देशातील ८० कोटी लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सर्वाना परवडतील, अशा आरोग्य सुविधा, निवारा, पेन्शनचा अधिकार, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि सर्वागीण विकासाची हमी देणारा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध झाला.
देशातील ८० कोटी लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी सर्वाना परवडतील, अशा आरोग्य सुविधा, निवारा, पेन्शनचा अधिकार, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि सर्वागीण विकासाची हमी देणारा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध झाला. काँग्रेस पक्षाचा हा संकल्पनामा ‘आपलाच आवाज’ आहे, आपल्याच आशाआकांक्षांचे प्रतिबिंब आहे, याची खात्री लोकांना पटली आहे. जाहीरनाम्यात सरकारने दिलेल्या आश्वासनांवरून, लोकांना भविष्यात काय हवे आहे, तिला कशाची उणीव भासत आहे आणि त्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याची काँग्रेसला पुरेपूर जाणीव असल्याचे अगदी ठोसपणे दिसून येत आहे. या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने नाहीत तर ती पुरी करून दाखवण्याचा ओतप्रोत आत्मविश्वास व आत्मियताही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी अगदी सामान्य असेल, या पक्षाला यश मिळण्याची शक्यता फार कमीच असेल, अशा जनमत चाचण्या काही संस्था व वाहिन्यांनी प्रसिद्ध करून सत्ताधारी पक्षाबद्दल निराशाजनक चित्र उभे केले होते. या जनमत चाचण्यांना काही प्रसारमाध्यमांनीही महत्त्व देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा व लोकांचे मत दूषित करण्याचाही प्रयत्न केला. पण या प्रयत्नांचाही लोकांवर फार परिणाम झाला नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या जनमत चाचण्या व त्यांचे निष्कर्ष धुडकावून लावण्यात आले आहेत आणि पक्षाच्या विजयाबद्दल निर्वविादपणे आत्मविश्वास व्यक्त करून निवडणुकीचे निकाल सर्वाना चकित करणारे असतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. या जाहीरनाम्याचा एक विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही महिन्यात लोकांमध्ये फिरून व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. विशेषत: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून देशात वेगवेगळ्या राज्यात दौरे काढून लोकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे व गा-हाणी जाणून घेतली. राहुल गांधींनी जाणून घेतलेल्या या जनमानसाचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यात पडले आहे, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. आजचे लोकांचे निकडीचे प्रश्न म्हणजे घरे, स्वस्त अन्न-धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू, स्वस्त आरोग्य सेवा, रोजगार व निवृत्तिवेतन. आज घरांची समस्या मोठी कठीण आहे. गरीब व कमी उत्पन्न गटातीलच नव्हे तर मध्यम वर्गालाही घर ही स्वप्नातील गोष्ट वाटते. मुंबई, पुणे व अन्य शहरातील घरांच्या किमती या घरांच्या मजल्यांप्रमाणेच आकाशाला भिडल्या आहेत. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील घरबांधणी व्यवसायामुळे जमिनीच्या किमती व बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना परवडणा-या किमतीत घरे मिळणे कठीण झाले आहे. सरकारला याची कल्पना असल्याने केंद्र व महाराष्ट्रासारख्या राज्य सरकारनी गरिबांसाठी घरांच्या योजना हाती घेतल्या आहेत तसेच जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे सरकार गरीब व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी अनेक गृहनिर्माण प्रकल्प हाती घेणार आहे. घरांप्रमाणेच लोकाना स्वस्त अन्न मिळणे, हीसुद्धा मोठी समस्या आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या सततच्या महागाईमुळे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वच सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना किफायतशीर दराने धान्य उपलब्ध करून देणे, ही सरकारची मोठीच चिंता होती. यावर अत्यंत परिणामकारक उपाय म्हणून सरकारने महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजना हाती घेतली आहे. या योजनेमुळे देशातील ८१ कोटी लोकांना म्हणजे ६७ टक्के लोकांना अत्यंत कमी दरात तांदूळ, गहू,ज्वारी वगरे धान्य मिळणार आहे. ही योजना जेव्हा सर्वदूर लागू होईल तेव्हा साहजिकच देशातील अन्नधान्याचे भाव निश्चित खाली येतील व महागाईला पायबंद बसेल. आजची ही महागाई कमी झाली की, सामान्य माणसाला दिलासा मिळेल. एकूणच महागाई कमी करण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. महागाईप्रमाणेचदेशाला ग्रासणारी मोठी समस्या म्हणजे वाढती बेरोजगारी. