सरकार हादरले असून मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
मुंबई- मराठा समाजाचे मोर्चे शांततापूर्ण मार्गाने निघत असून त्यातून मराठा समाजाची एकजूट दिसून येत आहे. त्यामुळे सरकार हादरले असून मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सरकारचे कारस्थान हाणून पाडून मराठा समाजाने आपली एकजूट कायम ठेवावी. अहमदनगर येथे २३ सप्टेंबरला निघणा-या मराठा समाजाच्या मोर्चात आपण स्वत: सहभागी होणार असल्याचेही विखे-पाटील म्हणाले.
मराठा समाजाच्या विरोधात आता दलित समाजाला चिथवणी देण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करून विखे-पाटील पुढे म्हणाले की, राज्यभरात ठिकठिकाणी निघालेले मराठा समाजाचे मोच्रे ही समाजातील सर्वसामान्य नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मोर्चामध्ये सहभागी सामाजिक संघटनांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलेल्या संघटनांना बाजूला ठेवून केवळ भाजप नेत्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न केला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व कोणताही नेता नव्हे तर समाजातील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. या शांततापूर्ण विराट मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने आरक्षणासह आपल्या काही मागण्या मांडल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असते तर त्यांनी मोर्चामध्ये सहभागी संघटनांना चच्रेसाठी बोलावले असते. एकीकडे मराठा नेत्यांशी चच्रेची भाषा करायची आणि दुसरीकडे केवळ भाजपच्या नेत्यांची बैठक घेऊन त्याची भाजप प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून प्रसिद्धी करायची, हा मराठा समाजातील एकजुटीला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे हादरलेल्या काही मंडळींनी दलित समाजाला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे ते म्हणाले. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाला त्यांनी सहमती दर्शवली. ते म्हणाले की, हे मोच्रे कोणत्याही पक्षाच्या किंवा दलित समाजाच्या विरोधात नाहीत. परंतु, मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीय रंग देऊन त्याविरोधात दलित समाजाचे प्रतिमोच्रे काढण्याचे कारस्थान रचले जात आहे. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत गरसमज निर्माण करून दलित समाजाला फूस देण्याचे उद्योग नेमक्या कोणाच्या आदेशावरून सुरू आहेत? असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
फूट पाडण्याची काही गरजच नाही ते तर आपोआप होईलच.