Friday, May 3, 2024
Google search engine
Homeप्रतिबिंबब्रॉयलर कोंबडी खा, पण जरा जपून

ब्रॉयलर कोंबडी खा, पण जरा जपून

चविष्ट, चवदार कोंबडी खायची म्हटल्यावर मांसाहारी व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटते. आता ही कोंबडी खाण्यासाठी किती सुरक्षित आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण या कोंबड्यांना वेगाने वाढवण्यासाठी आणि त्यांना रोग होऊ नये म्हणून ‘अ‍ॅँटिबायोटिक्स’ दिले जात आहेत. धोकादायक बाब म्हणजे त्याचे अंश मानवाच्या पोटात जात आहेत. त्यामुळे कोंबडी खा, पण जपून, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
chickenमांसाहार म्हटला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पापलेट, सुरमई, कोळंबी, मांदेली या मत्स्य आहाराबरोबरच कोंबडीचा बेत आखला जातो. भाजलेली कोंबडी किंवा चटकदार रस्सा असल्यास मांसाहारी व्यक्तीची रसना चाळवली जाते. या चमचमीत कोंबड्या खाल्ल्यानंतर मांसाहारी व्यक्तीचा आत्मा शांत होतो. सध्या प्रकृतीला उपयुक्त ठरणा-या गावठी कोंबड्या मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेकांनी ब्रॉयलर कोंबड्यांकडे मोर्चा वळवला आहे. या ब्रॉयलर कोंबड्या आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त असतात याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण या कोंबड्यांना पटापट वाढवण्यासाठी औषधांचे डोस दिले जातात. या डोसमुळे हे मांस खाणा-या माणसांच्या पोटात या अ‍ॅँटिबायोटिक्सचे अंश जात असतात. त्यातून विविध आजार संबंधितांना होण्याची शक्यता वाढत असते.

सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात खाण्यापिण्याची एकदम चंगळच असते. बाजारात फळे आणि भाज्या भरपूर दिसतात. जणू खुणावत असतात. शिवाय, व्यायाम  करून शरीर कमवायचं, त्याला भरपूर खुराक देऊन तब्येतीत जगायचं ते याच दिवसात. घामाची चिकचिक नाही की उन्हाचा कडाका नाही. कोमट ऊन हवेहवेसे वाटते. शिवाय, जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात हुरडा पार्टी आणि भरपेट कोंबडी- वडे यांची रेलचेल आलीच.
मात्र, हे सगळं अन्न आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे ना, याची पारख कशी करणार ? रसना तृप्त व्हावी अशी चव, अगदी जिभेवर रेंगाळणारी आणि पदार्थ कसे तर तोंडात जणू विरघळणारे. मग त्यात आरोग्यासाठी धोकादायक काय असणार? आपण खातो गरमागरमच. म्हणजे चांगलं रटारटा शिजलेलं नाहीतर खरपूस भाजलेलं, खमंग, तळलेलं. कच्च काही नाही. त्यात म्हणजे कसं, की काही असलंच चुकीचं तर तेही नाहीसं होणार, असं सगळे सांगतात. तेव्हा आरोग्याची अशी  भीती वगैरे घालून चांगल्या कोंबडी-वड्याच्या मेजवानीची मजा घालवायची नाही, असं सर्वसामान्य खवय्यांनी म्हटलं, तर ते बरोबरच आहे.

