मागील काही दिवसांत मुंबईत घारी आणि कावळय़ांची संख्या वाढताना दिसत आहे.
मुंबई – मागील काही दिवसांत मुंबईत घारी आणि कावळय़ांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरातील वाढता कचरा आणि त्याची योग्न न लागणारी विल्हेवाट ही कारणे या पक्ष्यांची संख्या वाढण्यामागे असावीत, असा अंदाज पर्यावरणतज्ज्ञांनाचा आहे.
उघडयावरील कच-यात वाढणा-या उंदरांमुळे घारींना या उंदरांची सहज शिकार करता येते. तर हॉटेलमधील खरकटे, इतस्तत: फेकलेले अन्न कावळ्यांना सहज उपलब्ध होते. मटणाच्या दुकानांबाहेर फेकलेले मांसही या पक्ष्यांना अन्न म्हणून उपलब्ध होते. मात्र निसर्गाची अन्नसाखळी चुकीच्या पद्धतीने वाढत असल्याची खंत ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे महाव्यवस्थापक आणि पर्यावरणतज्ज्ञ इसाक किहिमकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, कावळे आणि घारींची संख्या वाढत असली तरी इतर पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
कावळे इतर पक्ष्यांची अंडी खातात व नवीन पिल्लांना मारतात. त्यामुळे कावळ्यांची वाढती संख्या निश्चितच इतर पक्ष्यांच्या धोकादायक ठरत आहे. घारींचे वाढते प्रमाणही चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मुळात घारी व कावळय़ांची वाढती संख्या नैसर्गिक नसून, ती कृत्रिमरीत्या वाढत असल्याने नैसर्गिक साखळीचे समन्वय साधले जात नसल्याचे किहिमकर म्हणाले. घारींची व कावळ्यांची वाढती संख्या आटोक्यात आणायची असेल तर मुळात कच-याची योग्य विल्हेवाट लागणे गरजेचे असल्याचेही किहिमकर यांनी सांगितले.
मटणाच्या दुकानांबाहेर फेकलेले मांस या पक्ष्यांना अन्न म्हणून उपलब्ध होते. मात्र निसर्गाची अन्नसाखळी चुकीच्या पद्धतीने वाढत आहे. – इसाक किहिमकर, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे महाव्यवस्थापक आणि पर्यावरणतज्ज्ञ
गेली चाळीसवर्षे मी गल्फ मध्ये काम करतोय ,कावळे. आणि घारींचे दर्शन दुरापास्थ ,मुंबईत मी कावळ्यांना विचारले कि तुम्ही गल्फ मध्ये का नाही जात ??’ तेंवा कावळ्यांनी उत्तर दिले
कि आम्हाला तिथे ( उपाशी मराइचे नाही, ) अहो , ! मुंबई शहरातली घाण आणि कचरा गल्फ मद्धे आम्हाला मिळत नाही ओ ,!