बुडीत कर्जाबाबत कठोर भूमिकेतून कारवाई करा, असे सांगतानाच रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँकेकडे केवळ कागदी वाघ म्हणून पाहिले जाऊ नये, असा सणसणीत इशारा दिला.
मुंबई – बुडीत कर्जाबाबत कठोर भूमिकेतून कारवाई करा, असे सांगतानाच रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँकेकडे केवळ कागदी वाघ म्हणून पाहिले जाऊ नये, असा सणसणीत इशारा दिला. आपल्या सहका-यांना राजन यांनी देशातील धनाढय़ आणि शक्तिशाली लोकांनी गैरकृत्ये केली तरीही त्यांना सोडू नका, असे बजावले.
ढिसाळ कारभार करणा-यांविरोधात जास्त असहिष्णू होण्याची गरज असून यामुळे भविष्यात त्याची परिणती व्यापक घोटाळ्यांमध्ये होणार नाही, असेही राजन म्हणाले. आपल्या कर्मचा-यांना नव वर्षानिमित्त संदेश देताना त्यांनी पत्र लिहिले आहे. भारताचे वर्णन नेहमीच दुर्बल सरकार म्हणून केले जाते. गैरव्यवहार प्रयत्नपूर्वक शोधून काढण्याची प्रशासकीय क्षमता नाही, एवढाच आमच्यावर आरोप होत नाही तर गैरकृत्ये करणा-यांना तो दुबळा आणि सामान्य असल्याशिवाय आम्ही शिक्षा करत नाही, असाही आरोप केला जातो.
श्रीमंत आणि वरिष्ठ वर्तुळात उत्तम संबंध असलेल्यांच्या मागे लागण्याची कुणाचीही इच्छा नसते,त्यामुळे कसलीही कृत्ये करून ते सुटून जातात. आपल्याला शाश्वत आणि मजबूत विकास हवा असेल तर श्रीमंतांनी काहीही केले तरीही त्यांना अद्दल घडणार नाही, ही संस्कृती बंद केली पाहिजे, असे राजन म्हणाले. १६,८०० बँकेच्या कर्मचा-यांना लिहिलेल्या पाच पानी पत्रात राजन यांनी विचार व्यक्त केले आहेत. याचा अर्थ आम्ही श्रीमंतांविरोधात आहोत, असा मुळीच काढू नये, असे त्यांनी तत्परतेने स्पष्ट केले. आम्ही फक्त गैरव्यवहारांविरोधात आहोत.
बँकेच्या कर्मचा-यांनी मजबूत व एकत्रित कृती करावी, असे आवाहन करून राजन यांनी सांगितले की, रिझव्र्ह बँकेकडे केवळ कागदी वाघ म्हणून पाहिले जाऊ नये. नियमांचे पालन न करणा-यांना शोधणे व दंड करणे याबाबतीत सातत्याने चर्चा होत राहिली पाहिजे,असे मला वाटते. देशातील प्राथमिक व सर्वाधिक आदरास पात्र ठरलेल्या असे नियामक म्हणून आम्हीच यात पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक स्तरावर उच्च एकात्मिकतेसाठी कर्मचा-यांना आम्ही प्रेरित केले आहे. तरीही नियमांच्या अंमलबजावणीची सक्ती आम्ही करत नाही, अशी एक
भावना आहे. बँकांमध्ये सध्या ४ लाख कोटींची बुडीत कर्जे असून राजन यांनी बँकांना आपले ताळेबंद मार्च २०१७पर्यंत स्वच्छ करण्याची मुदत दिली आहे. बँकेने सर्वोच्च थकबाकीदारांची यादी केली असून बँकांना एकीकडे अधिक निधी बाजूला ठेवण्यास व दुसरीकडे थकबाकीदारांचा पिच्छा पुरवून त्यांना रक्कम भरायला लावा, असा आदेश दिला आहे.
श्रीमंत आणि वरिष्ठ वर्तुळात उत्तम संबंध असलेल्यांच्या मागे लागण्याची कुणाचीही इच्छा नसते,त्यामुळे कसलीही कृत्ये करून ते सुटून जातात. आपल्याला शाश्वत आणि मजबूत विकास हवा असेल तर श्रीमंतांनी काहीही केले तरीही त्यांना अद्दल घडणार नाही, ही संस्कृती बंद केली पाहिजे,
आय सी आय सी आय बँक ५० लाख दंड का भरते? नियम मोडण्या साठी असतात.म्हणून.कर्ज बुडाव न्या साठी घेतले जातात.हे राजन साहेबाना अजून माहित नाही काय.