झालंय असं की, कोंबड्यांच्या आत दडलंय काय, याचा शोध जनहितार्थ कार्यरत संशोधकांनी घेतला. विज्ञानाचा अभ्यास नवनव्या शोधांना जन्म देतो. त्याच वेळी त्याच्या चुकीच्या उपयोगांची धास्तीही बाळगावी लागतेच. नवे संशोधन हवेच, मात्र त्यावर तितक्याच माहीतगार तज्ज्ञांची नजरसुद्धा असावी हवी. ही गरज सर्व जगभर आहे आणि सर्व देशांमध्ये असे जनहितार्थ संशोधन / परीक्षण करणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञसुद्धा आहेत. त्यामुळे नफा, आणखी नफा आणि त्यासाठी विविध प्रकारे वैज्ञानिक प्रगतीला दावणीला बांधणा-या बेलगाम उत्पादक कंपन्यांना चाप बसायला मदत होते. निरागस, सर्वसामान्य ग्राहकांच्या संरक्षणाचा मार्ग प्रशस्त होण्यासही मदत होते. आपण ग्राहकांनी मात्र, ही माहिती करून घ्यायला हवी.
आता कोंबडी-वडे खाणा-यांची आपल्या भारतातील लोकांची संख्या किती? तर मांसाहार करणा-या एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के मंडळी कोंबडी खातात. कुक्कुटपालन हा देशभर एक चांगला व्यवसाय आहे. शिवाय आता केएफसीसारख्या परदेशी साखळय़ाही वेगळय़ा धर्तीचे, चवीचे कोंबडीचे पदार्थ घेऊन शहरी, निमशहरी भागात बस्तान बसवीत आहेत. पोल्ट्रीफार्ममधल्या गोजिरवाण्या, गुबगुबीत कोंबड्या काय काय खातात, त्यांच्यासाठी जे खास अन्न बनविले जाते, त्यात कोणते घटक असतात, या बाबत खवय्यांना माहीत असणे कठीण. त्यांना कल्पना ही नसेल की या चविष्ट कोंबडीबरोबर आपल्या पोटात अगदी कमी प्रमाणात का होईना अ‍ॅँटिबायोटिक्स जात आहेत. प्रत्येक वेळी जात आहेत. ज्यांचा आपल्या मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीवर वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आहे. त्याचा एक परिणाम, पुढे जाऊन असा होऊ शकतो, की या व्यक्तींना कोणत्या आजारासाठी जर तीच अ‍ॅँटिबायोटिक्स औषध योजनेचा भाग म्हणून घ्यावी लागली, तर शरीर त्यांना योग्य तो प्रतिसाद देणार नाही. याचे कारण म्हणजे कोंबडी खाता खाता ही अ‍ॅँटिबायोटिक्स त्यांच्या एकूण चयापचय प्रणालीत कायमच जात राहिली आहे.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅँड एन्व्हॉयरमेंट (सीएसई) च्या अन्न सुरक्षा विषयक पथकाने दिल्ली व परिसरातील ७० नमुन्यांचे केलेले सर्वेक्षण, सर्व देशभरात लागू होण्यासारखे आहे. कारण या संदर्भातील आज तरी कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्याचे वजन वाढावे व त्यांची वाढ पटापट व्हावी म्हणून ‘माणसांसाठी औषधे’ वापरण्यात येणारी अ‍ॅँटिबायोटिक्स वापरण्यात येत आहेत, असे संशोधनानंतर आढळून आले आहे. या नमुन्यांचे मांस, लिव्हर (यकृत) आणि किडनी (मूत्रपिंड) यामध्ये सहा प्रकारची अ‍ॅँटिबायोटिक्स आढळली आहेत. अधिक तांत्रिक तपशिलात न शिरता सांगायचे झाले तर टेट्रासायक्लीन वर्गीय तसेच निओमायसीन, सिप्रोफ्लॉक्सेसिन या वर्गात मोडणारी ही अ‍ॅँटिबायोटिक्स आहेत. सर्वसामान्यपणे एका नमुन्यात (म्हणजे कोंबडीत) एकच प्रकारचे आढळले, तरी १७% नमुन्यात एकापेक्षा अधिक अ‍ॅँटिबायोटिक्सचे घटक आढळून आले आहेत. बेलगाम पद्धतीने कोंबड्यांना ही अ‍ॅँटिबायोटिक्स देण्यात येत आहेत. ती त्यांच्या शरीराचा भाग बनत आहेत. इतकेच नव्हे तर या गैरवापराचा परिणाम मुळात त्या कोंबड्यांच्या शरीरातील सूक्ष्म जीवांवर होतो. नंतर ते माणसांच्या शरीरात जातात.

आता मानवी शरीराशी संबंधित सर्वेक्षणेही तपासणे आले. सीएसईने तेही केले. त्यातून असे लक्षात आले की २००२ ते २०१३ या दहा वर्षात अ‍ॅँटिबायोटिक्स लागू न पडण्याचे प्रमाण (ंल्ल३्र्रु३्रू १ी२्र२३ंल्लूी) त्याच वर्गामध्ये वाढते आहे. ज्या वर्गातली अ‍ॅँटिबायोटिक्स कोंबड्यांना देण्यात येत आहेत, नमुन्यांमध्ये आढळलेली आहेत. ती आहेत सिप्रोफ्लॉक्सेसिन, डोक्सिसायक्लिन आणि टेट्रासायक्लिन.

ही समस्या वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. सतत पण सूक्ष्मपणे, नकळत अन्नातून होणारा आरोग्यावरचा हल्ला आपण रोखायला हवा. काही विकसित देशांमध्ये याबाबत अतिशय कडक नियम आहेत. जिथे तसे नाहीत तिथे समस्या आहेच. भारताच्या विविध भागांत आरोग्यविषयक जाणीव-जागृती मुळातच कमी आहे. शिवाय मांसाहार करणा-यांची संख्या वाढत आहे. भारतात पोल्ट्री उद्योग दरवर्षी १० टक्के वेगाने वाढत आहे. या उद्योगातून अंड्यांबरोबरच कोंबड्यांचे मांसही विकले जाते. या अन्नाद्वारे अपाय होऊ शकतो, असा विचारही मनात येणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत केवळ ‘नफा’ हे उद्दिष्ट ठेवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणा-या कोणत्याच अन्न व्यावसायिकांना मोकळे रान असता कामा नये. ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ अंतर्गत आरोग्यदायी अन्न मिळण्याचा आपला हक्क आपण जागरूकपणे बजावायला हवा.

त्यासाठी सीएसईच्या वेबसाईटवर जाऊन जुलै २०१४ मधले हे संशोधन नीट पाहा. त्याच्या आधारे आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवा. शक्य असेल तर तुमच्या परिसरातील कोंबड्यांमध्ये ‘अ‍ॅँटिबायोटिक्स’चे अंश आहेत का ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी परीक्षणही करून घ्या. सर्व आघाड्या उघडून छुप्या हल्ल्याला नेस्तनाबूत करायलाच हवे. पुढच्या पिढय़ांच्या आरोग्यासाठीही ते आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सध्या महागयीच्या जमान्यात बकर्याचे मटण महाग आहे त्यामुळे जनता हि बॉयलर कोंबडी खाणे अधिक पसंत करतात
    जर सरकारने बकर्याचे मटण स्वस्त केले तर जनता चिकन खाणे कमी करेल आणि बकर्याचे मटण खाणे अधिक पसंत करेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट