महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय गणंग मंत्री भरलेले आहेत. कुठून जमा केले आणि कसे मंत्री झाले. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ नौटंकी झालेले आहे. मुख्यमंत्री काहीही बोलतात. कुंडल्या काढण्याची भाषा करतात. कोणताही वकूब नसलेले कोणीतरी राजकुमार बडोले हे मंत्री आहेत आणि मोठा विनोद म्हणजे त्यांच्याकडे सामाजिक न्याय खाते आहे.
सामाजिक न्याय या शब्दाचा प्राथमिक अर्थ त्यांना कळला असता तर औरंगाबादेतील कार्यक्रमात अशी बेताल बडबड केली नसती. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एक इतिहास घडवला आहे आणि तो इतिहास लोकशाहीच्या उद्दात्त शिकवणुकीनुसार घडवलेला आहे. त्या शांततामय मोर्चाचे बडोलेंना मूल्य समजायला दहा जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांनी मोर्चाची टिंगल केली. ‘कोणी उठतो आणि मोर्चा काढतो’. बडोले नशिबाने मंत्री झाले आहेत. त्यांच्या मागे दहा कुत्री तरी जमतील का? लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या मोर्चाला अवमानित करणारे हे मंत्री. त्यांना महाराष्ट्रात फिरणे अशक्य केले पाहिजे. शांतता मार्गाने सर्वत्र निषेध व्यक्त व्हायला हवा, असे भंपक मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. इकडे बडोले तिकडे जानकर. धनगर समाजाच्या जोरावर मंत्री झाले आणि आता धनगर समाजाचे कल्याण झाले असे समजून ते बेताल बडबड करत सुटले. बडोलेही तसेच, ही असली फालतू मंडळी महाराष्ट्रात मंत्रिमंडळात जमा झाली. इतके पोरकट मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीही नव्हते. काय वेळ आली महाराष्ट्रावर?
भगवानगडाच्या पवित्र स्थानावरून जे काही अकलेचे तारे तोडले गेले, ती मंडळी महाराष्ट्रात मंत्री आहेत की, मवाली आहेत, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. सत्ता मिळाली म्हणून ते कोणी महादेव जानकर एवढे माजले आणि उतले आहेत की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी टिप्पणी केली. महादेव जानकरांना महाराष्ट्रात विचारतो कोण? महाराष्ट्राच्या जडण-घडणीत हे जानकर कुठे आहेत? त्यांचा संबंध काय? त्यांनी आजपर्यंत केले काय? महाराष्ट्राची उभारणी करण्यात त्यांचे योगदान काय? त्यांचे वाचन काय? त्यांचा पगार काय? ते बोलतात किती आणि काय बोलतात? डोके ठिकाणावर आहे का? लाल दिव्याच्या गाडीत बसलो म्हणजे स्वर्गाला हात टेकले असे ते समजतात. पण महाराष्ट्र समजायला त्यांना फार वेळ लागेल. धनगर समाजाचा नेता म्हणून त्यांनी आपला जुगाड जमवला. पण त्या गरीब समाजाचे जानकर मंत्री झाल्यामुळे काय भले झाले? ज्या समाजाच्या जोरावर ते मंत्री झालेत तो समाज जानकर मंत्री झाल्यामुळे खूश झाला. पिवळा भंडारा उधळला गेला. त्या समाजाच्या खूप अपेक्षा होत्या. पण आपले दुकान थाटले गेले आणि या जानकरांनी समाजाला वा-यावर सोडले. ते कोणी सदा भाऊ खोत. महाराष्ट्राशी यांचा काय संबंध? बांडगुळासारखे वर आले. मंत्रीपदे अडवून बसले आणि महाराष्ट्राच्या मानदंडांवर पिचकारी मारत राहिले. एवढी विकृत वृत्तीची माणसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील आहेत. महाराष्ट्राचं भलं ही मंडळी करणार? महाराष्ट्रावर ही काय वेळ आली? कोण जानकर आणि सदा भाऊ खोत मंत्री म्हणून मिरवत आहेत आणि उचलली जीभ लावली टाळय़ाला असल्या पोरकटपणे मंत्रीपदाला न शोभणारे