भारताच्या अर्थव्यवस्थेत काळा पैशाचे प्रस्थ अधिक आहे. भारतात ३० लाख कोटी रुपये काळा पैसा आहे.
नवी दिल्ली- भारताच्या अर्थव्यवस्थेत काळा पैशाचे प्रस्थ अधिक आहे. भारतात ३० लाख कोटी रुपये काळा पैसा आहे. थायलंड व अर्जेटिना या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही भारतातील काळा पैसा अधिक असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काळया पैशाला लगाम लागू लागला आहे.
अॅम्बिट कॅपिटल रिसर्च या संस्थेने देशातील काळा पैशाचा तपशीलवार अभ्यास केला आहे. देशात कर्जावरील व्याज देण्याचे प्रमाण सध्या ३४ टक्के आहे. वर्षभरापूर्वी हाच दर २४ टक्के होता. यामुळे काळ्या पैशात वाढ होत आहे, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.
देशात काळा पैशाचे प्रस्थ १९७० ते १९८० च्या काळात वेगाने वाढले. मात्र, त्यानंतर देशात कायदे कठोर झाल्याने काळा पैसा तयार होण्याची गती मंदावली. काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेत बाँकिंग व्यवस्था टाळून अधिकाधिक रोख व्यवहार करतात, असे संस्थेने सांगितले.
बांधकाम व सोन्यामध्ये अधिकतर काळा पैसा गुंतवला जातो. भारतात आता बाँकेत पैसे ठेवण्याऐवजी लोक जमीन व सोन्यात गुंतवणूक करत असल्याचे आढळले आहे. सर्वात जास्त काळा पैसा बांधकाम क्षेत्रात आहे. मात्र, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काळया पैशावर मोठया प्रमाणावर नियंत्रण आले आहे. विशेष म्हणजे काळा पैसा सोन्यात गुंतवणे अधिक कठीण बनले आहे.
» अर्जेटिना, थायलंडच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही देशातील काळा पैसा अधिक
» सोने, बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा
» काळ्या बाजारातील व्याजदर ३४ टक्के
» मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर काळया पैशावर लगाम
भारतात काळा पैसा आहे म्हणून कष्ट करी गरीब सुखाचे दोन घास खात आहेत हे सत्य कोणाला माहित आहे..