नोटाबंदीच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून शेतकरी व सर्वसामान्यांचाची छळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ २८ नोव्हेंबर रोजी काँग्रेसतर्फे देशव्यापी ‘जनआक्रोश आंदोलन’ छेडले जाणार आहे.
मुंबई- नोटाबंदीच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून शेतकरी व सर्वसामान्यांचाची छळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ २८ नोव्हेंबर रोजी काँग्रेसतर्फे देशव्यापी ‘जनआक्रोश आंदोलन’ छेडले जाणार आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘नोटाबंदीमुळे देशभरात आर्थिक अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असून हा निर्णय काळय़ा पैशाविरूद्धच्या लढाईचा एक भाग असल्याचा दावा सरकार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनताच वेठीस धरली जात आहे. हा निर्णय तयारीविनाच राबवल्याने देशभरात चलनतुटवडा निर्माण होऊन दैनंदिनं व्यवहार बाधित झाले आहेत. लग्नसराई, व्यापार-उदीम, वैद्यकीय उपचार, शेतीविषयक महत्त्वाची कामेही खोळंबली आहेत, असे सावंत म्हणाले.
नोटाबंदीच्या निर्णयाला १५ दिवस उलटून गेल्यानंतरही बँकिंग सेवा पूर्ववत झालेली नाही. सहकारी बँकांना जुन्या नोटा घेण्यास मनाई केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थाही ठप्प झाली आहे. मजूरवर्गावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात तब्बल ६० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केंद्र व राज्य सरकारला त्याचे कोणतेच सोयरसूतक नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकार त्याची दखल घेण्यास तयार नाही. चलनतुटवडा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर जनतेचा संताप केंद्र व राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी २८ नोव्हेंबरला देशभरात काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
जनआक्रोश आंदोलनाची तारीख बदलण्याची मागणी
मोदी सरकारच्या नोटाबंदी विरोधातील देशव्यापी ‘जनआक्रोश आंदोलन’ २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले असले तरी याच दिवशी महाराष्ट्रात नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यामुळे नोटाबंदी विरोधात आक्रोश करायचा की विजयाचा जल्लोष साजरा करायचा या पेचात काँग्रेसचे कार्यकर्ते सापडले आहेत.
जनआक्रोश कशाला म्हणता जनता आक्रोश करताच नाही विपक्षआक्रोश म्हणा, उगीच जनतेच्या नावावर देशाला वेठीस धरू नका व चर्चा करा संसदेत आंदोलन नव्हे. उगीच नुकसान करू नका व्यापाऱ्यांचे एक दिवस व्यापार बंद ठेऊन व बंद करायचाच असेल तर अनाऊन्स करा सर्वीकडे स्वेच्छेने जर आपण बंद ठेवत असाल , आपल्या मर्जीने ठेवा नाही तर आपली दुकाने सुरु ठेवा. आज देशासमोर सीमेवरील तणावाचे प्रश्न महत्वाचे असता ना आंदोलन कशाला. ९०% जनतेने नोटबंधी समर्थन केले आहेच . एखाद्या अपघातात शरीराला गंभीर दुखापत झाली तर आपरेशन शिवाय पर्याय नसतो, सलाईन लावून काम भागणार का???
मला हे काहीच मान्य नाही,NDA सर्वगुण संपन्न अजिबात नाही आणि मोडी सुध्दा नाहीत,पण त्यांना कॉंग्रेस कडून अत्यंत दरिद्री वारसा मिळाला आहे,महाराष्ट्रात 30हजार कोटीचा कर्ज असताना फडणवीस सरकार आले,केंद्रात तर अजून किती कर्ज असेल देव जाने,हा सगळा पैसा कॉंग्रेस,UPA ने घोटाळ्यद्वारे स्वतःच्या खिशात घातला,त्यामुळे जे जे काही वरती वाईट दाखवले आहे त्याचे मूळ कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच आहे,फक्त 4%लोक आयकर भरतात भारतात,त्यात सुद्धा 3% नोकरदार आहेत,सिनेमावाले,इतर कलाकार,उद्योगपती,खेळाडू,डॉ,वकील इ पैकी किती जण प्रामाणिकपणे कर भरतात?आणि कॉंग्रेस ने काय केले इतक्या वर्षात हा आयकर बाहेर काढण्यासाठी,घोटाळे करायचे आणि आयकरसाठी पाऊले हि नाही उचलायची असे दुहेरी पाप कॉंग्रेस ने केले आहे,10 वर्ष रेल्वे भाडे वाढवले नाही,आणि आपले पाप NDAच्या डोक्यावर टाकले,10वर्ष रेल्वे सारखा मोठा विभाग चालू शकतो का,नाही हे उत्तर,70%भाडेवाढ झालेली नाही,पगारवाढ इतकी झाली आहे आणि भाडेवाढ होणारच ना,45 रुपयात तुरडाळ असताना BJP ने विरोध केला,मोडी सत्तेवर आली तेव्हा 120रु तुरडाळ होतीच,त्यावर तर दिल्ली सरकार पडले,आणि कोणाला 100 पैकी 100 गुण असतात,मोडी माणूसच आहे शेवटी देव नव्हे,पण कॉंग्रेसची 60 वर्ष आणि मोदींची अडीच वर्ष यात खूप मोठा काल फरक आहे,ह्याची तुलना होऊ शकत नाही खरतर,आज सुद्धा वीज,पाणी,काश्मीर इ प्रश्न अधांतरी आहेत हे का मोदींमुळे?सगळ्या घाणी चे मुळ घाण कॉंग्रेस हेत,WITH भ्रष्ट ममता,केजरी,पवार इ,शेवटी कॉंग्रेस ने नोटा कधीच बदलल्या नाहीत,फक्त 25पैशाच नाणे काढले व्यवहारातून आपल्या लायकीनुसार,78 साली मोरारजी देसाई यांनी नोट बदल केला होता तो हि अचानक नव्हे तर पूर्व कल्पना देऊन,पण काळ्याऐशा विरुद्ध काहीच उपयोग नाही,मला वाटत यातून काँग्रेसी माणसाना बऱ्यापैकी उत्तरे मिळाली असतील शेवटी मुळात कॉंग्रेस आणि मोदि यांची तुलना करणे गैर आहे कारण कालखंडाचा आणि घोटाळ्यांचा फरक खूप मोठा आहे.