दै. ‘प्रहार’च्या सातव्या वर्धापनदिनी ‘प्रहार’चे सल्लागार संपादक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री. नारायण राणे यांनी दै. ‘प्रहार’ची भूमिका त्यांच्या निवेदनात या ठिकाणी स्पष्ट केली आहे.
दै. ‘प्रहार’च्या सातव्या वर्धापनदिनी ‘प्रहार’चे सल्लागार संपादक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री. नारायण राणे यांनी दै. ‘प्रहार’ची भूमिका त्यांच्या निवेदनात या ठिकाणी स्पष्ट केली आहे. दै. ‘प्रहार’ स्वतंत्र दैनिक राहील, स्पष्टता आणि निर्भीडपणा जपून पुढेही काम करीत राहील. कुणालाही ‘प्रहार’ला कधीही ‘मॅनेज’ करणे शक्य होणार नाही, असे श्री. नारायण राणे यांनी स्पष्ट करून पुढच्या वाटचालीची ‘प्रहार’ची दिशा तेवढीच निर्भीडपणे व्यक्त केली आहे.
दै. ‘प्रहार’ या मराठी वृत्तपत्राला ९ ऑक्टोबर रोजी सात वर्षे पूर्ण झाली. आज १० ऑक्टोबरला दैनिक ‘प्रहार’ आठव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे, मला याचा खरंच अभिमान वाटतो. गेली सात वष्रे अतिशय निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे पत्रकारितेचा पेशा सांभाळत ‘प्रहार’ वृत्तपत्र आम्ही चालवत आहोत. खरं तर हे वृत्तपत्र चालू करण्याचा हेतू हा आहे की, सध्या राजकारणामध्ये, पत्रकारितेमध्ये आणि समाज जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणा दिसत नाही.
कोणत्याही पेशात प्रामाणिकपणा जेव्हा दिसून येत नाही तेव्हा आठवण होते बाळशास्त्री जांभेकर यांची. त्यांनी ज्या हेतूने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले तो त्यांचा व्यवसायातील प्रामाणिक हेतू आज सांभाळला जात असल्याचे दिसत नाही. अर्थातच काही नेमक्या वृत्तपत्रांबद्दल मी हे बोलत आहे. सगळीचं वृत्तपत्रं तशी नाहीत. आज सत्य बातम्या लोकांना वाचायला फारच कमी मिळतात. ब-याचदा लोकांना ‘टेबल न्यूज’ वाचाव्या लागतात. त्यामुळे पत्रकारितेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. परिणामी पत्रकारिता ‘मॅनेज’ केली जाते, असे सर्वसामान्य माणसांचे मत होत चालले आहे.
आपल्याला हव्या त्या बातम्या छापून आणाव्यात, नको त्या बातम्या टाळाव्यात, अशाप्रकारे वृत्तपत्रांना मॅनेज करण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आपण निर्भीड, प्रामाणिकपणे पत्रकारितेचा पेशा सांभाळून मराठी वृत्तपत्र काढावे आणि ते चालवावे हा माझा हेतू होता आणि आजही आहे. म्हणून विविध विषयांचे प्रबोधन करणारे वृत्तपत्र, ख-या बातम्यांचे वास्तवादी चित्र लोकांपर्यंत पोहोचवणारे मराठी वृत्तपत्र, आपण लोकांसमोर आणावे या हेतूने मी हे वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. हे वर्तमानपत्र चालवत असताना गेल्या सात वर्षामध्ये अनेक बरे-वाईट अनुभव आले. ते अनुभव घेऊन आम्ही दैनिक ‘प्रहार’ विशिष्ठ दर्जा सांभाळून चालवित आहोत.
दैनिक ‘प्रहार’ला कोणी ‘मॅनेज’ करू शकेल, असे कोणालाही म्हणता येणार नाही. आमच्याकडे कोणतीही बातमी एकदा आली की, ती छापली जाणारच. ती बातमी टाळण्याचे किंवा मारून टाकण्याचे कोणतेही कृत्य आमच्याकडून होत नाही, होणार नाही. ‘प्रहार’मध्ये लिहिले गेलेले अग्रलेख केवळ टीका म्हणून आम्ही देत नाही. कोणत्याही जातीवर, धर्मावर असं एका दिशेने जाणारं आमचं वृत्तपत्र नाही. एखादी व्यक्ती, एखादा पक्ष किंवा सरकार जेव्हा जनतेची फसवणूक करत आहेत, असे जाणवते, प्रकल्प योग्य प्रकारे राबवले जात नाहीत असे दिसते, विकासाकडे राज्य चालले आहे असे जेव्हा वाटत नाही, त्यावेळेला दैनिक ‘प्रहार’मधून बातमीच्या माध्यमातून किंवा संपादकीयमधून आम्ही टीका करतो. ती टीका द्वेषाने किंवा आकसाने करीत नाही. त्या टीकेचे स्वरूप मार्गदर्शन स्वरूपाचेच असते, असे माझे प्रामाणिक मत आहे. आमचे कोणाशी वाकडे नाही, वाईट नाही.
