प्रगतशील सिंधुदुर्गाला सोशल नेटवर्कच्या जगात अधिक स्मार्ट करण्यासाठी युवानेते नितेश राणे यांनी पाऊल उचलले आहे. आजची गरज लक्षात घेऊन कणकवलीसह पाच शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात वायफाय सेवा सुरू केली जाणार आहे.
कणकवली – प्रगतशील सिंधुदुर्गाला सोशल नेटवर्कच्या जगात अधिक स्मार्ट करण्यासाठी युवानेते नितेश राणे यांनी पाऊल उचलले आहे. आजची गरज लक्षात घेऊन कणकवलीसह पाच शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात वायफाय सेवा सुरू केली जाणार आहे.
कणकवली शहरातील वाय-फाय सेवेचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते केला जाणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि ट्विटरवरील फॉलोअर्स यांचा जिल्ह्याचा विकास हा केंद्रस्थानी ठेऊन नितेश राणे थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ओमगणेश निवास स्थानी आयोजित पत्रकार परिषदेत समाज उपयोगी उपक्रमांची माहिती युवा नेते नितेश राणे यांनी दिली. सोशल मीडियाचे महत्त्व आपल्याला पूर्णत: ज्ञात आहेच आणि म्हणूनच आपण अशा माध्यमांचा वापर करणा-या सभासदांचा सन्मान राखून त्यांना एकत्रित आणण्याचा फेसबुक, व्हॉटस्अॅप आणि ट्विटरवरील सभासदांशी समोरासमोर विचारमंथन व्हावे, असे आपल्याला वाटते. म्हणूनच जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाचा सहभाग असावा, त्यांच्या विचारांचा प्रत्यक्षरीत्या आदर केला जावा, यासाठी आपण हा संवादाचा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वा. एसएसपीएमच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नारायण राणे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
१५ ऑगस्ट रोजी वायफाय सेवेचा प्रारंभ
कणकवली शहरात वाय-फाय सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आपण हाती घेतला आहे. नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत असताना सर्वाना वायफायची सेवा कोणताही पक्ष भेद न ठेवता देण्याचा आपला मानस आहे. तो नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जाणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. कणकवली शहरात एस. टी. बसस्थानक या ठिकाणी वाय-फाय सेवेचा प्रारंभ एका शानदार सोहळ्यात उद्योगमंत्री राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वाय-फाय प्रक्रिया कशी चालते, प्रत्येकाच्या मोबाइलवर वाय-फाय सेवा अॅक्टिवेट होण्यासाठी पासवर्ड काय आहे, याबाबतची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
कणकवलीनंतर कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या ठिकाणीही काही दिवसांतच वाय-फाय सेवा सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राणे यांचा आज रत्नागिरीत सत्कार
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून देण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी सत्कार होणार आहे. रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृहात दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील मराठा बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रत्नागिरी क्षेत्रातील अग्निशमन केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ दुपारी १२ वाजता होणार आहे. या कार्यक्रमालाही उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.
“जय हो “नितेश रानेजीन्की !!!!!