचिकोरवे
कडक कायदा करून अपघात टळतील का?
रस्त्यावर छोटा मोठा अपघात झाला नाही, असा एकही दिवस सध्या जात नाही. रस्त्यांवर वाहने वाढली आणि अपघातांची संख्याही वाढतच चालली आहे. गेल्या काही महिन्यात मोठे अपघातही बरेच झाले. ‘प्रहार’नेही ‘अपघातांची दहशत वाढतेय’ या अग्रलेखातून या दुर्घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा केला जाईल. पाच अपघात करणा-यांचे परवाने रद्द करा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर ‘अपघात हा खूनच समजा,’ असे मत अभिनेता अमिर खानने व्यक्त केले आहे. पण कडक कायदा करून अपघात टळतील का, चालकांवर आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी मोटार वाहन कायदा असला तरी त्याचे पालन होते का, चारचाकी आणि दुचाकींचे अपघात टाळणारी स्वयंचलित यंत्रणाच यापुढे वाहनात उत्पादक कंपन्यांनीच बसवली पाहिजे का, अपघात कमी करण्यासाठी ठोस उपाय कोणते असावेत..याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
प्रहार,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ,
मुंबई – ४०००१३, फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
ऑनलाइन पत्र लिहा
vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत.
YES BHARAT RATNA AWARD MALIYALA HAWACH
YES BHARAT RATNA AWARD MILAYALA HAWA.