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि जागतिक मंदीमुळे गेल्या काही वर्षात आवश्यकतेच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी वाढल्या नाहीत. त्यामुळे बेकारी वाढली व सुशिक्षित तरुणांच्या प्रमाणात नोक-या उपलब्ध नाहीत. त्यामुळे जाहीरनाम्यात येत्या पाच वर्षात १० कोटी तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अपंग व वृद्धांना निवृत्तिवेतन देण्याचेही जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातही नोक-यांमध्ये आरक्षण असावे, अशी मागणी गेली काही वष्रे करण्यात येत आहे. या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सहमती निर्माण करण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा हा भाजपसहित सर्वच विरोधी पक्षांनी कळीचा मुद्दा बनवला असून भाजपने यावरून संसदेमध्ये अनेकदा गदारोळ केला असून सभागृहाचे कामकाज अनेक वेळा बंद पाडले आहे. भ्रष्टाचाचा मुद्दा महत्त्वाचा असून भ्रष्टाचार सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये आहे, हे सिद्ध झाले आहे. सत्ताधारी पक्षानेही काही प्रकरणात चौकशी करण्यास परवानगी देऊन मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामेही घेतले आहेत. सर्वच पातळ्यांवरील भ्रष्टाचार आणि गरव्यवहार यांना पायबंद बसला पाहिजे, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधात कठोर कायदे करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस पक्षामुळेच भ्रष्टाचार माजला आहे, असे जे चित्र भाजपने उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याला हे एक प्रकारे उत्तरच आहे. देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्याच लागतात. रस्ते, पूल, वीज, पाणी, संपर्क यंत्रणा यांची सोय केल्याशिवाय उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा यांचा विकास होत नाही. त्यामुळे जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे येत्या दहा वर्षात पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तीन वर्षात विकास दर आठ टक्क्यांवर नेण्याचा पक्षाचा निर्धार आहे. परकीय चलनाची गंगाजळी वाढवायची असेल तर निर्यात वाढवावीच लागेल. निर्यात वाढीसाठी निर्यात व्यापाराला उत्तेजन द्यावे लागेल. यासाठी निर्यातीवरील सर्व कर माफ करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात उपस्थित करण्यात आलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटनात्मक संरचनेच्या रक्षणाचे जे आव्हान सद्य परिस्थितीत निर्माण झाले आहे ते परतवून लावायचे आहे. म्हणून या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, ही निवडणूक केवळ विविध योजना व आर्थिक विकास याच्याशी संबंधित नसून ती स्वातंत्र्यसनिकांनी निर्माण केलेल्या घटनात्मक संरचनेच्या रक्षणाशीही संबंधित आहे. लोकांमधील सलोखा आणि ऐक्यविरोधी भूमिका घेणा-यांशी ही निवडणूक निगडीत आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता काँग्रेसचा हा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे, असेच म्हणावे लागेल.
[EPSB]
पक्षांतराची लाट काही ओसरेना!
आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वात मोठे आणि ठळकपणे जाणवणारे वैशिष्टय़ म्हणजे पक्षांतराचे. निवडणूक प्रचार ऐन रंगात आला आहे. उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सर्वच पक्षात अंतिम टप्प्यात आली असताना आपला पक्ष सोडून दुस-या पक्षात जाण्याचे प्रकार इतक्या वेगाने सुरू आहेत की, कोण कुठल्या पक्षात काल होता आणि आज तो कुठल्या पक्षात आहे, याची संगती लावणेही कठीण होऊन […]
[/EPSB]
congressne 55 te 60 varsha satta hatat hoti tari yanche ajoon naatak chaluch aahe. Modi yaana aata sandhi deu ya .