दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय चुकल्याचे कबूल केले आहे.
नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय चुकल्याचे कबूल केले आहे.
दिल्लीचे सरकार सोडण्याचा आपला निर्णय योग्य होता तत्वांना धरुन होता पण राजीनाम्याची वेळ चुकल्याची कबुली केजरीवालांनी दिली. दिल्ली विधानसभेत काँग्रेस आणि भाजपने जनलोकपाल विधेयक रोखल्यानंतर आम्ही लगेच राजीनामा द्यायला नको होता.
काही दिवस वाट पहायला हवी होती. बैठका घेऊन लोकांना आपला निर्णय पटवून द्यायला हवा होता. आम्ही लोकांना गृहीत धरले. इथेच आम्ही चुकलो असे केजरीवालांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
लोकांना आपला निर्णय मान्य असेल असा आमचा समज होता इथेच आम्ही चुकलो असे केजरीवालांनी सांगितले. सरकार सोडताना जनतेमध्ये आणि आमच्यामध्ये संवादाचा अभाव होता. ही दरी भाजप आणि काँग्रेसने भरुन काढली. आम्ही जबाबदारीपासून पळ काढला असा नकारात्मक प्रचार आमच्याबद्दल झाला. यापुढे भविष्यात आम्हाला काळजी घेतली पाहिजे असे केजरीवाल म्हणाले.
YOU ARE RANCHHOD DAS KAMINE!!!!!!!!!!!