रायगड जिल्ह्यात एकामागून एक लाचखोरीची प्रकरणे उघड होत असून, लाच घेताना अनेक सरकारी अधिका-यांना व कर्मचा-यांना अटक झालेली असली तरी लाचखोरी थांबलेली नाही.
अलिबाग – रायगड जिल्ह्यात एकामागून एक लाचखोरीची प्रकरणे उघड होत असून, लाच घेताना अनेक सरकारी अधिका-यांना व कर्मचा-यांना अटक झालेली असली तरी लाचखोरी थांबलेली नाही.
१० महिन्यांत रायगड जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने लाचखोरीचे २५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यातील ९ गुन्हे मागील दोन महिन्यांतील आहेत. त्यात ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. यात ३० लोकसेवक आहेत. तर त्यांना सहकार्य करणा-या सात अन्य व्यक्तींचा समावेश आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालय १, भूमी अभिलेख १, सार्वजनिक बांधकाम विभाग २, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड २, जिल्हा परिषद ३, महसूल विभाग ६, नगरपालिका १, पोलिस ३, सहकार २, ग्रामपंचायत २, महावितरण व नगररचना विभागांमध्ये गुन्ह्यांचा समावेश आहे. अपसंपदेची १७ प्रकरणे असून त्याची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत दोन गुन्हे दाखल केले.
काही अधिकारी खासगी व्यक्तीला एजंट नेमतात. त्या व्यक्तींवरदेखील लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक होऊ शकते.
– सुनील कलगुटकर, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड
ह्या लाचखोर भड व्यांचे हात पाय तोडा,म्हणजेच भडवे सुधरतील,