‘एआयबी नॉकआऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमावर अनेकांनी अक्षेप घेतलेला असताना राखी सावंतने या कार्यक्रमाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.
‘एआयबी नॉकआऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमावर अनेकांनी अक्षेप घेतलेला असताना बोल्ड आणि बिनधास्त राखी सावंतने या कार्यक्रमाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे तसेच तिने करण जोहर आणि रणवीर कपूरचाही बचाव केला आहे.
एआयबी नॉकआऊट’च्या व्हिडीओमधील आवाज करण आणि रणवीरचा नसल्याचा दावा राखीने केला आहे. करण आणि रणवीरला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रसिद्ध कलाकार असल्याने त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न चालू आहे.
राखीला एका कार्यक्रमामध्ये ‘एआयबी नॉकआऊट’बद्दल विचारल्यावर ती बोलत होती. तिच्या मते ‘एआयबी नॉकआऊट’ हा युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला कार्यक्रम आहे. एआयबी नॉकआऊट हा एक विनोदी कार्यक्रम आहे. याबद्दल कोणी काय विचार करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे राखी म्हणाली.
तुम्ही पण कोणाच ऐकता.तिचा वेळ जात नसेल म्हणून काही तरी बोलते