मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने घडवला होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सल्लागार महमूद अली दुर्रानी यांनी दिली. यामुळे पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
नवी दिल्ली- मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने घडवला होता, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सल्लागार महमूद अली दुर्रानी यांनी दिली. यामुळे पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा कोणताही सहभाग नव्हता, असेही दुर्रानी यांनी सांगितले. येथील इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसीसमध्ये आयोजित दहशतवादाशी लढताना, या विषयावर दुर्रानी बोलत होते. ते म्हणाले, मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील एका दहशतवादी संघटनेचा हात होता. सीमापार केलेल्या हल्ल्याचा हा उत्कृष्ट नमुना होता, असेही ते म्हणाले.
जमात-उद-दवाचा दहशतवादी हाफिज सईदवर त्यांनी टीकेची झोड उठवली. तो काही कामाचा राहिलेला नाही. पाकिस्तानने त्याच्याविरोधात सक्त कारवाई केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले, भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश गेल्या काही दशकांपासून छुप्या युद्धाचे बळी ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेला दहशतवाद हा एकमेव धोका असल्याचे ते म्हणाले.
अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हनीफ अतमर यांनीही अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तान दहशतवादी अड्डे उभारत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुंबईवर २००८मध्ये झालेल्या हल्ल्याचा फेरतपास करावा आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हफिझ सईद याच्यावर या प्रकरणात खटला दाखल करावा, अशी मागणी भारताने गेल्या महिन्यात केली होती. भारताने पाकिस्तानला २४ भारतीयांच्या साक्षी नोंदवाव्यात, अशी मागणी करून त्यांची कागदपत्रे पाठवली होती.
दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतात येऊन मुंबईवर २००८मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहभागी असणा-या अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. त्यावेळीच या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, पुरावे देऊनही पाकिस्तान हे आरोप नाकारत आहे.
फार जुनी झाली ही बातमी , फुकट उगाळीत बसू नका .नवीन काहीतरी शोधा.