मुंबई – भीमा-कोरेगाव प्रकरणा नंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विधान भवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्या वतीने संविधान परिवाराच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना लांब ठेवण्यात येणार असल्याची माहिती संविधान महामोर्चाच्या निमंत्रण समितीने दिली.
या मोर्चात भाजप-सेना सरकार व आरएसएसच्या विरोधात असून संविधान मानणा-या पक्ष संघटनांचा हल्लाबोल असणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी चेंबूर येथील महाराणा हॉटेलात आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, गंगाराम इंदिसे, मनोज संसारे, गायक विष्णू शिंदे, अशोक कांबळे, अमोल बोधिराज, मोहिनी अनावकर आणि अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे नेते आणि भीम आर्मीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोर्चानंतरची भूमिका काय? आम्ही जनतेपुढे जाताना जनतेला कोणता विश्वास द्यावा? हे स्पष्ट करण्यात यावे. असेही मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम मोर्चा यशस्वी करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात येते.
संविधानप्रेमी जनतेने या मोर्चात मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच मोर्चानंतर एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा राहावा. याकरिता निकराचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासनही यावेळी उपस्थित नेत्यांनी दिले. संविधान परिवार मोर्चाकरिता यावेळी निमंत्रक कमिटी घोषित करण्यात आली.
यामध्ये स्वारिपचे अरुण जाधव, अमित हिरवे, राष्ट्रीय दलित पँथरचे वसंत कांबळे, मुरलीधर जाधव, आरपीआय (एकतावादी) मनोहर आगळे, बाबा शिंदे, पीआरपीचे मिलिंद सुर्वे, राजेश जाधव, रिपब्लिकन जनशक्तीचे सुजित पगारे, परिवर्तन कलामंचचे अशोक निकाळजे, वैशाली शिंदे, संगीतकला अकादमीचे दिनेश जाधव, आनंद अहिरे, एकता कला मंचाच्या मीनाक्षी थोरात, लोक कलावंत सांस्कृतिक मंच विनोद विद्यासागर, रामलिंग जाधव यांची निमंत्रण समितीत निवड करण्यात आली.
संविधान बदललेच पाहीजे. ना सवलती ना राखीव जागा.
ह्या सगळ्यावर उपाय एकच….. संविधान बदललेच पाहीजे. ना सवलती ना राखीव जागा. आणि मग बोला…. हम सब एक है.