इतिहासकार पार्था चॅटर्जी यांनी लष्करप्रमुख मेजर जनरल बिपिन रावत यांची ब्रिटीश जनरल डायरशी तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली – इतिहासकार पार्था चॅटर्जी यांनी लष्करप्रमुख मेजर जनरल बिपिन रावत यांची ब्रिटीश जनरल डायरशी तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. चॅटर्जी यांनी एका लेखात काश्मीरमध्ये दगडफेक करणा-याना रोखण्यासाठी ‘मानवी ढाली’चा वापर केल्याच्या घटनेवरून रावत यांची तुलना डायरशी केली आहे. यावरून लष्कराच्या माजी अधिका-यानी चॅटर्जी यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे आपण विचारांवर ठाम असल्याचे चॅटर्जींनी म्हटले आहे.
ब्रिटीश जनरल डायरच्या आदेशानंतर निष्पाप भारतीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चॅटर्जी यांनी एका न्यूज पोर्टलसाठी लिहिलेल्या लेखात काश्मीर ‘जनरल डायर’च्या काळातून जात आहे, असे म्हटले आहे. चॅटर्जी यांनी लेखाची सुरुवातच जनरल डायरच्या विधानाने केली आहे. त्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचे डायरने समर्थन केले आहे. त्यानंतर त्यांनी काश्मीरमधील मानवी ढालीच्या वापराच्या घटनेचा उल्लेख केला आहे. काश्मीरमध्ये ‘डर्टी वॉर’ सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लष्करप्रमुखांनी या घटनेचे समर्थन करताना जवानाने कर्तव्य बजावल्याचे सांगून केवळ समर्थनच केले नाही तर, मेजर गोगोईंची पाठही थोपटली आहे, असाही उल्लेख त्यांनी केला आहे. जालियनवाला बागेत भारतीयांची हत्या करणारा डायरही या कृत्याला कर्तव्य समजत होता. आपण बंडखोरांचा सामना करत आहोत, असे त्याला वाटत होते, असे या लेखात म्हटले आहे.
१९१९ मधील जालियनवाला बाग हत्याकांड आणि काश्मीरमध्ये लष्कराने मानवी ढालीचा केलेला वापर यामध्ये साम्य आहे.
– पार्थो चॅटर्जी, इतिहासकार
हे विधान धक्कादायक आहे.
– जनरल व्ही. पी. मलिक,
माजी लष्करप्रमुख
चॅटर्जी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे.
– बी. डी. मिश्रा, ब्रिगेडियर
भारतात असे लोक असतील तर पाकिस्तानची गरजच नाही.
– कर्नल व्ही. एन. थापर
अतिरेकी आणि पार्था चॅटर्जी सारखी माणसे या मध्ये जर गोळी घालायची असेल
तर पहिली पार्था चॅटर्जी सारख्यांला गोळी घातली पाहिजे …….
भारताला बाहेरील शत्रूनपासून कमी व घरच्याच शत्रून पासून जास्त धोका आहे .