टंचाईची परिस्थिती, पाणीपुरवठ्याविषयीची तक्रार किंवा पाण्याची मागणी करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हेल्पलाइन सुरू केली आहे.
मुंबई – टंचाईची परिस्थिती, पाणीपुरवठ्याविषयीची तक्रार किंवा पाण्याची मागणी करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यामुळे पाण्यासंदर्भातल्या तक्रारींचा निपटारा जलगतीने होऊ शकणार आहे. तक्रारींवर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्य अभियंता आणि उपअभियंत्यांवर सोपवली आहे.
टंचाईच्या कालावधीत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सहाय्यक मुख्य अभियंता ए. पी. निरभवणे यांची समन्वय अधिकारी व उपअभियंता बी. टी. ठाकूर यांची सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षातील प्राधिकाऱ्यांचे जनसंपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-१८६०/०२२-२५३२०१४८ व फॅक्स क्रमांक ०२२- २५३५२२० असे आहेत.
पाणीपुरवठय़ासंदर्भात समस्या निर्माण झाल्या की, नागरिक मंत्र्यांच्या कार्यालयात तक्रारी करतात. या तक्रारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्या कार्यालयात पाठवणे तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींवर विभागाकडून व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत काय कारवाई झाली, याची माहितीही दरदिवशी मंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्याची जबाबदारीही नियंत्रण कक्षातील अधिका-यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्याचा निपटारा या नियंत्रण कक्षाकडून करण्यात येणार आहे.
shrimant lok pani motor laun bhartat pan amhi kay karave motor lavli tar pani milel pan lite bill khup ail ani vij vachvaichi ki pani ata haprashna tumacha ahe donhi vachvo shakat nahi koni?