पासपोर्ट हातात आल्यानंतर परदेशी जाण्यासाठी त्या देशाचा व्हिसा मिळवावा लागतो. प्रत्येक देशाची पद्धत, नियम, कालावधी वेगवेगळा असतो. प्रथम त्या देशाचा नकाशा पाहून माहिती करून घ्यावी. इंटरनेवर सर्व माहिती मिळते.
आता आपण “अमेरिका” देशाच्या व्हिसाबद्धल माहिती घेऊ. अमेरिकन व्हिसासाठी त्यांची वेब साइट आहे ” VFS USA” ती उघडली असता त्यात सर्व नियम पहायला मिळतात. सर्व ऑनलाईन भरून प्रिंट काढाव्यात. अमेरिकेत ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांचा पत्ता आणि त्यांचे निमंत्रण पत्र, बँक स्टेटमेंट, नोकरीची कागदपत्रे, सरकारी नोकरीत असल्यास त्यांचे ना हरकत पत्र (NOC) लागते. धंदा असेल तर इंकम टॅक्स रिटर्न फाईल भरलेले आवश्क आहे. त्यांच्या वेबसाईट वरच मुलाखतीची तारीख मिळते. त्यात वेळ सुद्धा असते. जमल्यास सर्व नियमांची प्रिंटआऊट काढून जवळ ठेवावी.
सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही हातांच्या तर्जनीच्या (अंगठ्या जवळील बोटे) बोटांचे ठसे फिंगर प्रिंट घेतात. जर बोटाला काही जखम झाली असल्यास घरी परत पाठवतात, म्हणून बोटे फार सांभाळावी. विशेष म्हणजे अमेरिकेत जाऊन आपले काम झाल्यानंतर पुन्हा भारतात परतताना अमेरिकन विमानतळावर आस्थलांतरणाच्या (Immigration) वेळेस पुन्हा ठसे पाहतात, म्हणून मधल्या काळात बोटे फार सांभाळावी लागतात.
महत्वाचे नियम-
विजाची फी एचडीएफसी बॅंकेत भरावी. तेथे गुलाबी आणि लाल रंगाच्या पावत्या मिळतात, त्या जपून ठेवाव्या.
सर्व कागदपत्रांची फाईल बनवावी. त्यात क्रमाने कागदपत्रे लावावीत.
इंटरनेटवरून ज्या अर्जांची प्रिंटआऊट काढल्यात त्यांच्या, पासपोर्टच्या, वर सांगितलेल्या कागदपत्रांच्या तीन झेरॉकक्स काढून ठेवाव्यात.
मुंबईत मुलाखत द्यायची असेल, त्यासाठी appointment असेल तर पाच दिवस आधी, फक्त कामाचे दिवस धरून, लक्षात ठेवा, त्यांच्या कार्यालयात कागदपत्रे नेउन द्यावी लागतात. तेव्हा पाच दिवसांची वाट न पाहता लगेचच ती सादर करावीत.
स्थानिक कार्यालयातून मुंबईचा पत्ता बरोबर घ्यावा. तिथे सर्व स्वछ विचारावे, ते सर्व आनंदाने माहिती देतात.
मुंबईला वेळेआधी एक तास पोहोचावे.
कार्यालयात मोबाईल फोन, धारदार वस्तू, खाण्यापिण्याचे सामान नेण्यास मनाई आहे, आणि तिथे ते ठेवण्याची सोय नसते, फेकून द्यावे लागते, तेव्हा बरोबर काही नेऊ नये. आत गेल्यावर परत बाहेर कोणत्याही कारणास्तव सोडत नाहीत. तेव्हा सगळी कागदपत्रे बरोबर न्यावीत. रक्तदाब (Blood Pressure), मधुमेह(Diabetes), दमा (Asthma), वगैरे त्रास असल्यास गोळ्या बरोबर ठेवाव्यात. एवढे होऊनही काही अडचण आल्यास तेथील माणसाला न लाजता सांगावे, ते मदत करतात.
