स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी ‘झेप उद्योगिनींची’ या मेळाव्यात बोलताना मराठी माणूस कसा नोकरी करण्यात धन्यता मानत असतो, हे स्पष्टपणे प्रतिपादन केले.
स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी ‘झेप उद्योगिनींची’ या मेळाव्यात बोलताना मराठी माणूस कसा नोकरी करण्यात धन्यता मानत असतो, हे स्पष्टपणे प्रतिपादन केले. आपण व्यवसाय केला पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे आणि नोकरी मागण्याऐवजी नोकरी निर्माण केली पाहिजे, अशी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनातच नसते. त्याला स्वतंत्र व्यवसाय कर, असे मार्गदर्शन करावे लागते. मात्र व्यवसायात अग्रभागी असलेल्या काही वर्गामध्ये उद्योगच केला पाहिजे, ही जन्मजात भावना असते. याकडे त्यांनी लोकांचे लक्ष वेधले.
नितेश राणे यांचे परखड बोल वस्तुस्थितीवर आधारलेले आहे. कारण मराठी माणसाचा कल उद्योग-व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी करण्याकडेच जास्त असतो. याचा अनुभव तर नित्यच येतो. दहावी किंवा बारावीचे निकाल लागले की, गुणवत्ता याद्या प्रसिद्ध व्हायला लागतात आणि गुणवान विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांची घाई सुरू होते. यातली बहुतेक मुले डॉक्टर, इंजिनीअर होऊ इच्छित असतात.
पत्रकारांनी असा प्रश्न विचारल्यावर आपण डॉक्टर होणार, आपण इंजिनीअर होणार, अशी उत्तरे द्यावीत असे त्यांना पालकांनी सांगून ठेवलेले असते आणि त्या मुलांच्या मनातसुद्धा डॉक्टर, इंजिनीअर होण्याचे वेड त्यांच्या पालकांनी पेरलेले असते. उद्योग व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहायला कोणी तयार नाही. उद्योजक होणे हे करिअर आहे, ही कल्पना जर कोणासमोर मांडली तर एक तर ती हास्यास्पद तरी वाटेल किंवा क्रांतिकारक तरी वाटेल. कित्येकांना उद्योजक म्हणजे काय, हे माहीतसुद्धा नसते. त्यांच्या दृष्टीने उद्योजक म्हणजे दुकानदार. दुकानदाराचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर कायम उभे असते, ते म्हणजे कळकट कपडे घालून दुकानात बसलेला माणूस. अशा प्रकारचा दुकानदार होणे, हे करिअर तर होऊ शकतच नाही; परंतु, उद्योजक म्हणजे दुकानदार नव्हे हे समजून सांगण्याची गरज आहे.
काही विशिष्ट जाती व्यवसाय करत असतात. विशेषत: मारवाडी समाज हा व्यवसाय करणारा, व्यापार करणारा वर्ग म्हणून ओळखला जातो आणि या जातीमध्ये जन्म घेणारा मुलगा आपल्या वडिलांप्रमाणेच कोणत्या तरी धंद्यातच उतरणार, हे ठरलेलेच असते. वंशपरंपरेने ही मुले हे व्यवसाय करत राहतात, त्याला घरातच या व्यवसायाच्या सा-या युक्त्या माहीत झालेल्या असतात. त्यामुळे इतर जातींच्या मुलांनी किंवा मुलींनी धंदा, व्यवसाय, उद्योजकता या भानगडीत पडण्याचे कारणच नाही, असे आपण ठरवून टाकलेले आहे. जे परंपरेने व्यापार करतात त्यांच्याकडे भरपूर भांडवल असते आणि त्या भांडवलाच्या जोरावर ते व्यवसाय करत राहतात. त्या लोकांनी व्यवसाय करावा आणि त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरी करावी, अशी नोकरदार वृत्ती मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेली आहे.
वास्तविक नोकरदार वृत्तीमध्ये दर महिन्याला ठरावीक तारखेला पगार मिळतो आणि त्या पगाराचे सुख नोकरदारांना हवेहवेसे वाटत असते. पण धंदा करण्यामध्ये सतत तोटयात येण्याची भीती असते. त्यामुळे ते तोटयात येण्याचे टेन्शन आपल्याला नकोच, आपण आपली नोकरी केलेली बरी. म्हणून आपण उद्योजक होण्याचा करिअर म्हणून असलेला पर्याय पूर्णपणे बाद करून टाकलेला असतो. परिणामी आपण परंपरेने नोक-याच करीत आलो आहोत आणि मराठी भाषिकांमध्ये नोकरीलाच प्रतिष्ठा आहे. या कल्पना बदलून कधी तरी उद्योजकता हा एक करिअरचा पर्याय म्हणून विचारात घेण्याची गरज आहे.
ंंंं
माननीय श्री नितेश राणे साहेब
इतर पक्षात नेहमी तरुणांचा वापर गुंडेशाही म्हणून केला जातो. आपण नेहमी तरुण वर्गाच्या पाठीशी असतात. आता पर्यंत मराठी तरुण वर्गाची मन्स्तिथि “वडापाव” पर्यंत होती,
तुम्ही तरुण वर्गाला काय हव आहे, त्यांना कस पुढे नेता येईल, आताच्या तरुणांना कस व्यवसायात आणू शकाल तुमची सतत धडपड चालू असते. आम्हाल पूर्ण विश्वास आहे. मराठी तरुणांची “वडापाव” सोडून दुसरा मोठा व्यवसाय करण्याची मनस्तिथि तुमीच बदलू शकता. तुमचे अनेक तरुणांसाठी असणारे उपक्रम नोकरी, व्यवसाय, पाणीसंदर्भात किवां विध्यांर्थांसाठी असे अनेक हिताचे उपक्रम राबवत असतात आणि पुढे हि हे उपक्रम राबवत राहावे.
जय महारष्ट्र.