वीज कामगारांना दिलेली २५ टक्के पगारवाढ अपुरी असून, २५ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ द्यावी, असे सांगत वीज कामगार संघटनांनी २५ टक्के पगारवाढीला विरोध केला आहे.
मुंबई- वीज कामगारांना दिलेली २५ टक्के पगारवाढ अपुरी असून, २५ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ द्यावी, असे सांगत वीज कामगार संघटनांनी २५ टक्के पगारवाढीला विरोध असल्याचे वीज कामगार संघटनांनी सांगितले. २५ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ द्यावी आणि एप्रिल २०१३पासूनची थकबाकी एकदम द्यावी, अशी मागणी केल्याचे कामगार संघटनांकडून सांगण्यात आले.
प्रहार कौल-
[poll id=”693″]
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीन विद्युत महामंडळांच्या कंपन्यांमध्ये एकूण ८२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना दर पाच वर्षानी पगारवाढ देणे बंधनकारक आहे. मात्र एप्रिल २०१३पासून होणारी पगारवाढ अद्याप झालेली नाही. ऊर्जा विभागाने मंगळवारी पगारवाढ जाहीर केली. मात्र देण्यात आलेली २५ टक्के पगारवाढ वीज कामगार संघटनांना मान्य नसून, ४५ टक्के पगारवाढ करण्यात यावी, अशी मागणी वीज कामगार संघटनांच्या कृती समितीने ऊर्जा विभागाकडे केली आहे.
कामगार संघटनांच्या विरोधानंतर पगारवाढीबाबत पुन्हा फेरविचार करण्यात येणार असून, गुरुवारी पगारवाढीबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत निर्णय झाल्यानंतर कामगारांच्या हिताचा निर्णय असल्यास या निर्णयाचे स्वागत करण्यात येईल. मात्र २५ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ न केल्यास आंदोलनाबाबत पुढील दिशा लवकरच ठरवण्यात येईल, असे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष ए. डी. गोलंदाज यांनी सांगितले.
आधी भोंगळ कारभार सुधारा मगच वेतनात वाढ मागा
भोंगळ कारभाराची कितीतरी उदाहरण आहेत . सर्वाना मुजोरी ही पदवी आहे अस वाटत
निलेश आंबेकर – ठाणे
९८२०० ३२७७२
ambekar.nilesh@gmail.com