आत गेल्यावर भाषा विचारतात तेव्हा आपल्याला समजेल ती भाषा सांगावी, त्या भाषेचा दुभाषी देतात. इंग्रजी येण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपल्या भाषेत आपण उत्तरे बरोबर देउ शकतो. आपल्या भाषेतीलच दुभाषी घ्यावा. उत्तरे देताना गडबड झाल्यास व्हिसा नाकारला जातो.
आत नंबरप्रमाणे बोलावत नाहीत तेव्हा रांगेत गडबड करू नये. चार पाच तास थांबण्याची तयारी करून जावे.
आत मुलाखत देताना जेवढे विचारतील तेवढ्याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यावीत, अजिबात जास्त, अवास्तव बोलू नये. अनावश्यक माहिती देऊ नये. विचारतील तेवढीच कागदपत्रे दाखवावीत, म्हणून कागदपत्रे नीट लावून घ्यावीत. तेथे शोधत बसू नये. न विचारलेली कागदपत्रे दाखवू नयेत.
मुलाखत झाल्यावर विजा मिळाला असल्यास लगेच सांगतात, मग तीन दिवसात कुरीयरने विजा घरी येतो. जर नाकारल्यास तेथेच पासपोर्ट परत देतात.
तीन दिवसांनंतर घरी पासपोर्ट येतो, तेव्हा एचडीएफसीची पावती दाखवावी लागते, नाहीतर कुरीयरवाला कुरीयर देत नाही. विजा आल्यावर नीट तपासून पहावा. चूक असल्यास स्थानिक कार्यालयात लगेच तक्रार करावी, नाहीतर परदेशात काय त्रास होईल, याची आपण कल्पना करू शकत नाही.ट्रॅव्हल एजंटसुद्धा विजा, तिकीट काढून देतात. सर्वसाधारण सर्व देशांच्या पद्धती सारख्याच असतात, प्रत्येक देशांची वेबसाईट असते, त्यावर पूर्ण माहिती मिळते.
विमानाचे तिकीट कसे काढावे?
पासपोर्ट, व्हिसा झाला, आता विमानाचे तिकीट पाहिजे. सिझन प्रमाणे, एअरलाइन्स प्रमाणे तिकीटांची किंमत कमी जास्त होते तेव्हा सगळीकडे चौकशी करावी, घाई करू नये. काही प्रवास थेट (Direct) असतो तर काही थांबून विमान बदलून करण्याचा असतो. उदा. ऑस्ट्रेलियाला जायचे असेल Delta airlines थेट नेते, साधारण बारा तासांचा प्रवास असतो. पण जर Singapore Airlines चे तिकीट घेतले तर विमान सिंगापूरला बदलावे लागते. तेथे खूप लांब चालावे लागते. दुसर्या गेटला जावे लागते. जर ते शक्य नसेल, मुलेबाळे सोबत असतील, वय जास्त असेल, किंवा अन्य काही अडचण असेल तर Direct तिकीट घ्यावे. तिकीट आल्यावर तारीख, वेळ तपासून घ्यावी.परदेशात जाताना काय काय वस्तू बरोबर न्यावयाच्या आहेत, त्यांची प्रथम यादी तयार करावी. खराब होणारे पदार्थ शेवटी आणावेत. प्रत्येक माणसाला ठरावीक वजन न्यायला परवानगी असते. तसे त्या Airlines च्या कार्यालयात विचारून घ्यावे. कोणाचेही ऐकू नये. खूप वेगवेगळे सल्ले मिळतात. प्रत्येकाला दोन बॅगा, हातात साधारण आठ किलोची एक हॅंडबॅग, शिवाय स्त्रीयांना पर्स बाळगता येते. कॅमेर्याच्या बॅगेचे वजन होत नाही. परदेशात खाद्य पदार्थ, लोणची ,चटण्या, वगैरे खाण्याचे पदार्थ सोडत नाही. तसेच पातळ द्रव पदार्थ, धारदार वस्तू जसे चाकू, सुई, पिन, टाचण्या, ब्लेड वगैरे, आणि अंमली पदार्थ न्यायला बंदी आहे. त्या वस्तू टाळाव्यात. कॅमेरा, लॅपटॉपचे वजन होत नाही. सर्व सामान भरताना प्रत्येक वस्तू नीट पॅक करावी. (वजनाचा ताणकाटा (Spring balance) आणावा, म्हणजे घरीच वजन करता येते.) वजन जास्त असेल तर विमानतळावर काढायला लावतात. तिथे फेकून द्यावे लागते. उगीचच धावपळ होते. मानसिक त्रास होतो, काय फेकावे कळत नाही.