आम्ही कोणाचा द्वेष करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र प्रगतीशील राज्य व्हावे अशीच सगळय़ांची इच्छा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या राजवटीपासून ती ख्याती आजतागायत कायम राहावी, या राज्यात जनता सुखी आणि समाधानी राहावी, हे काम सरकारने प्रामाणिकपणे करावे, यासाठीच आम्ही टीका करतो किंवा मार्गदर्शन करतो. दैनिक ‘प्रहार’मधील आतापर्यंतचे सर्व संपादक आणि आताचे आमचे संपादक अतिशय चोखपणे, प्रामाणिकपणे पत्रकारितेचा पेशा सांभाळत आहेत, याचा मला अभिमान वाटतो आणि त्याबद्दल समाधानही आहे.
सात वर्षाचा काळ हा तसा लहानही नाही आणि मोठाही नाही. असं असलं तरी पत्रकारितेमधील पन्नास वर्षाचा अनुभव असलेले संपादक आमच्याकडे आहेत. वेगवेगळया क्षेत्रात पत्रकारितेत काम केलेले अनुभवी पत्रकार आमच्याकडे आहेत आणि त्यामुळेच आम्ही आमच्या ‘प्रहार’चा सुरुवातीपासून चांगला दर्जा कायम ठेवलेला आहे. मी आजच्या वर्धापनदिनी सर्व जाहिरातदार, वाचक, हितचिंतक सगळय़ांचेच आभार मानतो. या सगळय़ांच्या सहकार्यामुळेच आम्ही दैनिक ‘प्रहार’ यशस्वीपणे चालवू शकलो.
‘प्रहार’ची बातमी, ‘प्रहार’चे लेख, ‘प्रहार’च्या पुरवण्या या सगळया दर्जेदार असतील, याची दक्षता आम्ही नेहमीच घेत असतो. ज्या उद्दिष्टातून मराठी पत्रकारितेचा जन्म झाला ते उद्दिष्ट आम्ही प्रामाणिकपणाने पाळण्याचे काम कसोशीने करू, असे अभिवचन वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मी आमच्या वाचकांना देत आहे.
प्रश्न : राणेसाहेब, आजच्या पत्रकारितेमध्ये असे दिसते आहे की या जगात मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून, गुणवत्ता टिकवत, तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून राजकारणालाही पूर्ण वेळ देता. शिवाय ‘प्रहार’मध्येही आपण लक्ष घालता, हे सगळे वेळापत्रक आपण कसे काय जमवता
राणेसाहेब : या सर्व गोष्टी कटाक्षाने करण्याकरिता नित्यनियमाने मी दिवस बांधून घेतलेला आहे. माझा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. मी नुसते राजकारण करत नाही. मी व्यावसायिक आहे, उद्योजक आहे. आणि त्याचवेळी ‘प्रहार’ची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. पत्रकारितेतून मला काही मिळवायचे नाही. तर लोकांना द्यायचे आहे. पत्रकारितेच्या स्पध्रेमध्ये अनेक वृत्तपत्रे आहेत. मला कोणावरही भाष्य करायचे नाही. पण आपले ‘प्रहार’ वृत्तपत्र वेगळे असावे.
अन्य वृत्तपत्रांपेक्षा त्याचे वैशिष्टय़े वेगळे असावे. लिखाण वेगळे असावे, विषयांची विविधता त्यात असावी आणि विविध विषयांचे प्रबोधन जनतेला व्हावे आणि जनतेने त्यातून काहीतरी शिकावं. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ‘प्रहार’चाही काही वाटा असावा, या उद्देशानेच मी ‘प्रहार’कडे पाहतो आणि त्यासाठी हा ‘प्रहार’ सुरू केला आहे. माझे अनेक व्यवसाय आहेत.