त्यांचे वर्तन महाराष्ट्राची मान लाजेने खाली घालणारी आहे. जो मंत्री लालदिव्याच्या गाडीत फिरतो आहे, तो भगवानगडावरील भाषणात जिल्हाधिका-याला हरामखोर म्हणतो.. लाज वाटली पाहिजे आणि महाराष्ट्राने असले मंत्री सहनही करता कामा नयेत. भगवानगडावरील सभेला कलेक्टरनी परवानगी नाकारली म्हणून जानकरांना राग. ही परवानगी का नाकारली गेली याच्या खोलात गेले तर सहाव्या मजल्यावरूनच तशा सूचना गेल्या. खडसेंची विकेट गेलेली आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी एक-दोन विकेट घ्यायच्या आहेत. त्यांच्या जाळ्यात काही मंडळी आपोआप जात आहेत. पंकजा मुंडे यांची गाडी अशीच भरधाव निघालेली आहे. त्या लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असे त्यांना वाटते. लोकांना काही तसे वाटत नाही. पण महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचे नेतृत्व आपल्या वडिलांच्या नंतर आपल्या ताब्यात यावे, अशा राजकीय डावपेचाने पंकजा मुंडे सध्या खेळी खेळत आहेत. भुजबळांची भेट त्याच हिशोबाने. भुजबळांबद्दल वडिलकीचे प्रेम असते तर त्यांना अटक झाली तेव्हाच पंकजाबाई त्यांना भेटायला गेल्या असत्या. मराठा समाजाचे महामोर्चे धडकले आणि मग पंकजाबाईंची धडधड वाढली. शिवाय त्यांचे बंधू.. आता राखी बांधली म्हणजे बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आली. पण भाऊच एवढा वाह्यात बोलतो आहे की, ‘या भावापासून मला आवरा रे..’ असे म्हणण्याची पाळी उद्या पंकजाताईवर येणार.
एकूणच महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेली मंडळीच करत आहेत. सध्या एक जाहिरात चालू आहे. ‘महाराष्ट्र घडतोय..’ प्रत्यक्षामध्ये जाहिरात करण्याची वेळ आली आहे. ‘महाराष्ट्र बिघडतोय..’ हे वाह्यात बोलणारे जानकरांसारखे मंत्री असल्यावर महाराष्ट्र बिघडायला वेळ का नाही लागणार? आवाका नसताना लाल दिव्याच्या गाडीत बसले आणि यांची डोसकी फिरली. परिणामी महाराष्ट्रातील सगळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू झाला. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी कान धरून अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवायला हवा होता. हे असे मंत्री म्हणजे महाराष्ट्राची लाज आहे. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचा काळ आता संपलेला आहे. वाचन, विश्लेषण, महाराष्ट्राच्या प्रश्नांची माहिती, त्याचा अभ्यास, महाराष्ट्रात सत्तेत नसलेल्या पण विषयांचे ज्ञान असलेल्याशी चर्चा, साहित्य, कला, संस्कृती, या मंडळींचा आदर, महाराष्ट्रातील कलांना उत्तेजन असे या महाराष्ट्राचे सुसंस्कृत वातावरण सध्याच्या सरकारने पूर्णपणे निकालात काढून टाकले आहे. ते सावरा म्हणून कोणी मंत्री आहेत. ते आदिवासी आहेत आणि त्यांच्या समाजातील मुले कुपोषणाने मरत असताना त्यांना त्याची लाज नाही. त्यांच्याच भागातील लोक मंत्र्याला पाय ठेवून द्यायला मागत नाहीत. पळवून लावतात. काय लायकी राहिली या मंत्र्याची? हे असले तीनपाट मंत्री महाराष्ट्राचे वाटोळे करतील. भगवानगडावरून यांचा कडेलोट करावा, अशा लायकीचे हे मंत्री आहेत. आणखी कोणत्या शब्दांत संताप व्यक्त करणार?
अजित पवार धरणात मु …. ना महाराष्ट्राचे वातावरण गांडूळ झाले नाही का . 70 कोटी सिंचन घोटाळा केला तेव्हा वातावरण गढूळ झाले नाही का . मतदान दिले नाही तर पाणी बंद करू अस्या धमक्याने वातावरण गढूळ झाले नाही का?