आता बॅगा नीट भरल्यावर प्रत्येक बॅगेत काय भरलेय याची यादी तयार करा. ती पुढे उपयोगी पडते. एखादी शाल सोबत ठेवावी, कदाचित विमानात थंडी वाजते. विमानतळावरही उपयोगी पडते. लगेच लागणारी औषधे, चष्मा, मोबाईल, जवळ बाळगावे.परदेशात जाताना आरोग्य विमा करणे फार महत्वाचे असते. विमा घेताना त्यांच्या अटी नीट पाहून घ्याव्यात. नियमात बारीक अक्षरात काय लिहीले आहे ते नीट वाचून घ्यावे. ICICI prudential, New India Assurance, Bajaj वगैरे कंपन्या आहेत. जाण्याच्या आदल्या दिवशी घ्यावा. तारीख, वेळ, नाव, नावाचे स्पेलिंग, पासपोर्ट नंबर, देश नीट तपासून घ्यावे. आपण निरोगी असाल तरी पॉलिसी घ्या, कारण परदेशात डॉक्टरचा खर्च परवडत नाही. मुख्य म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या निर्धास्त राहू शकतो.ज्या देशात जायचे आहे त्या देशातील चलनात पैसे घ्यावेत. काही रक्कम बाळगायला परवानगी असते, कारण मध्ये फोन करणे, तिकडे उतरल्यावर घरी जाण्यासाठी, विमानतळावर काही खाण्यासाठी पैसे लागतात.पासपोर्ट, तिकीट सतत जवळ बाळगावे. लक्षात ठेवा, सर्व काहिही हरवले तरी चालेल, पण पासपोर्ट अतिशय महत्वाचा आहे, कारण तीच तुमची ओळख आहे. सर्व ठिकाणी तो दाखवावा लागतो. विमानतळावर किंवा कोठेही, कोणालाही. मात्र पासपोर्ट हा अधिकृत माणसाशिवाय इतर कोणालाही दाखवू नये. बॅगांना कुलूप लाऊ नये. बॅगेच्या हॅंडलला ओळखीसाठी एकाच रंगाचा रूमाल अथवा रिबन बांधावी, परदेशात विमानतळावर बॅगा ओळखताना मदत होते कारण सर्व बॅगा सारख्याच दिसतात. बॅगा बदलल्यास खूप घोटाळा होतो. विमानतळावर शक्यतो तीन तास आधी पोचावे. तिकीटावरची तारीख आणि वेळ नीट पहावी. कारण वेळ सलग चोवीस तासांची असते म्हणजे, 29 Sept 2011 रोजी 0100 वाजता म्हणजे 22 व 23 तारखेच्या रात्री एक वाजता. पण 29 Sept 2011 रोजी 1300 वाजता म्हणजे 29 Sept 2011 ला दुपारी एक वाजता. गेल्यावर ट्रॉली घ्यावी, त्यावर सामान ठेवावे, आपणच ढकलावी, कारण पुढे आपल्यालाच ढकलावी लागते. पासपोर्ट आणि विमानाचे तिकीटाची पर्स जवळच ठेवावी. दारात तिकीट दाखवून आत जावे. सर्व सामान X-Ray मशीन मध्ये द्यावे, पलीकडच्या बाजूने बाहेर आल्यावर कर्मचारी बॅगांना सिल करतात. तेथून Boarding pass च्या रांगेत उभे रहावे. तिथे तिकीट पाहून, सामानाचे वजन करतात, जास्तीचे काढायला लावतात, कोठे टाकायचे पंचाईत होते, म्हणून एखाद्या माणसाला आत तिकीट काढून न्यावे म्हणजे त्याच्याकडे परत देता येते. तेथील कर्मचारी पूर्ण सहकार्य करतात. हातातील बॅगांचे वजन सुद्धा चेक होते. तो अधिकारी , परदेशात आपण कोठे जाणार आहोत, तेथील पत्ता विचारतो, तेव्हा आधीच एका कागदावर पत्ता, फोन नंबर लिहून जवळ ठेवावा, कारण परदेशातील पत्ता आठवत नाही, पुढे परदेशातही तो कागद उपयोगी पडतो, कारण त्यावर फोन नंबरही असतो. नंतर आपल्याला Boarding Pass मिळतो, त्यावर Seat No., Flight No. असतो. नंतर Custom chech असते तिथे Camera दाखवावा. म्हणजे येताना त्यावर Duty पडत नाही. पुढे Immigration check मध्ये X-Ray हातातील सामान आणि आपल्याला सुद्धा त्यातून जावे लागते. त्या Metal Detector खाली महिलांना त्रास होतो, कारण बांगड्या, हेअर पिन वाजतात. अशावेळेस त्यांना बाजूला घेउन महिला पोलीस Hand detector ने चेक करतात. आत गेल्यावर आता मात्र कोणत्याही परिस्थितीत बाहेर येता येत नाही.
