महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी ६५ वा प्रजासत्ताक दिन असा फलक लावण्यात आला होता.
मुंबई- महाराष्ट्र सरकारच्या मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी ६५ वा प्रजासत्ताक दिन असा फलक लावण्यात आला होता.
राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राचे वारीचे चित्ररथ, भवानी गोंधळ, लेझीम आणि तुतारी वादकांनी राजपथ दणाणून सोडले. मात्र मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी ६५ वा प्रजासत्ताक दिन असा फलक लावल्याने वाद निर्माण झाला आहे. देशाचा हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे याची सरकारला माहिती नसणे ही दुर्दैवी बाब आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणात जबाबदार असलेल्या अधिका-यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवाजी पार्कवर सरकारच्या वतीने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘६५ वा प्रजासत्ताक दिन’ असा मोठा फलक लावण्यात आला होता. विशेष म्हणजे राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांच्या भाषणातही ६५ वा प्रजासत्ताक दिन असाच उल्लेख केला.
गेल्या वर्षी पुण्यात, एका राजकीय गाढवाने प्रजासत्ताक दिना ऐवजी स्वातंत्र दिनाचा फलक लावून आपले गाडवी ज्ञान पाजळले
होते, …………..जय महाराष्ट्र !!