वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेंट्रल ऑफ स्कूलचे प्रमुख फ्रान्सिको फर्नाडिस यांनी नुकतेच वनमहोत्सव कार्यक्रमात केले.
कुडाळ – वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेंट्रल ऑफ स्कूलचे प्रमुख फ्रान्सिको फर्नाडिस यांनी नुकतेच वनमहोत्सव कार्यक्रमात केले.
गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जोपासना करण्याचा संदेश बॅ. नाथ पै स्कूलच्या सी. बी. एस.च्या मुलांनी वृक्षारोपण करून केला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने घराकडून एक रोपटे आणून संस्थेच्या प्रांगणात वनमहोत्सवांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.
झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. या वेळी फर्नाडिस म्हणाले की, वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. दीपाली काजरेकर, सुंदर गाळवणकर, शिल्पा मराठे, अमृता गाळवणकर, श्वेता खानोलकर, पौर्णिमा दाभोलकर, श्वेता कुवाडकर, नेहा पडते, रोहिणी दिघे, तेजस्विता करंगुटकर, श्याम तेंडोलकर, अभिजित परब, श्रीमती फर्नाडीस, आनंद मेस्त्री, वैशाली ओटवणेकर, सुविधा सामंत, नम्रता राऊळ, अमृता साटेलकर, शर्मिला गोसावी, रिमा राणे, दीप्ती राणे, संध्या प्रभू, गौरी गावडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
Realy its amazing and it has easy words and sentence for a child to understand