भारताशी पाकिस्तान सरकारला अधिक दृढ संबंध ठेवायचे आहेत. काश्मीरबरोबर दोन्ही देशांतील विविध समस्यांवर चर्चेतून निश्चितपणे मार्ग निघू शकतो
इस्लामाबाद – भारताशी पाकिस्तान सरकारला अधिक दृढ संबंध ठेवायचे आहेत. काश्मीरबरोबर दोन्ही देशांतील विविध समस्यांवर चर्चेतून निश्चितपणे मार्ग निघू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले.
दोन्ही देश मोठया प्रमाणावर संरक्षणावर खर्च करीत आहेत. तो खर्च सामाजिक कामांवर अपेक्षित आहे. दोन्ही देशांचे संबंध अधिक चांगले करण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावल्याचा मला अभिमान वाटतो. १९९९ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. मात्र त्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले, असे शरीफ यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भारत आणि पाकिस्तानमधील सर्व समस्यांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढायचा आहे. आपण भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. येत्या रविवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि नवाज शरीफ यांची न्यूयॉर्क येथे भेट होणार आहे.
Don’t believe this XXXXX. He is not a sharif(believable).
aaj haath milayenge kall goli chalayenge
ye sab unki chal hai hindustan me aane ka
dashahat failane ka