बॉलिवूड़च्या खिलाडीने मात्र पडद्याप्रमाणे वास्तवातही आपले नायकत्व सिध्द केले आहे.
मुंबई – रुपेरी पडद्यावर सामाजिक बांधिलकी दाखवणारे बॉलिवूडचे मोठे नायक प्रत्यक्ष सामाजिक बांधिलकीपासून कोसो दूर असताना, बॉलिवूड़च्या खिलाडीने मात्र पडद्याप्रमाणे वास्तवातही आपले नायकत्व सिध्द केले आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीला धावून आला आहे. अक्षयने दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी ९० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दर महिन्याला पंधरा लाख याप्रमाणे पुढचे सहा महिने अक्षय बीडमधील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक सहाय्य देणार आहे.
बॉलिवूडमधील आणखी एक मोठे नाव म्हणजे नाना पाटकेर. नाना आणि मकरंद अनासपुरे दुष्काळी भागांमध्ये फिरुन शेतक-यांना आर्थिक मदत करत आहेत. त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन समाजातील सर्वच स्तरातून आता मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सोमवारी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
चांगली मराठी बोलणारा हा हिंदी सिनेस्टार आज ख-या अर्थाने या मातीला जागला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी सुरु केलेल्या अभिनवाला आता हिंदी चित्रपटस्रृष्टी कडुनही पाठबल मिलो. हिच अपेक्षा….