विमानात प्रवेश कसा करावा?
आंतराष्ट्रीय विमानात प्रथम First class, नंतर अपंगांना, नंतर मुलेबाळे असणार्यांना सोडतात. नंतर मागील नंबराप्रमाणे सोडतात, तेव्हा नीट ऐकून जावे. घाई करू नये. विमानात गेल्यावर सीट नंबर पाहून बॅग वर ठेवावी, जवळ ठेवू नये. सर्व सूचना पाळाव्यात. विमानात सर्व मिळते, तेव्हा लाजू नये, जेवणात काय पाहिजे ते मागून घ्यावे. जेवढे पाहिजे तेवढे मिळते, त्यामुळे उपाशी राहू नये. एअर होस्टेस इंग्रजी बोलतात, पण न समजल्यास समजावून सांगतात. आपल्याला मिळेल याची वाट न पाहता, मागून घ्यावे. औषधे, गोळ्या सुद्धा मिळतात. शांतपणे, आनंदात प्रवास करावा. विमान वर जाताना आणि खाली येताना पट्टा बांधावा. विमान थांबल्यावर घाई करू नये, नीट शिस्तीत बाहेर यावे. सामान घ्यायला विसरू नये. बाहेर आल्यावर Immigration ला रांग लावावी. तिथे पासपोर्ट दाखवावा लागतो, त्यावर शिक्का मारतात. त्यानंतर पासपोर्ट मात्र आठवणीने परत घ्यावा.आता सामान घ्यायला जावे. जाताना ट्रॉली बरोबर घ्यावी. तिथे फिरत्या Conveyor वरून बॅगा येतात, जर गर्दीत बॅगा घ्यायला जमले नाही अणि पुढे गेली तर काळजी करण्याचे कारण नाही, गोल फिरून ती परत येते. नाहीतरी आपण खुणेला रूमाल बांधलेला असतोच. त्या बॅगा आणि हातातील सामान पुन्हा Custom मध्ये X-Ray साठी टाकावे लागते, तिथे आक्षेपार्ह वस्तू सापडल्यास बॅगा उघडायला लावतात, त्यावेळेस शांतपणे उघडायच्या, वाद करायचा नाही. जे फेकतात ते फेकू द्यायचे, मोह करायचा नाही. परदेशात सर्व नियमाप्रमाणे वागतात, भावनेला जागा नाही. तिथे आपले काहिही ऐकत नाहीत. नाहीतर सरकारी प्रक्रिया चालू होतात, ते आपल्याला जमत नाही. यानंतर सर्व पूर्ण होते, आपण बाहेर यायला हरकत नाही. बाहेर आपल्याला आपली माणसे भेटतात. मग खरा आनंद सुरु होतो, परदेशातील सुख विमानतळापासून सुरू होते. पण जर कोणी भेटले नाही, तरी घाबरून जावू नये, फोन करावा. जर जमत नसेल तर कोणालाही एखादा डॉलर दिल्यास तो फोन लावून देतो. न जमल्यास विमानतळावरच टॅक्सी बुक करून आपल्याकडे असलेला पत्ता चालकाला दाखवून इच्छित स्थळी जावे.
अप्रतिम