देशात अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. मात्र…
पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे मधुबनी जिल्ह्यातील मंदिरात दर्शनासाठी नुकतेच गेले होते. ते निघून गेल्यानंतर मंदिर स्वच्छ केल्याची घटना उघडकीस आल्यावर संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी दोषींना पकडण्याचे आदेश केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत.
देशात अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. मात्र, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर मंदिर स्वच्छ करण्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना कळल्यानंतर आपण तात्काळ पोलिसांना कळवून दोषींना तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले आहेत.
मधुबनी जिल्ह्यातील एका मंदिरात २१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मांझी दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन निघाल्यानंतर मंदिर व मूर्ती स्वच्छ करण्यात आल्याचे माझे सहकारी रामलखन राम रमण यांनी मला सांगितले, असे रामविलास पासवान यांनी सांगितले.
जोपर्यंत आपली भारतीय जनता जातीभेद , भाषाभेद ,प्रांत भेद ,वंश भेद अशा प्रकारचे सर्व भेद बाजूला ठेवून एकत्र येणार नाही तोपर्यंत आपले स्वातंत्र्य , लोकशाही सर्व कुचकामी आहे असेच म्हणावे लागेल. वरील सर्व भेद आपल्या देशाच्या प्रगतीतील फार मोठे अडथळे आहेत.