२००२ मध्ये गुलबर्ग सोसायटीत जळीतकांडातील २४ दोषींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी सोमवारी केली.
अहमदाबाद- २००२ मध्ये गुलबर्ग सोसायटीत जळीतकांडातील २४ दोषींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी सोमवारी केली. गुलगर्ब सोसायटीतील घटना अमानवी असल्याचा आरोप वकिलांनी केला.
विशेष ‘सिट’ न्यायालयामार्फत ९ जून रोजी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. न्या. पी. बी. देसाई यांच्या न्यायालयात सरकारी पक्षाचे वकील आर. सी. कोडेकर यांनी सांगितले की, या दुर्घटनेतील दोषींना भारतीय दंडसंहितेच्या कलम १४९ नुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी.
त्यांना फाशीची शिक्षा द्यायची नसल्यास त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनवावी. हे सर्व प्रकरण म्हणजे क्रौर्याचा कळस असून अमानवी आहे.
पीडितांना जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणात ३९ मृतदेह आढळले. त्यापैकी २० महिला व सहा मुलांचा समावेश होता. तसेच ३० जण बेपत्ता झाले. त्यात १४ महिला व आठ मुलांचा समावेश होता, असे वकीलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नये. ही घटना उत्स्फूर्त घडली होती.
५९,कर सेवक ज्यांना रेल्वेच्या कोच मध्ये जाळून मारले गेलेत ,त्यांच्या अपराध्यांचे काय ?????