वेगवेगळया प्रकारचे व्यवसाय आहेत. त्या प्रत्येक व्यवसायाला, त्यातील आर्थिक शिस्तीला, प्रशासनाला मी वेळ देतो, माझा दिवस पहाटे कधी सुरू होतो आणि रात्र केव्हा संपते, हेही मी सांगू शकणार नाही. पण या कामात मला आनंद मिळतो एवढे मात्र निश्चित. आणि अशा रितीने अखंड काम करण्याची प्रेरणाही मी अनेक थोरामोठय़ांकडून घेतलेली आहे. त्यामुळे ‘प्रहार’कडे पाहताना ‘प्रहार’ यशस्वी व्हावा, या दृष्टीने जे काय करावेसे वाटते ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि आवश्यक तेवढा वेळही देतो.
प्रश्न : राणेसाहेब, आपण दैनिक ‘प्रहार’चे प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे पहिले पान आदल्या रात्री मागवून घेता, ते वाचता, आवश्यक ती दुरुस्ती करता. वृत्तपत्र व्यवसायात सात वर्षापूर्वी पाऊल ठेवले असताना आपण हे सगळं झटकन कसं काय अवगत केलंत
राणेसाहेब : मी जरी पूर्वी पत्रव्यवसायात नसलो, सल्लागार संपादक नसलो किंवा संपादक नसलो तरी लहानपणापासून वृत्तपत्राचा एक वाचक आहे आणि नुसता बातम्या वाचणारा वाचक नाही तर वयाच्या अगदी लहान वयातच लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांचे संपादकीय वाचण्याची मला सवय लागली होती.
वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरच्या हेडलाईन कशा असाव्यात, कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावं. जागतिक पातळीवरचे विषय, देशपातळीवरचे विषय, राज्य पातळीवरचे विषय आणि तेही जनतेशी निगडित जे काही प्रश्न आहेत-अशापैकी कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं आणि कशाची हेडलाईन करावी, हे जे काही वृत्तपत्रीय संकेत ठरलेले आहेत ते थोडेबहुत का होईना मला माहिती झाले आहेत आणि म्हणून कोणत्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या विषयाकडे लोकांचं लक्ष आहे, या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हेडलाईन वाचल्यानंतर समोरचा माणूस पुढे जाता कामा नये. मागे वळून त्याने ते वृत्तपत्र घ्यायलाच हवे. अशा वृत्तपत्राची हेडलाईन असली पाहिजे. हो मात्र असे करत असताना हेडलाईनमध्ये त्या बातमीमधले वृत्त त्या व्यक्तीला समजता कामा नये. त्याच्यामध्ये काहीतरी गुपित आहे, वाचनीय आहे, हे अंक पाहताच त्याच्या लक्षात यायला हवे आणि तो त्या वृत्तपत्राकडे आकर्षित झाला पाहिजे, असे मला वाटते.
काही वृत्तपत्रे हेडलाईनसाठीच फेमस आहेत. दैनिक ‘प्रहार’मध्ये चांगली हेडलाईन असावी, असा माझा राजचा दृष्टिकोन आहे. त्या दृष्टीने मी रात्री माझा थोडासा वेळ काढतो आणि उद्याच्या वृत्तपत्राचे पहिले पान संपादकांशी चर्चा करून ठरवतो. या कामात खरोखर समाधान आहे.
प्रश्न : नारायणराव, एक थोडा वेगळा प्रश्न. आज महाराष्ट्राची, देशाची राजकीय कोंडी झालेली आहे. देशात आर्थिक कोंडीसुद्धा आहे. तुमच्यासारख्या आक्रमक नेत्याने आणि सल्लागार संपादकाने अशा वेळी काय भूमिका घ्यावी
राणेसाहेब : देश आणि राज्य या दोन्ही पातळीवर देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. सरकारमधली माणसे म्हणतात, ‘आर्थिक स्थिती चांगली आहे’. जर चांगली आहे तर विकासाला आणि योजनांना पैसा वेळेवर का मिळत नाही आर्थिक उलाढाल का थांबलेली आहे यावरून स्वच्छ दिसतं की, देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. याला अनेक लोक जबाबदार आहेत.
