शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात मराठा नेते आघाडीवर असतात. असे असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला.
औरंगाबाद- शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात मराठा नेते आघाडीवर असतात. असे असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कुठे होते? असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला. मराठा समाजाला वगळून शिवसेनेने एक तरी आंदोलन यशस्वी करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी औरंगाबादेत बोलतांना उद्धव ठाकरे यांना दिले. आपले कोण आणि राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाला वापरून घेणारे कोण, हे ओळखा असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले.
मराठा आरक्षण मेळावा २०१७ अंतर्गत औरंगाबाद मधील तापडिया नाटय़ मंदिरात ‘मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा’ या विषयावर आमदार नितेश राणे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे अभिवचन समाजबांधवांना दिले. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरला होता. तेव्हा ठाकरे घराण्यातील राम आणि शाम (उद्धव-राज) कुठे होते? का नाही बाहेर आले? महाराजांचा भगवा झेंडा हातात घेऊन मराठय़ांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर का उतरला नाहीत? तेव्हा कुठे गेली होती तुमची ठाकरी भाषा? अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
आपले कोण आणि राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणारे कोण हे ओळखा. उगाच कुणाच्याही मागे पळू नका. उद्धव ठाकरे यांना माझे चॅलेंज आहे, त्यांनी शिवसेनेतील मराठा बाजूला करून एक आंदोलन यशस्वी करून दाखवावे, किंवा एखादी गाडी फोडून दाखवावी. मराठय़ांच्या जीवावर राजकारण करता, पण त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ आली की मागे कसे फिरता असा सवाल देखील राणे यांनी यावेळी विचारला. नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला, न्यायालयात प्रकरण गेल्यानंतरही आज सरकारला बाजू मांडण्यासाठी सगळ्या प्रकारची मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. आज मला नारायण राणे यांचा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि आता कुठेही मागे हटणार नाही उलट अधिक ताकदीनिशी काम करेन, अशी ग्वाही टाळ्यांच्या कडकडाटात आमदार नितेश राणे यांनी दिली.
[EPSB]
राज्यात १० लाख कर्जदार शेतकरी बोगस : चंद्रकांत पाटील
राज्यभरातून कर्जमाफीसाठी ७२ लाख अर्ज आले आहेत. तर राज्यात कर्जदार शेतक-यांची संख्या एकूण ८९ लाख आहे पण या ८९ लाख शेतक-यांपैकी १० लाख शेतकरी बोगस आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली
[/EPSB]
Maratha samajala nyay kon denar aahet ? Bharat at konihi nahi. मागासल्याna Aarakshan TATKAL milel.magaslelya samajatun kiti lokani Bhartiya Swatantra ladhyat bhag ghetala hota? Jankarankadun mahiti jhahir hoil Kay?