विदेशात असलेल्या आणि देशात वाढत चाललेल्या काळ्या पैशाबाबत देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चलनामध्ये खोटया नोटांचाही सुळसुळाट झाला आहे.
पुणे- विदेशात असलेल्या आणि देशात वाढत चाललेल्या काळ्या पैशाबाबत देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चलनामध्ये खोटया नोटांचाही सुळसुळाट झाला आहे. काळा पैसा आणि मोठया नोटा यामुळे भ्रष्टाचार माजला असून सर्वसामान्य जनतेची कोंडी झाली आहे. काळा पैसा कमी होईल तसेच भ्रष्टाचार रोखला जाईल, अशी आश्वासने दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात ठोस काही होताना दिसत नसल्याने देशातील अर्थव्यवस्थेचे शुद्धीकरण केव्हा होणार, हा प्रश्न आज अनिर्णित आहे. हा महत्त्वाचा विषय जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून पुण्यातील प्रभाकर कोंढाळकर यांनी आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेद्वारा याविषयी प्रबोधन करण्याचे ठरवले आहे.
काळा पैसा आणि भ्रष्टाचार वाढण्याला कारणीभूत व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत १२५ कोटी नागरिकांना प्रामाणिक, शांत आणि समाधानी आयुष्य जगता येणार नाही. दोष नागरिकांचा नसून अर्थकारणामधील व्यवस्थेचा आहे. तो दोष अतिशय सूक्ष्म रूपाने दाखवून त्या आधारावर देशात आमूलाग्र बदलासाठी अर्थक्रांती प्रतिष्ठान गेले १४वष्रे प्रयत्नशील आहे. त्याचे प्रणेते अनिल बोकील हे आहेत.
देशामध्ये तयार होणारी काळ्या पैशाची निर्मिती अर्थक्रांतीच्या पाच प्रस्तावांच्या अंमलबजावणीमुळे थांबेल. याचा लाभ देशामधील १२५ कोटी भारतीयांना होणार आहे. पण त्यासाठी आर्थिक साक्षरता आणि या प्रस्तावांचा देशात फार मोठया प्रमाणावर प्रसार होण्याची गरज आहे. पुणे येथील सामाजिक कार्यकत्रे, अर्थक्रांतीचे जनसंसदचे राज्य सरचिटणीस प्रभाकर कोंढाळकर यांनी ही गरज ओळखली. त्यांनी एक आगळा वेगळा प्रयत्न केला आहे. त्यांचा मुलगा प्रीतम याचे ३ नोव्हेंबर रोजी पुण्यात लग्न आहे. या लग्नानिमित्त एकूण वीस पानी लग्नपत्रिका तयार करण्यात आली असून ‘विचार करणा-या प्रत्येकासाठी- अर्थक्रांती’ अशी पुस्तिकाच पत्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व अर्थक्रांतीचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी प्रश्नोत्तरांच्या रूपात ही मांडणी केली आहे. पत्रिकेत प्रभाकर कोंढाळकर यांचे वंशज कावजी कोंढाळकर व संभाजी कावजी कोंढाळकर या पिता-पुत्रांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेकरिता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दिलेल्या योगदानाचीची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोंढाळकर कुटुंबाची कावजी कोंढाळकर यांच्यापर्यंतची वंशावळ देण्यात आली आहे.
आपल्या वंशजांनी त्यावेळची गरज लक्षात घेऊन सुराज्यासाठी शिवाजी महाराजांना साथ दिली. आज देशवासीयांना आर्थिक स्वातंत्र्याची गरज असून त्यासाठी बहुजन समाजात आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा आणि जनतेने राजकीय नेत्यांना आíथक प्रश्न विचारण्यास सुरुवात करावी, म्हणून आपण लग्नपत्रिकेत अशी पुस्तिका जोडली, अशी कोंढाळकर यांची भावना आहे. आपण करत असलेल्या सामाजिक कामाला आणि कुटुंबाच्या इतिहासाला लग्नपत्रिकेशी जोडून घेण्याचा आगळावेगळा आणि अनुकरणीय असा हा प्रयोग आहे.
अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव
१) सध्या अस्तित्वात असलेली करप्रणाली पूर्णत: रद्द करणे.
२) सरकारी महसुलासाठी फक्त बँकव्यवहार कर लागू करणे. बँकेद्वारे होणा-या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे,
३) सध्या चलनात असलेल्या, रु.५० पेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे.
४) शासनाची काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता अपेक्षित
५) रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर बँकव्यवहार कर लागू असणार नाही.
मला त्यांचा मोबाईल नो पाहिजे .प्रभाकर कोंढाळकर ९०८२४४६६२५ माझा मोबा नो