कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले अश्विनीकुमार यांनी शनिवारी काँग्रेसपक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली – कोळसा घोटाळयाच्या तपास अहवालात फेरफार केल्याने कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले अश्विनीकुमार यांनी शनिवारी काँग्रेसपक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना अश्विनीकुमार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले तसेच आपले अंत:करण शुध्द असल्याचा दावा केला.
मी काहीही चूकीचे केलेले नाही. राजीनामा दिला याचा अर्थ काही चुकीचे केले आहे असा होत नाही. हा राजकीय निर्णय आहे. तसेच काँग्रेस पक्षातील कुठल्याही नेत्याचा आपल्यावरील विश्वास कमी झाला नसल्याचा त्यांनी दावा केला.
कोळसा घोटाळयाच्या तपासावरुन सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर ओढलेल्या ताशे-यासंबंधी विचारले असता कुमार म्हणाले की, सीबीआयने माझ्याविरुध्द कोणतेही निरिक्षण नोंदवलेले नाही. सत्य आणि न्यायाचा शेवटी विजय होईल असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते हे असेच असतात