भारतात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखायचा असेल व देशाचा विकास करायचा असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधा, अशी मुक्ताफळे विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी उधळली आहेत.
नवी दिल्ली- भारतात इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखायचा असेल व देशाचा विकास करायचा असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधा, अशी मुक्ताफळे विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी उधळली आहेत.
विहिंपने राम मंदिर उभारण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्यांनी देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता तोगडियांनी वरील विधान करून आगीत तेल ओतले आहे.
जबलपूर येथील विहिंपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना तोगडिया यांनी इसिसचा भारतातील प्रभाव रोखण्याची गरज असल्याचे सांगितले. भारताचा सीरिया होऊ नये, असे वाटत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधणे गरजेचे असल्याचा अजब तर्क त्यांनी लढवला आहे. तसे झाल्यास इसिसला लगाम बसेल आणि देशाची आर्थिक प्रगतीही होईल, असाही जावईशोध तोगडियांनी लावला आहे.
राममंदिरासाठी कायदा तयार होणे गरजेचे आहे, असे तोगडिया यांनी पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. ज्यादिवशी हा कायदा संसदेत मंजूर होईल त्यादिवसापासून मी स्वत: मोदींच्या विजयाची पताका खांद्यावर घेऊन देशभर फिरेन, असे तोगडिया यांनी यावेळी सांगितले.
Ankhin बाता marayachya astil तर विचारा त्या togadiyala.!