शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या संपत्तीवरुन उद्धव आणि जयदेव या दोन बंधुंमध्ये वाद सुरु आहे.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या संपत्तीवरून उद्धव आणि जयदेव या सख्ख्या भावांमध्ये वाद सुरू झाला आहे.
बाळासाहेबांनी १३ डिसेंबर २०११ रोजी बनवलेले मृत्युपत्र खरे असून, बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉ. जलिल परकार आणि वकील फ्लेनियन डिसुझा यांच्यासमोर बनवण्यात आल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या सत्यता पडताळणी याचिकेत (प्रोबेट पिटीशन) म्हटले आहे.
जयदेव यांनी बाळासाहेबांच्या या मृत्युपत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने ते संशयास्पद असल्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती. बाळासाहेबांची संपत्ती ही बँकेतील ठेवींसह एकूण १४ कोटी ८५ लाख रुपयांची आहे, असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे.
मात्र, ‘मातोश्री’ निवासस्थानच केवळ ४० कोटींचे आहे. तसेच बाळासाहेबांची अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे. दागिने व बँकेतील ठेवी मिळून ही संपत्ती १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र त्याबाबत मृत्युपत्रात कोठेही उल्लेख आढळत नाही, असा आरोप करत जयदेव यांनी हे मृत्यूपत्रच संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
तसेच या मृत्युपत्रामध्ये जयदेव यांच्यासह बाळासाहेब यांचा दिवंगत मुलगा बिंदूमाधव यांच्या कुटुंबीयांनाही संपत्तीत कोणताही हिस्सा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी बाळासाहेबांनी मृत्युपत्र बनवले त्या वेळी ज्येष्ठ वकील अधिक शिरोडकर, अनिल परब, शशी प्रभू आणि रवींद्र म्हात्रे यांच्यासह ते स्वत: उपस्थित होते, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांनी या सर्वाना त्यांच्या मृत्युपत्राचे व्यवस्थापक नेमले होते. याची सत्यता पडताळणी न्यायालयानेच करावी, असेही उद्धवने म्हटले आहे.
मृत्यूपत्रात बाळासाहेब काय म्हणतात..
जयदेव हा हुशार मुलगा असून, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे पण काही वर्षापूर्वी त्याने स्वत:हून ‘मातोश्री’ सोडली. जयदेव आणि त्याची पत्नी स्मिता यांचा घटस्फोट झाल्यानंतर तो दुस-या पत्नीबरोबर अन्यत्र राहतो. यामुळे मला खूप धक्का बसला आहे. यामुळेच मी त्याला माझ्या संपत्तीतील वाटा न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धवमुळे मला बरीच ताकद मिळाली आहे. माझ्या आजारपणात त्याने मला बराच आधार दिला. यामुळे मी आनंदी आहे. ‘मातोश्री’च्या उभारणीतही त्याचा बराच सहभाग होता. माझ्यानंतर उद्धवने शांततेत आयुष्य घालवावे, अशी माझी इच्छा आहे.
उद्धव हा जबाबदारीने वागेल आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये जिव्हाळय़ाचे संबंध ठेवले. मृत्युपत्रानुसार, ‘मातोश्री’चा दुसरा मजला उद्धव, आदित्य आणि तेजसशिवाय अन्य कोणत्याही नातेवाईकाला वापरता येणार नाही. तिसरा मजला आणि बंगल्यासभोवताली असलेली मोकळी जागा आणि भंडारदरा येथील जागा आणि कर्जतचे फार्म हाऊस केवळ उद्धव यांच्या नावे केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे गडगंज संपत्ती आली कोठून?
उद्धव ठाकरेंकडे असलेली संपत्ती त्यांनी कोणत्या मार्गाने कमावली आहे याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सोमवारी दिले. खरा प्रश्न हा संपत्तीच्या स्रेताबाबत आहे. उद्धव यांच्या नावावर कोणताही उद्योग नाही, कोठेही शेती नाही, ते फोटोग्राफी करत असले तरी त्यांचा फोटो स्टुडिओही नाही. मग त्यांच्याकडे गडगंज संपत्ती कोठून आली, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.
Shriut narayan Rane saheb,Shri,Chagan Bhujbal saheb,Shri,Manohar Joshi saheb, Swargiya Shri,Balaasaheb thakrye Yanchye Shishya ( Vidhyarathi ) Hotye, Jyanchekade Aaj karodo Rupayanchi Samppati Aahye,Ase astana Swargiya Shri Balaasahebanchi samppati fakt 15.Karod,????kashi Asel ????.