आपण भावनेवर जर राज्य किंवा देश चालवला तर आर्थिक परिस्थिती कधीच सुधारणार नाही. आणि विकासाचे जे आपले लक्ष्य आहे तेही आपण पुरे करू शकणार नाही. भावनेवर सरकार चालता कामा नये. तर वास्तववादी चित्र, आर्थिक धोरण याचे अवलंबन करूनच सरकार चालवले गेले पाहिजे. देशाला आणि राज्याला जर पैशाची गरज असेल तर र्सिोसेस आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्न वाढवून ते देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीत कसे येईल आणि अधिकचे ‘कॅपिटल एक्सपेंडीचर’ आपण कसे वाढवू, हे पाहिले पाहिजे.
वेळ मारून नेण्याची कामे दोन्ही सरकार करताहेत. काम करण्यापेक्षा बोलताहेत जास्त आणि काम कमी करताहेत हे चित्र आहे आणि म्हणून या आताच्या सरकारकडून अधिक काही चांगले होईल, आर्थिक स्थिती पाहता ती सुधारेल, असे मला वाटत नाही. एका बाजूला दुष्काही परिस्थिती आहे. दुस-या बाजूला महागाई आहे, तिस-या बाजूला बँका डबघाईला आलेल्या आहेत. बँका कर्ज देत नाहीत.
उत्पादन थांबलेलं आहे. उद्योग-धंदे डबघाईला आलेले आहेत, अशा स्थितीमध्ये राज्याची स्थिती आणि देशाची स्थिती चांगली आहे, असे जरी सत्तेवरचे राज्यकर्ते म्हणत असले तरी ते खरे नाही. अशा वेळी वृत्तपत्र म्हणून पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू, असे आजच्या वर्धापनदिनी मी माझे मनोगत व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करतो, महागाईचे संकट दूर होवो, दुष्काळाचे संकट दूर होवो, अशीही परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
प्रश्न : नारायणराव, एक थोडा वेगळा प्रश्न. आज महाराष्ट्राची, देशाची राजकीय कोंडी झालेली आहे. देशात आर्थिक कोंडीसुद्धा आहे. तुमच्यासारख्या आक्रमक नेत्याने आणि सल्लागार संपादकाने अशा वेळी काय भूमिका घ्यावी
राणेसाहेब : देश आणि राज्य या दोन्ही पातळीवर देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती म्हणावी तशी चांगली नाही. सरकारमधली माणसे म्हणतात, ‘आर्थिक स्थिती चांगली आहे’. जर चांगली आहे तर विकासाला आणि योजनांना पैसा वेळेवर का मिळत नाही आर्थिक उलाढाल का थांबलेली आहे यावरून स्वच्छ दिसतं की, देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही. याला अनेक लोक जबाबदार आहेत. आपण भावनेवर जर राज्य किंवा देश चालवला तर आर्थिक परिस्थिती कधीच सुधारणार नाही. आणि विकासाचे जे आपले लक्ष्य आहे तेही आपण पुरे करू शकणार नाही.
भावनेवर सरकार चालता कामा नये. तर वास्तववादी चित्र, आर्थिक धोरण याचे अवलंबन करूनच सरकार चालवले गेले पाहिजे. देशाला आणि राज्याला जर पैशाची गरज असेल तर र्सिोसेस आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्न वाढवून ते देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीत कसे येईल आणि अधिकचे ‘कॅपिटल एक्सपेंडीचर’ आपण कसे वाढवू, हे पाहिले पाहिजे.
वेळ मारून नेण्याची कामे दोन्ही सरकार करताहेत. काम करण्यापेक्षा बोलताहेत जास्त आणि काम कमी करताहेत हे चित्र आहे आणि म्हणून या आताच्या सरकारकडून अधिक काही चांगले होईल, आर्थिक स्थिती पाहता ती सुधारेल, असे मला वाटत नाही. एका बाजूला दुष्काही परिस्थिती आहे. दुस-या बाजूला महागाई आहे, तिस-या बाजूला बँका डबघाईला आलेल्या आहेत.
बँका कर्ज देत नाहीत. उत्पादन थांबलेलं आहे. उद्योग-धंदे डबघाईला आलेले आहेत, अशा स्थितीमध्ये राज्याची स्थिती आणि देशाची स्थिती चांगली आहे, असे जरी सत्तेवरचे राज्यकर्ते म्हणत असले तरी ते खरे नाही. अशा वेळी वृत्तपत्र म्हणून पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडू, असे आजच्या वर्धापनदिनी मी माझे मनोगत व्यक्त करतो.
महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करतो, महागाईचे संकट दूर होवो, दुष्काळाचे संकट दूर होवो, अशीही परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
गुड जोब प्रहार