शिकाऊ परवान्यांकरता घेण्यात येणा-या ऑनलाईन चाचणीची प्रतीक्षा यादी निकालात काढण्यासाठी सुट्टय़ांच्या दिवशी काम करा, अशा सूचना ‘आरटीओ’कडून देण्यात आल्या आहेत.
मुंबई- शिकाऊ परवान्यांकरता घेण्यात येणा-या ऑनलाईन चाचणीची प्रतीक्षा यादी निकालात काढण्यासाठी सुट्टय़ांच्या दिवशी काम करा, अशा सूचना ‘आरटीओ’कडून देण्यात आल्या आहेत.
दीड महिन्याहून अधिक प्रतीक्षा यादी असलेल्या परिवहन कार्यालयांना गरज भासल्यास शनिवार-रविवार काम करण्याची महत्त्वाची सूचना यात करण्यात आली आहे, मात्र शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीदेखील काम केल्यास कर्मचा-यांनी त्यांचे खासगी आयुष्य कधी जगायचे, असा प्रश्न आरटीओ कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या निर्णयाला लाल सिग्नल लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत शिकाऊ व पक्क्या परवान्यांसाठी ऑनलाईन चाचणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या संदर्भात आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असून; यंत्रणा अधिक सक्षम करण्याकरता काही सूचना परिवहन विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
सध्या अनेक प्रादेशिक परिवहन कार्यालयांत दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्याने ती कमी करून नागरिकांची गैरसोय टाळण्याकरता या सूचना करण्यात आल्या आहेत. या संदर्भात कर्मचा-यांकडे किंवा कर्मचारी संघटनेकडे कोणतेही लेखी पत्रक आलेले नाही.
लेखी सूचना आल्यास त्यावर विचार केला जाईल. सरकारच्या नियमाप्रमाणे कर्माचा-यांनी अतिरिक्त काम केल्याचा मोबदला मिळणार नाही; शिवाय सुट्टय़ांचा दिवशी काम करण्याची सूचना असल्याने हे अश्यक्य आहे. याकरता मोजक्या कर्मचा-यांची गरज भासल्यास यावर विचार केला जाईल, अशी माहिती आरटीओ कर्मचारी संघटनेने दिली आहे.
मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभाग शनिवार रविवार सोडा, पण तेथील कर्मचारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा रात्र रात्रभर थांबून अतिरिक्त पगार न घेता कार्यरत असतात. अंधेरी सारख्या इंडस्ट्री विभागात हि कितीतरी कर्मचारी वर्षाच्या ३६५ दिवस कार्यरत असतात. अशा वेळेस कोणी पाहणी करणारे विभाग सुद्धा सरकारने नेमले पाहिजे. कर्मचार्याने सर्व आयुष्य कामात गुंतवले तर त्यांचे खाजगी आयुष्य कधी जगावे. हा एक प्रकारे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कित्येक ठिकाणी कितीतरी व्यक्ती काम न करता पैसा कमवतात. जसे एखाद्या ठिकाणी विकासकाने विकास केला तर खोटी रक्कम करार पत्रावर नमूद करून उर्वरित रक्कम तेथील स्थानिक गुंडांच्या मदतीने विभागातील सर्व नागरिकांमध्ये वाटायची आणि सरकारला व घरमालकांना वेडे समजून पैसे लाटायचे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हि म्हण अशा व्यक्तींना शोभून दिसते. तर एके ठिकाणी जी व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करीत असेल तर त्याच्या कामात व्यत्यय आणत राहायचे आणि त्या व्यक्तीस कामावरून कमी करण्याचे प्रयत्न करीत राहणे. व्यक्ती आणि वल्ली अशा लोकांकरिता एक देण्यात आलेली उपमा आहे.