मुंबईतील शक्ती मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी ३७६(ई) हे कलम समाविष्ट करुन सत्र न्यायालय मंगळवारी आरोपींना शिक्षा ठोठाणार आहे.
मुंबई- महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे महिला छायाचित्रकार आणि टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींसाठी ३७६(ई) हे कलम समाविष्ट करुन त्यांना मंगळवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयाने टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याच परिसरात छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातही यातील तीन आरोपींचा सहभाग असल्यामुळे त्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले सुधारित कायद्यातील भादंवि कलम ३७६(ई) लागू करावे अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे केली. या प्रकरणी ३७६(ई) हे कलम समाविष्ट करुन मंगळवारी शिक्षा सुनावली जाईल, असे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी सांगितले.
टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्कारप्रकरणी विजय जाधव, कासिम बंगाली, मोहम्मद अन्सारी व अश्फाक शेख या चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे कलम ३७६ (ई)?
दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्येच्या घटनेनंतर बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमधील कलमांमध्ये सुधारणा करून ते आणखी कडक करण्यात आले. या सुधारणेनुसार एकापेक्षा अधिक बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींसाठी ३७६(ई) हे कलम समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार, कमीतकमी मरेपर्यंत जन्मठेप अथवा जास्तीत जास्त फाशीची शिक्षेची तरतूद असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने तीन आरोपींवर हे कलम लावण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शिक्षेत वाढ होऊन ती फाशीही होऊ शकते.
[EPSB]
चार नराधमांना जन्मठेप!
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने चारही आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
[/EPSB]
fashich dyaila hawi. mareparyant janmthep mhanaje punha Bharan Poshan sarkarch karkar. nako. fashich havi.
अशा घृणास्पद कृत्याला फाशीची शिक्षा देखील कमी आहे, अशा नराधमांना जाहीरपणे नरकयातना देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने जीवनयात्रा संपवत यायला हवे जेणेकरून पुन्हा अशी नीच, हलकट कृत्य करताना शंभरवेळा विचार करायला पाहिजे. आणि या कृत्याला ‘मानवी हक्क’सारख्या संघटनांनी दूर राहिले पाहिजे. त्यावर दया-माया-सहानुभूती दाखवता कामा नये. आणि अल्पवयीनबाबत जे कायदे आहेत, त्यात बदल करायला हवे, कारण असे घृणास्पद कृत्य करताना ते अल्पवयीन ठरत नाहीत, त्यांना आपण कोणते दुष्कर्म करतोय याची चांगली जाणीव असते त्यामुळे या कायद्यात आता बदल होणे आवश्यक आहे.
– सुवर्णा, सोलापूर