देशाच्या विकासासाठी तुमची नेमकी कोणती धोरणे आहेत, असा प्रश्न मोदींना विचारण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत ते महाराष्ट्रातील जनतेने दाखवून द्यावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.
मुंबई– देशाच्या विकासासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणते धोरण आहे? यूपीए सरकारने राबवलेल्या विकासाच्या योजनांची ते नक्कल करून वापरत आहेत. त्यामुळेच देशाच्या विकासासाठी तुमची नेमकी कोणती धोरणे आहेत, असा प्रश्न मोदींना विचारण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत ते महाराष्ट्रातील जनतेने दाखवून द्यावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदी यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवताना चिदंबरम् म्हणाले की, केवळ भुलवणा-या भाषणबाजीने देश चालत नसतो. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देईल, अशी एकही व्यक्ती मोदी सरकारने आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. ते भारतीयांची केवळ फसवूणक करत आहेत.
घंटा आहे त्या भामट्याकडे…..