स्वच्छ मुंबई अभियानाच्या नावाखाली कच-यातून मलई ओरपण्याचा उद्योग मुंबई महापालिकेत जोरात सुरू असून घनकचरा विभागाने तब्बल २० हजार नवीन छोटय़ा आकाराच्या कचरा पेटय़ा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई – स्वच्छ मुंबई अभियानाच्या नावाखाली कच-यातून मलई ओरपण्याचा उद्योग मुंबई महापालिकेत जोरात सुरू असून घनकचरा विभागाने तब्बल २० हजार नवीन छोटय़ा आकाराच्या कचरा पेटय़ा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
मागच्या तुलनेत नव्याने खरेदी केलेल्या कचरा पेटय़ांची किंमत ३७ रुपयांनी कमी असल्याने तसेच जादा दराने त्यांची खरेदी झाल्योमुळे पालिकेचे सुमारे पावणेआठ लाखांचे नुकसान झाले आहे.
पालिकेतर्फे स्वच्छ मुंबई अभियान राबवले जात असले तरी अनेक वस्त्यांमध्ये कचरा साठवणूक करण्यासाठी छोटय़ा आकाराच्या कचरापेटींच्या संख्या अपुरीच आहे.
जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी संयुक्तिक कॉम्पॅक्टर गाडय़ा, बंदिस्त कंटेनर्स आणि कचरापेटय़ा महापालिकेने वापरात आणल्या आहेत. महापालिकेने खरेदी केलेल्या कॉम्पॅक्टर्समध्ये तसेच सर्व विभागांत भाडेतत्त्वावर वापरलेल्या कॉम्पॅक्टर्समध्ये १२० लिटर क्षमतेच्या कंटेनर्स उचलण्याची व्यवस्था आहे.
या कचरा पेटय़ा कॉम्पॅक्टर्सद्वारे सहज उचलता येतात व रिकामेही करता येतात. त्यामुळे शाळा, रुग्णालय आदी खात्यांत या कचरापेटय़ांची मागणी असून नगरसेवकही त्यांच्या निधीतून विविध नागरी वसाहतींना बंदिस्त कचरापेटय़ांत कचरा जमा करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे या कचरापेटय़ा खरेदी करण्यात येत असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकही त्यांच्या निधीतून विविध नागरी वसाहतींना बंदिस्त कचरापेटय़ांत कचरा जमा करण्यासाठी आग्रही असतात हे पालिकेचे म्हणणे मुंबईतील प्रत्येक नागरिकास पटते परंतु आजही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या कडेला तितक्या प्रमाणात कचरा पेट्या देण्यात येत नाही. प्रत्येक नागरिकांकरिता आज जोगेश्वरीविक्रोळी लिंकरोड हा एक महत्वाचा दुवा ठरला आहे. आधीच सकाळी कामावर जाण्याची वेळ तरीही त्या रस्त्यावर महानगरपालिकेची कचरा उचलण्याची वेळ आणि त्या रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्ये जागा अडवून लावलेल्या गाड्या. त्यामुळे प्रत्येक नागरिकांस कामावर जाण्यास उशीर होतो. साध्या लादिकरनाकरिता नगरसेवक निधी उपलब्ध नाही हा टोला नागरिकांस दिला जातो. कचरा टाकण्यास कचरा पेट्या उपलब्ध नाही त्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर टाकून जातात. हळू हळू तो कचरा रस्त्याच्या प्रत्येक बाजूस पसरला जातो आणि छोट्या मोठ्या नाल्या गटारात जाउन साचतो. कंत्राटी कामगार वरवरचा रस्ता साफ करून जातात आणि गटारे नाल्यांकडे दुर्लक्ष करतात. कंत्राटदार तर भरगोस पैसा कमावतो, पण नगरसेवक जराही पाहणी करत नाही. पालिकेने दिलेल्या पैशातून तुम्ही तुमचा विभाग कितपत स्वछ ठेवला याबद्दलही कंत्राटदारास साधी विचारणा केली जात नाही. महिनो महिने कंत्राटी कामगारास देण्यात आलेला पगार खोटे कर्मचारी दाखवून कंत्राटदार बिनधास्तपणे खाऊन बसतो, त्यातील थोडा हिस्सा पालिका अधिकार्यांना दिला कि आपल्या वाटेला भरगोस पैसा आला. मग तो विभाग कंत्राटदाराने केवढा साफसुधरा ठेवला आहे ते अधिकारी वर्ग बघेलच कशाला? तुम भी खावो हम भी खायेंगे, जनता अगर है परेशान तो हम क्या करे? जब अपना काम बनता ……….जनता. जेव्हा पासून राजकारणास सुरुवात झाली तेव्हापासून मुंबईच काय तर संपूर्ण भारत देश आणि तेथील नागरिक हा त्यांचा गुलाम झाला आहे, मग कायदा आणि सुव्यवस्था आमच्या करिता कायच नाही. एका साहेबाच्या ओळखीवर आम्ही न बोलता पैसा खाऊ आणि ते दिसू नये म्हणून त्या पैश्यातील मलई साहेबाना देऊ.