आसाराम बापूंच्या वक्तव्याचा देशभरातील जनता निषेध व्यक्त करत असताना आयटम गर्ल राखी सावंतनेही कडक शब्दात टिका केली.
नवी दिल्ली- आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. थंडी वाढल्याने त्यांच्या बुद्धीचा पाराही थंडावला आहे, अशा शब्दात राखीने आसाराम बापूंवर खडसून टिका केली. ‘खरे तर मी आसाराम बापूंना खूप मानायची परंतु या वक्तव्यानंतर मला त्यांचा अतिशय राग आला आहे’, असे राखी म्हणाली. तसेच बापूंच्या आश्रमात अनेक महिला असतात, त्यांनाही बापू असाच सल्ला देतील काय, असा खणखणीत प्रश्नही राखीने विचारला आहे.
अभिजीत मुखर्जी, कैलाश विजयवर्गीय यांच्यानंतर आता आसाराम बापू यांचेही नाव अशी बेताल वक्तव्य करणा-यांमध्ये जोडले गेले आहे. तसेच त्या मुलीच्या कुटुंबातील लोकांना सहानभूती देण्याऐवजी राजकारणी, साधू-बाबा, अशी बेताल वक्तव्ये करतात ही अतिशय खेदाची बाब असल्याचे राखीने म्हटले आहे.
आसाराम बापूंवर चौफेर टिका होत आहे. यात सोशल नेटवर्किंग साइट्सही मागे नाहीत. धर्मगुरु श्रीश्री रविशंकर यांनी बापूंचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकीय स्तरातूनही टिका केली जात असताना आसाराम बापूंनी बलात्का-यांची बाजू घेण्याचे काहीच कारण नव्हते. काँग्रेसने धर्मगुरुंना विचारपूर्वक प्रतिक्रिया द्याव्यात असे सुचवण्यात आले आहे. तर भाजपनेही बापूंनी आपले वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे.
[EPSB]
बलात्काराला तरुणीच जबाबदार »
दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेला पीडित तरूणीच जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करुन आसारामबापू यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
[/EPSB]
ही बया तर प्रसिद्धीची कुठलीच संधी सोडत नाही!