मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी विधान भवनावर सकल मराठा समाजाचा मोर्चा धडकला असतानाच विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले.
नागपूर- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी विधान भवनावर सकल मराठा समाजाचा मोर्चा धडकला असतानाच विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. चर्चा नको, तर आरक्षण द्या, या मागणीने सभागृह दणाणून निघाले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब झाले. अखेर कामकाज करणे अशक्य झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सकल मराठा समाजाचा मोर्चा बुधवारी विधान भवनावर धडकणार असल्याने त्याचे पडसाद सकाळपासून विधान भवन परिसरातही पडत होते. सर्वच पक्षांचे सर्व जातीचे आमदार मराठा मूक मोर्चाच्या टोप्या घालून विधान भवनात दिसत होते. विधान परिषदेची सकाळी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. त्यात मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरील अर्धवट असलेली चर्चा सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नरेंद्र पाटील यांचे भाषण झाले.
सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाले. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम १८९ अन्वये दिलेल्या स्थगन प्रस्तावावर बोलायला उभे राहिले. ते म्हणाले की, विधान भवनाबाहेर सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा आलेला आहे. आतापर्यंत ४६ मोर्चे झाले आहेत आणि आता ४७ वा मोर्चा आहे. या विषयावर खूप चर्चा झाली आहे. आता चर्चा नको.
आता सरकारने आरक्षणाची घोषणा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. काँग्रेसचे सदस्य जनार्दन चांदुरकर यांनी मराठा समाजाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण न देण्याची अडचण कशी येणार नाही, हे तामिळनाडूचे उदाहरण देऊन तसेच कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन नाकारत असल्याचे सांगून प्रश्नोत्तरे पुकारली. मात्र विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. चर्चा नको, आरक्षण द्या, अशी मागणी केली. कामकाज करणे शक्य झाल्याने पहिल्यांदा अध्र्या तासासाठी, नंतर दोन वेळा दहा दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब झाले.
सरकारचे निवेदन
चौथ्यांदा कामकाज सुरू झाले, तेव्हा सरकारच्या वतीने सभागृह नेते चंद्रकांत पाटील निवेदन करू लागले. तेव्हा विरोधकांनी त्याला आक्षेत घेतला. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी निवेदन केले की, मराठा मोर्चाला मी आणि विनोद तावडे सामोरे गेलो. त्यांचे निवेदन स्वीकारले.
या मोर्चाचे नेतृत्व करणा-या पाच तरुणींना विधान भवनात घेऊन आलो आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यानिमित्ताने सरकार आणि मोर्चेकरी यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाने त्यांचे समाधान झाले आहे. विरोधक अधिकच आक्रमक झाले. अखेर कामकाज करणे अशक्य झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
विनायक मेटेंना बोलण्यापासून रोखले
विधान परिषदेत विशेष बैठकीत मराठा आरक्षणवर चर्चा होती. ही चर्चा मागच्या आठवडय़ात गुरुवारी सुरू झाली तेव्हा विनायक मेटे ऑनलेग होते. दुस-या दिवशी शुक्रवारी चर्चा सुरू झाली तेव्हा ते सभागृहात उपस्थित नव्हते. मग र्काग्रेसचे भाई जगताप यांनी ती चर्चा पुढे नेली. त्या दिवशी शेवटचे भाषण नरेंद्र पाटील यांचे सुरू होते. ते ऑनलेग होते.
आज सकाळी चर्चा सुरू झाली तेव्हा नरेंद्र पाटील यांचे भाषण झाले. त्यानंतर आपण गुरुवारी ऑनलेग होतो म्हणून आपल्याला बोलण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. मात्र त्याला शेकापचे जयंत पाटील यांनी आक्षेत घेतला. मेटे यांना शुक्रवारी संधी दिलेली असताना ते सभागृहात हजर नव्हते. त्यांची संधी संपलेली आहे. एकावेळी दोन सदस्य ऑनलेग राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना भाषण करण्यास देऊ नये, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. त्यावर सभागृहात गोंधळ झाला.
तेवहा तालिका सभापती अनंत गाडगीळ यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेसचे भाई जगताप यांनीही अक्षेत घेतला. ते म्हणाले की, मेटे यांना एवढी मराठा आरक्षणाची कळकळ होती, तर त्यांना दिलेल्या संधीच्या वेळ ते का हजर राहिले नाहीत.
पुन्हा कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. वैधानिक मुद्दा उपस्थितीत केल्यामुळे तिसऱ्यांदा कामकाज सुरू झाले तेव्हा यावर आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याने हा निर्णय आपण राखून ठेवत असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. मेटेंची बोलण्याची संधी बुधवारी तरी हुकली.
मराठा तरुण आणि तरुणीनो CM ना तुम्ही धमकावलत आरक्षण केले नाहीतर निवडणुकीत उत्तर देऊ,मग 15 वर्ष तुमचा निर्णय कुठे होता केंद्रात,राज्यात दोनी ठिकाणी कॉंग्रेस,पवार होते,मग त्यांनी का बर आरक्षण केल नाही,हा जाब त्यांना का नाही विचारलात 15 वर्षात,तीनदा त्यांना निवडून दिले काही न करता,का ते तुमच्या जातीचे पवार,राणे,विखे इ तुमच्या जातीचे हैवान भ्रष्ट ,CM मात्र न्राम्हन म्हणून 2 वर्षात त्यांना जाब विचारता हा ब्राम्हण द्वेष आहे तुमचा काही नाही,तुम्ही तरुणांनी तरी जातीभेदापासून लांब राहिले पाहिजे बघा पटतंय का,हा जाब तुम्ही १३ मराठा मुख्यमंत्री झाले त्यांना का नाही विचारत,ज्यांनी तुमच्यासाठी काही केले नाही,2 वर्षात CM दोषी तर गेल्या कित्येक वर्षातील मराठा आमदार,खासदार,मुख्यमंत्री किती दोषी बरे,त्यांना नाही तुम्हाला जाब विचारावास वाटत,